शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील सीमेवरील गावात गुजरातची घुसखोरी; सीमांकन हळूहळू वाढवत असल्याचा स्थानिकांचा दावा
2
लुथरा बंधूंचे थायलंडमधून फोटो आले, पासपोर्टसह घेतले ताब्यात; कारवाईपासून वाचण्यासाठी पळाले खरे पण...
3
पुढील वर्षात १ तोळा सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागणार? ब्रोकरेज फर्मने सांगितला मोठा आकडा
4
Gold Silver Price Today: यावर्षी सोनं ₹५२,७९५ आणि चांदी ₹१००९३६ रुपयांनी महागली; आजही दरानं तोडले सर्व विक्रम, पाहा किंमत
5
व्हॉट्सअप चॅट्स वाचण्यासाठी...! डीएसपी 'कल्पना वर्मा' यांच्या 'लव्ह ट्रॅप' प्रकरणात 'Love U यार...' ची एन्ट्री...
6
Geminid Meteor Shower: १३,१४ डिसेंबर ठरणार इच्छापूर्तीची रात्र; आकाशाकडे बघून करा 'हे' काम!
7
'एसी-थ्री टियर'मध्ये प्रवाशासोबत कुत्रा! रेल्वेतून नेता येतो का? व्हिडिओ व्हायरल होताच रेल्वे 'सेवा' झाली सक्रिय
8
३ महिन्यांतच गमावलेलं दुसरं बाळ, पहिल्यांदाच व्यक्त झाली सुनीता अहुजा, म्हणाली- "तिला श्वास घ्यायला त्रास व्हायचा..."
9
म्यानमारमध्ये गृहयुद्धामुळे हाहाकार; रुग्णालयातील एअर स्ट्राईकमध्ये ३० जणांचा मृत्यू, ७० जखमी
10
अमेरिकेच्या संसदेत मोदी-पुतिन यांच्या 'त्या' फोटोवर खळबळ; महिला खासदाराचा ट्रम्प यांच्या परराष्ट्र धोरणावर हल्लाबोल
11
FD चे व्याजदर कमी झाल्याने बॉन्डमध्ये गुंतवणूक करताय? 'हे' ५ मोठे धोके तुम्हाला माहीत असायलाच हवेत
12
"इथं येऊन तुम्ही हुरडा खाल अन् परत जाल तर..."; भाजपा नेते सुधीर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
सीसीटीव्ही फोटो, व्हायरल व्हॉट्सअॅप चॅट्स; DSP कल्पना वर्मांनी सांगितलं मूळ प्रकरण काय?
14
सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून विराट-रोहितचं होणार डिमोशन? BCCI देणार मोठा धक्का, तर ‘या’ खेळाडूंना मिळणार प्रमोशन
15
"मला गुन्हा कबूल नाही." राज ठाकरेंचं कोर्टात उत्तर; न्यायाधीश म्हणाले, सहकार्य करा, काय घडलं?
16
ठंडा-ठंडा, कूल-कूल! मुंबई माथेरानपेक्षा थंड, राज्यातील बहुतांशी शहरं १० अंशावर
17
Mumbai Airport: मुंबई विमानतळाला धमकीचा ईमेल, 'या' विमानांत स्फोटकं, दर अर्ध्या तासाला उडवून देणार!
18
भयंकर! पूर्वांचल एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात; कॉन्स्टेबलच्या कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
'धुरंधर' पाहून भारावला हृतिक रोशन; म्हणाला, "सिनेमाचा विद्यार्थी म्हणून खूप काही शिकलो..."
20
"पाकिस्तानात मॉल कुठून आला?", 'धुरंधर'मधील 'ती' चूक नेटकऱ्यांनी पकडली, व्हिडीओ होतोय व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

"मला वाटलं 'टाटा'कडे गेल्यानंतर एअर इंडियाची सेवा सुधारली असेल, पण..."; शिवराज सिंह चौहानांची संतप्त पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 12:49 IST

केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी एअर इंडियातील सुविधांचा मुद्दा उपस्थित करत पोस्ट शेअर केली. त्यांनी त्यांच्यासोबत घडलेला प्रसंग सांगत संताप व्यक्त केला. 

"यापुढे तरी प्रवाशांना असा त्रास होणार नाही, यासाठी काही उपाययोजना एअर इंडियाचे व्यवस्थापन करणार आहे की, लवकर पोहचण्याच्या प्रवाशांच्या मजबुरीचा फायदा घेत राहणार आहे?", असा संतप्त सवाल केला आहे केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी! एअर इंडियाच्याविमानातूनशिवराज सिंह चौहान यांच्यासोबत एक प्रसंग घडला, तो त्यांनी सांगितला आणि एअर इंडियाच्या व्यवस्थापनाचे याकडे लक्ष वेधले.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

शिवराज सिंह चौहान यांनी एक पोस्ट लिहून आपला संताप व्यक्त केला. त्यांनी सगळा घटनाक्रम सांगितला आणि टाटा व्यवस्थापनाकडे गेल्यानंतर एअर इंडियाची सेवा सुधारली असेल, असे मला वाटले होते, पण घोर निराशा झाली, असे ते म्हणाले. 

शिवराज सिंह चौहान यांची पोस्ट वाचा जशीच्या तशी

"आज मला भोपाळवरून दिल्लीला यायचे होते. पुसा येथे कृषी मेळाव्याचे उद्घाटन, कुरुक्षेत्रमध्ये नैसर्गिक शेती मिशनची बैठक आणि चंदिगढमध्ये शेतकरी संघटनांच्या शिष्टमंडळांसोबत चर्चा करायची आहे."

"मी एअर इंडियाच्या फ्लाईट क्रमांक AI436मध्ये तिकीट आरक्षित केले होते. मला सीट क्रमांक ८सी आरक्षित झाला होता. मी जाऊन सीटवर बसलो. सीट तुटलेले होते आणि खड्डा पडलेला होता. मला बसण्यासाठी त्रासदायक होते."

"मी विमानातील कर्मचाऱ्यांना विचारले की, सीट खराब होते, तर आरक्षित का केले गेले? त्यांनी सांगितले की, यांची माहिती व्यवस्थापनाला आधीच देण्यात आली होती की, हे आसन चांगले नाहीये. याचे तिकीट विक्री करू नये. अशी एक नाही, तर अनेक आसने आहेत"

"विमानातील इतर काही प्रवाशांनी मला त्यांच्या सीट बदलून त्यांच्या सीटवर बसण्याचा आग्रह केला. पण, माझ्यासाठी मी इतरांना का त्रास देऊ? मी निर्णय घेतला की याच सीटवर बसून प्रवास पूर्ण करायचा."

"माझी अशी समजूत झाली होती की, टाटा व्यवस्थापनाकडे आल्यानंतर एअर इंडियाची सेवा चांगली झाली असेल, पण हा माझा भ्रम होता. मला झालेल्या त्रासाचे मला काही वाटत नाही. पण, प्रवाशांकडून पूर्ण पैसे घेऊन त्यांना खराब आणि त्रासदायक सीटवर बसवणे नैतिकतेला धरून नाही. हा प्रवाशांसोबत केलेला विश्वासघात नाहीये का?"

"यापुढे प्रवाशांना असा त्रास होणार नाही, यासाठी एअर इंडिया व्यवस्थापन काही उपाययोजना करणार आहे की, लवकर पोहचण्याच्या प्रवाशांच्या मजबुरीचा फायदा घेत राहणार आहे?", असा सवाल शिवराज सिंह चौहान यांनी केला.

टॅग्स :shivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानAir Indiaएअर इंडियाTataटाटाairplaneविमान