शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 14:26 IST

Delhi Mumbai expressway Update: दिल्ली मुंबई राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ६ स्वच्छता कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून, ५ जण जखमी झाले आहेत. 

Delhi Mumbai expressway accident news: दिल्ली-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर पिकअप गाडीने रस्त्याची सफाई करत असलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनाच चिरडले. यात ६ कर्मचारी ठार झाले, तर ५ जण जखमी झाले आहेत. 

शनिवारी (२६ एप्रिल) सकाळी हरयाणातील नुह जिल्ह्यातील इब्राहिम बास गावाजवळ हा अपघात झाला आहे.

भरधाव पिकअपने कर्मचाऱ्यांनाच चिरडले

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी एक भरधाव पिकअप दिल्ली मुंबई राष्ट्रीय महामार्गावरून जात होती. नुह जिल्ह्यातील इब्राहिम बास गावाजवळ स्वच्छता कर्मचारी महामार्गाची सफाई करण्याचे काम करत होते. 

भरधाव पिकअपवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहनाने स्वच्छता कर्मचाऱ्यांना जोरात धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, सहा कर्मचारी घटनास्थळीच मृत्यूमुखी पडले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. 

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने अपघातस्थळी जाऊन मृतांचे पार्थिव उचलले, तर जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी पिकअपच्या चालकाविरोधात कारवाई सुरू केली आहे. 

सीसीटीव्हीची घेतली जाणार मदत

पोलिसांनी सांगितले की, अपघाताचा तपास करण्यासाठी सीसीटीव्हीतील फुटेजस इतर पुराव्यांचीही मदत घेतली जाईल. अपघात कसा घडला, याचा तपास केला जाईल. 

मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी ते रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले असून, त्यांची ओळ पटवण्याचे काम सुरू आहे. ओळख पटवून मृतांच्या कुटुंबीयांना याबद्दलची माहिती देण्याची प्रक्रिया वेगाने केली जात आहे. 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूdelhiदिल्लीMumbaiमुंबईhighwayमहामार्ग