शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

बहिणीच्या भेटीला अफगाणिस्तानमध्ये गेली होती 'या' भारतीय व्यक्तीची पत्नी, आता होत नाहीये संपर्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2021 16:45 IST

जेव्हापासून तालिबानने काबुलवर ताबा मिळवला तेव्हापासून त्यांचं तिच्याशी बोलणं झालं नाही. अखेरचं त्यांचं बोलणं सोमवारी झालं होतं.

अफगाणिस्तानवरतालिबानने ताबा मिळवल्यानंतर अनेक भीतीदायक आणि अत्याचारांच्या घटना समोर येत आहेत. कोलकाता येथे राहणारे सुब्रत दत्ता हेही सध्या चिंतेत आङेत. कारण त्यांची पत्नी तिच्या बहिणीला भेटण्यासाठी काबुलला गेली होती. जेव्हापासून तालिबानने काबुलवर ताबा मिळवला तेव्हापासून त्यांचं तिच्याशी बोलणं झालं नाही. अखेरचं त्यांचं बोलणं सोमवारी झालं होतं.

इंडिया टाइम्सच्या रिपोर्टनुसार, त्यांची पत्नी जून महिन्यात आपल्या परिवाराच्या भेटीला अफगाणिस्तानमध्ये गेली होती. त्यांच्या लग्नाला सहा वर्षे झाली आहेत. सुब्रत दत्ता आणि त्यांच्या परिवाराने त्यांच्या पतीला लग्नाची कागदपत्रे लपवून ठेवण्यास सांगितलं आहे. जेणेकरून जर तालिबानचे कमांडर चौकशीसाठी आले तर त्यांना कळू नये की, तिने कुणाशी लग्न केलं आहे. कोणत्या धर्माच्या व्यक्तीशी लग्न केलं आहे.

कशी झाली होती दोघांची भेट

कोलकाताच्या नागरबाजारमध्ये राहणारे सुब्रत दत्ता अहमदाबादमध्ये काम करतात. २०१५ मध्ये त्यांनी काबुलमध्ये राहणाऱ्या एका महिलेशी लग्न केलं. तिचा जन्म अफगाणिस्तानमध्येच झाला होता. ती लग्न झाल्यावर कोलकातामध्येच राहू लागली होती. सुब्रत यांनी सांगितलं की, 'अफगाणिस्तानला कामानिमित्त गेलो होतो तेव्हा आमची पहिली भेट झाली होती. नंतर आम्ही ई-मेल आणि चॅटवरून बोलणं होत होतं. नंतर ती कोलकाता येथे आली आणि आम्ही लग्न केलं'.

लग्नानंतर पहिल्यांदाच काबुलला गेली

लग्नानंतर त्यांची पत्नी पहिल्यांदाच आपल्या कुटुंबियांना भेटायला गेली होती. तेव्हापासून ती परत आली नाही. सुब्रत रोज आपल्या पत्नीसोबत संपर्क करण्याचा प्रयत्न करतात. पण ती सोमवारपासूनच ऑफलाइन आहे. ते म्हणाले की, 'तिचे आई-वडील तर आता या जगात नाहीत. पण तिचे भाऊ आणि बहीण आहेत. जेव्हा तिच्यासोबत अखेरचं बोलणं झालं होतं तेव्हा तिने ती ठीक असल्याचं सांगितलं होतं'.

सुब्रत पत्नीच्या आठवणीत म्हणाले की, 'मला माहीत आहे की, ती लवकरच माझ्यासोबत बोलेल. माझ्या पत्नी समुद्र खूप आवडतो. तिने आय़ुष्यात पहिल्यांदा माझ्यासोबत मदार्मानी बीच पाहिला होता. जेव्हा ती परत येईल तेव्हा मी तिला पुन्हा तिथे घेऊन जाणार. मला माहीत आहे ती नक्की येणार'. 

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबानIndiaभारत