शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

"मला वाटलं 'टाटा'कडे गेल्यानंतर एअर इंडियाची सेवा सुधारली असेल, पण..."; शिवराज सिंह चौहानांची संतप्त पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 12:49 IST

केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी एअर इंडियातील सुविधांचा मुद्दा उपस्थित करत पोस्ट शेअर केली. त्यांनी त्यांच्यासोबत घडलेला प्रसंग सांगत संताप व्यक्त केला. 

"यापुढे तरी प्रवाशांना असा त्रास होणार नाही, यासाठी काही उपाययोजना एअर इंडियाचे व्यवस्थापन करणार आहे की, लवकर पोहचण्याच्या प्रवाशांच्या मजबुरीचा फायदा घेत राहणार आहे?", असा संतप्त सवाल केला आहे केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी! एअर इंडियाच्याविमानातूनशिवराज सिंह चौहान यांच्यासोबत एक प्रसंग घडला, तो त्यांनी सांगितला आणि एअर इंडियाच्या व्यवस्थापनाचे याकडे लक्ष वेधले.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

शिवराज सिंह चौहान यांनी एक पोस्ट लिहून आपला संताप व्यक्त केला. त्यांनी सगळा घटनाक्रम सांगितला आणि टाटा व्यवस्थापनाकडे गेल्यानंतर एअर इंडियाची सेवा सुधारली असेल, असे मला वाटले होते, पण घोर निराशा झाली, असे ते म्हणाले. 

शिवराज सिंह चौहान यांची पोस्ट वाचा जशीच्या तशी

"आज मला भोपाळवरून दिल्लीला यायचे होते. पुसा येथे कृषी मेळाव्याचे उद्घाटन, कुरुक्षेत्रमध्ये नैसर्गिक शेती मिशनची बैठक आणि चंदिगढमध्ये शेतकरी संघटनांच्या शिष्टमंडळांसोबत चर्चा करायची आहे."

"मी एअर इंडियाच्या फ्लाईट क्रमांक AI436मध्ये तिकीट आरक्षित केले होते. मला सीट क्रमांक ८सी आरक्षित झाला होता. मी जाऊन सीटवर बसलो. सीट तुटलेले होते आणि खड्डा पडलेला होता. मला बसण्यासाठी त्रासदायक होते."

"मी विमानातील कर्मचाऱ्यांना विचारले की, सीट खराब होते, तर आरक्षित का केले गेले? त्यांनी सांगितले की, यांची माहिती व्यवस्थापनाला आधीच देण्यात आली होती की, हे आसन चांगले नाहीये. याचे तिकीट विक्री करू नये. अशी एक नाही, तर अनेक आसने आहेत"

"विमानातील इतर काही प्रवाशांनी मला त्यांच्या सीट बदलून त्यांच्या सीटवर बसण्याचा आग्रह केला. पण, माझ्यासाठी मी इतरांना का त्रास देऊ? मी निर्णय घेतला की याच सीटवर बसून प्रवास पूर्ण करायचा."

"माझी अशी समजूत झाली होती की, टाटा व्यवस्थापनाकडे आल्यानंतर एअर इंडियाची सेवा चांगली झाली असेल, पण हा माझा भ्रम होता. मला झालेल्या त्रासाचे मला काही वाटत नाही. पण, प्रवाशांकडून पूर्ण पैसे घेऊन त्यांना खराब आणि त्रासदायक सीटवर बसवणे नैतिकतेला धरून नाही. हा प्रवाशांसोबत केलेला विश्वासघात नाहीये का?"

"यापुढे प्रवाशांना असा त्रास होणार नाही, यासाठी एअर इंडिया व्यवस्थापन काही उपाययोजना करणार आहे की, लवकर पोहचण्याच्या प्रवाशांच्या मजबुरीचा फायदा घेत राहणार आहे?", असा सवाल शिवराज सिंह चौहान यांनी केला.

टॅग्स :shivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानAir Indiaएअर इंडियाTataटाटाairplaneविमान