शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

धक्कादायक! राजस्थानमध्ये गोशाळेतील ८० गायींचा अचानक मृत्यू, परिसरात एकच खळबळ

By ravalnath.patil | Published: November 22, 2020 9:43 AM

Rajasthan : पशुसंवर्धन व वैद्यकीय विभागाच्या पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. 

ठळक मुद्देही घटना सरदारशहरमधील बिल्युबास रामपुरा येथील श्री राम गोशाळेतील आहे.

चुरू : राजस्थानमधील चुरू जिल्ह्यात एका गोशाळेतील ८० गायींचा अचानक मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच, यासंबंधी माहिती मिळाल्यानंतर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. 

दरम्यान, या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे, असे सरदारशहरचे तहसीलदार कुतेंद्र कंवर यांनी सांगितले. तसेच, या गायींचा मृत्यू चाऱ्यातून विषबाधा झाल्यामुळे किंवा आजारामुळे झाला आहे का, याचा शोध घेतला जात आहे. तपास अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे कुतेंद्र कवर म्हणाले.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सरदारशहरमधील बिल्युबास रामपुरा येथील श्री राम गोशाळेतील आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, शुक्रवारी सायंकाळपासून या गोशाळामध्ये ८० गायींचा मृत्यू झाला, तर अन्य काही आजारी आहेत. पशुसंवर्धन व वैद्यकीय विभागाच्या पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. 

शुक्रवारी सायंकाळी गोशाळेतील गायी अचानक आजारी पडण्यास सुरुवात झाली. रात्री ८० गायींचा मृत्यू झाला. इतर काही गायी आजारी आहेत. यामधील बहुतेक गायींची प्रकृती ठीक आहे, असे  विभागाचे सहसंचालक डॉ. जगदीश बरबड यांनी सांगितले. तसेच, कदाचित चाऱ्यासोबत काही विषारी पदार्थ खाल्ल्यामुळे गायींचा मृत्यू झाल्याची शंका आहे. त्यामुळे चाऱ्याचे नमुने घेतले असून चाचणीसाठी पाठविले आहेत, असे डॉ. जगदीश बरबड यांनी सांगितले.

पंचकुलामध्ये ७० गायींचा मृत्यू झाला होतागेल्या महिन्यात पंचकुलाच्या माता मनसा देवी मंदिराजवळील गोशाळेत अन्न विषबाधेमुळे ७० गायींचा मृत्यू झाला होता. तर ३० गायींवर उपचार सुरू होता. सायंकाळी उशिरा बाहेरून आलेल्या एका व्यक्तीने या गायींना अन्न दिल्याचे सांगण्यात आले होते. हे अन्न खाल्ल्यानंतर गायींची प्रकृती खालावली, त्यानंतर सकाळपर्यंत ७० गायींचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेनंतर संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती गठीत करण्यात आली. तसेच, भविष्यात गोशाळेत चारा टाकण्यापूर्वी त्याची चौकशी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. 

टॅग्स :cowगायcow vigilantesगोरक्षकांचा हिंसाचारRajasthanराजस्थान