शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

बहिणीच्या भेटीला अफगाणिस्तानमध्ये गेली होती 'या' भारतीय व्यक्तीची पत्नी, आता होत नाहीये संपर्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2021 16:45 IST

जेव्हापासून तालिबानने काबुलवर ताबा मिळवला तेव्हापासून त्यांचं तिच्याशी बोलणं झालं नाही. अखेरचं त्यांचं बोलणं सोमवारी झालं होतं.

अफगाणिस्तानवरतालिबानने ताबा मिळवल्यानंतर अनेक भीतीदायक आणि अत्याचारांच्या घटना समोर येत आहेत. कोलकाता येथे राहणारे सुब्रत दत्ता हेही सध्या चिंतेत आङेत. कारण त्यांची पत्नी तिच्या बहिणीला भेटण्यासाठी काबुलला गेली होती. जेव्हापासून तालिबानने काबुलवर ताबा मिळवला तेव्हापासून त्यांचं तिच्याशी बोलणं झालं नाही. अखेरचं त्यांचं बोलणं सोमवारी झालं होतं.

इंडिया टाइम्सच्या रिपोर्टनुसार, त्यांची पत्नी जून महिन्यात आपल्या परिवाराच्या भेटीला अफगाणिस्तानमध्ये गेली होती. त्यांच्या लग्नाला सहा वर्षे झाली आहेत. सुब्रत दत्ता आणि त्यांच्या परिवाराने त्यांच्या पतीला लग्नाची कागदपत्रे लपवून ठेवण्यास सांगितलं आहे. जेणेकरून जर तालिबानचे कमांडर चौकशीसाठी आले तर त्यांना कळू नये की, तिने कुणाशी लग्न केलं आहे. कोणत्या धर्माच्या व्यक्तीशी लग्न केलं आहे.

कशी झाली होती दोघांची भेट

कोलकाताच्या नागरबाजारमध्ये राहणारे सुब्रत दत्ता अहमदाबादमध्ये काम करतात. २०१५ मध्ये त्यांनी काबुलमध्ये राहणाऱ्या एका महिलेशी लग्न केलं. तिचा जन्म अफगाणिस्तानमध्येच झाला होता. ती लग्न झाल्यावर कोलकातामध्येच राहू लागली होती. सुब्रत यांनी सांगितलं की, 'अफगाणिस्तानला कामानिमित्त गेलो होतो तेव्हा आमची पहिली भेट झाली होती. नंतर आम्ही ई-मेल आणि चॅटवरून बोलणं होत होतं. नंतर ती कोलकाता येथे आली आणि आम्ही लग्न केलं'.

लग्नानंतर पहिल्यांदाच काबुलला गेली

लग्नानंतर त्यांची पत्नी पहिल्यांदाच आपल्या कुटुंबियांना भेटायला गेली होती. तेव्हापासून ती परत आली नाही. सुब्रत रोज आपल्या पत्नीसोबत संपर्क करण्याचा प्रयत्न करतात. पण ती सोमवारपासूनच ऑफलाइन आहे. ते म्हणाले की, 'तिचे आई-वडील तर आता या जगात नाहीत. पण तिचे भाऊ आणि बहीण आहेत. जेव्हा तिच्यासोबत अखेरचं बोलणं झालं होतं तेव्हा तिने ती ठीक असल्याचं सांगितलं होतं'.

सुब्रत पत्नीच्या आठवणीत म्हणाले की, 'मला माहीत आहे की, ती लवकरच माझ्यासोबत बोलेल. माझ्या पत्नी समुद्र खूप आवडतो. तिने आय़ुष्यात पहिल्यांदा माझ्यासोबत मदार्मानी बीच पाहिला होता. जेव्हा ती परत येईल तेव्हा मी तिला पुन्हा तिथे घेऊन जाणार. मला माहीत आहे ती नक्की येणार'. 

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबानIndiaभारत