शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

"संजय रॉयला जामीन द्यायचा का?"; कोलकाता डॉक्टर हत्या प्रकरणाच्या सुनावणीत न्यायाधीश संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2024 13:26 IST

कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान कोर्टाने सीबीआयच्या वकिलांना चांगलेच सुनावलं.

Kolkata Hospital Crime : कोलकात्याच्या आरजी कार हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या प्रकरणाची सुनावणी नुकतीच पार पडली. देशभरात या प्रकरणावरुन संतापाची लाट उसळलेली असताना न्यायालयही याबाबत कठोर भूमिका घेताना दिसत आहे. हत्या आणि बलात्कार प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने सीबीआयच्या तपास अधिकाऱ्याची अनुपस्थिती आणि तपास यंत्रणेच्या वकिलांच्या येण्यास ४० मिनिटांचा उशीर झाल्याने न्यायालया संतप्त झालं होतं. आम्ही मुख्य आरोपीला जामीन द्यायचा का? असा सवाल करत न्यायालयाने सीबीआयच्या वकिलांना धारेवर धरलं.

कोलकात्याच्या आरजी कार हॉस्पिटलमध्ये महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायाधीश पामेला गुप्ता संतप्त झाल्या आणि त्यांनी सीबीआयला चांगलेच खडसावले. या प्रकरणातील मुख्य संशयित संजय रॉयच्या जामीन अर्जावर सियालदह न्यायालयात सुनावणी होणार होती. मात्र सीबीआयचे तपास अधिकारी आणि सरकारी वकील उशिरा पोहोचले. सीबीआयचे तपास अधिकारी आणि वकिलाच्या उशीरा येण्याचा न्यायाधीश पामेला गुप्ता यांना प्रचंड राग आला. त्यामुळे त्यांनी मी संजय रॉय यांना जामीन द्यायचा का? असा संतप्त सवाल केला.

सियादाह न्यायालयाच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी पामेला गुप्ता यांना सीबीआय अधिकाऱ्याने दुपारी ४:१० वाजता सरकारी वकील उशिरा पोहोचल्याची माहिती दिली. त्यावर पामेला गुप्ता यांनी रोष व्यक्त केला. 'वकील हजर नसतील तर त्याला (संजय रॉय) जामीन मिळायला हवा' असं न्यायमूर्ती पामेला गुप्ता म्हणाल्या. काही वेळ थांबूनही वकील दीपक पोरिया न आल्याने दंडाधिकाऱ्यांनी सीबीआय अधिकाऱ्याला त्यांना फोन करण्यास सांगितले. आता ४:२० झाले आहेत. हे अत्यंत दुर्दैवी आहे, असेही पामेला गुप्ता म्हणाल्या.

यानंतर सीबीआयचे तपास अधिकारी कोर्ट रूममधून निघून गेले आणि १५ मिनिटांनी परत आले. त्यांनी दीपक पोरिया येत असल्याचे सांगितले. संध्याकाळी ५ वाजता पोरिया आल्यावर बचाव पक्षाच्या वकील कविता सरकार यांनी २३ ऑगस्टला मागील सुनावणीला उपस्थित असलेले वकील यावेळी सीबीआयचे प्रतिनिधित्व का करत नाहीत, असा सवाल केला. त्यावर दीपक पोरिया यांनी ते तपास संस्थेचे पूर्णवेळ वकील आहेत आणि त्यांनी कोणतेही विशेष कारण न देता संजय रॉय यांच्या जामिनाला विरोध केला आहे, असे म्हटलं.

पोरिया यांनी रॉय यांच्या जामिनाला विरोध केला आणि म्हटलं की त्याची सुटका केल्याने तपासात अडथळा येऊ शकतो. त्यावर न्यायालयाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सीबीआयने तातडीने कारवाई करण्याची गरज असल्याचे सांगितले. न्यायालयाने पुन्हा संजय रॉय यांचा जामीन अर्ज फेटाळला आणि त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालयCBIगुन्हा अन्वेषण विभाग