शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

धक्कादायक! राजस्थानमध्ये गोशाळेतील ८० गायींचा अचानक मृत्यू, परिसरात एकच खळबळ

By ravalnath.patil | Updated: November 22, 2020 09:46 IST

Rajasthan : पशुसंवर्धन व वैद्यकीय विभागाच्या पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. 

ठळक मुद्देही घटना सरदारशहरमधील बिल्युबास रामपुरा येथील श्री राम गोशाळेतील आहे.

चुरू : राजस्थानमधील चुरू जिल्ह्यात एका गोशाळेतील ८० गायींचा अचानक मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच, यासंबंधी माहिती मिळाल्यानंतर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. 

दरम्यान, या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे, असे सरदारशहरचे तहसीलदार कुतेंद्र कंवर यांनी सांगितले. तसेच, या गायींचा मृत्यू चाऱ्यातून विषबाधा झाल्यामुळे किंवा आजारामुळे झाला आहे का, याचा शोध घेतला जात आहे. तपास अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे कुतेंद्र कवर म्हणाले.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सरदारशहरमधील बिल्युबास रामपुरा येथील श्री राम गोशाळेतील आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, शुक्रवारी सायंकाळपासून या गोशाळामध्ये ८० गायींचा मृत्यू झाला, तर अन्य काही आजारी आहेत. पशुसंवर्धन व वैद्यकीय विभागाच्या पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. 

शुक्रवारी सायंकाळी गोशाळेतील गायी अचानक आजारी पडण्यास सुरुवात झाली. रात्री ८० गायींचा मृत्यू झाला. इतर काही गायी आजारी आहेत. यामधील बहुतेक गायींची प्रकृती ठीक आहे, असे  विभागाचे सहसंचालक डॉ. जगदीश बरबड यांनी सांगितले. तसेच, कदाचित चाऱ्यासोबत काही विषारी पदार्थ खाल्ल्यामुळे गायींचा मृत्यू झाल्याची शंका आहे. त्यामुळे चाऱ्याचे नमुने घेतले असून चाचणीसाठी पाठविले आहेत, असे डॉ. जगदीश बरबड यांनी सांगितले.

पंचकुलामध्ये ७० गायींचा मृत्यू झाला होतागेल्या महिन्यात पंचकुलाच्या माता मनसा देवी मंदिराजवळील गोशाळेत अन्न विषबाधेमुळे ७० गायींचा मृत्यू झाला होता. तर ३० गायींवर उपचार सुरू होता. सायंकाळी उशिरा बाहेरून आलेल्या एका व्यक्तीने या गायींना अन्न दिल्याचे सांगण्यात आले होते. हे अन्न खाल्ल्यानंतर गायींची प्रकृती खालावली, त्यानंतर सकाळपर्यंत ७० गायींचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेनंतर संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती गठीत करण्यात आली. तसेच, भविष्यात गोशाळेत चारा टाकण्यापूर्वी त्याची चौकशी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. 

टॅग्स :cowगायcow vigilantesगोरक्षकांचा हिंसाचारRajasthanराजस्थान