शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
3
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
4
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
5
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
6
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
7
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
8
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
9
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
10
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
11
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण
12
"त्याला उचकी आली आणि...", 'अशी ही बनवा बनवी'मधील शंतनूचं असं झालं निधन, पत्नीचा खुलासा
13
वाद-प्रतिवाद सुरू असलेल्या भारताला आज स्वीकारमंत्र अंगीकारण्याची गरज -मोरारीबापू
14
Prithvi Shaw: सपना गिल विनयभंग प्रकरणात न्यायालयाने पृथ्वी शॉला ठोठावला १०० रुपयांचा दंड!
15
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
16
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
17
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
18
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
19
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
20
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल

"मला वाटलं 'टाटा'कडे गेल्यानंतर एअर इंडियाची सेवा सुधारली असेल, पण..."; शिवराज सिंह चौहानांची संतप्त पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 12:49 IST

केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी एअर इंडियातील सुविधांचा मुद्दा उपस्थित करत पोस्ट शेअर केली. त्यांनी त्यांच्यासोबत घडलेला प्रसंग सांगत संताप व्यक्त केला. 

"यापुढे तरी प्रवाशांना असा त्रास होणार नाही, यासाठी काही उपाययोजना एअर इंडियाचे व्यवस्थापन करणार आहे की, लवकर पोहचण्याच्या प्रवाशांच्या मजबुरीचा फायदा घेत राहणार आहे?", असा संतप्त सवाल केला आहे केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी! एअर इंडियाच्याविमानातूनशिवराज सिंह चौहान यांच्यासोबत एक प्रसंग घडला, तो त्यांनी सांगितला आणि एअर इंडियाच्या व्यवस्थापनाचे याकडे लक्ष वेधले.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

शिवराज सिंह चौहान यांनी एक पोस्ट लिहून आपला संताप व्यक्त केला. त्यांनी सगळा घटनाक्रम सांगितला आणि टाटा व्यवस्थापनाकडे गेल्यानंतर एअर इंडियाची सेवा सुधारली असेल, असे मला वाटले होते, पण घोर निराशा झाली, असे ते म्हणाले. 

शिवराज सिंह चौहान यांची पोस्ट वाचा जशीच्या तशी

"आज मला भोपाळवरून दिल्लीला यायचे होते. पुसा येथे कृषी मेळाव्याचे उद्घाटन, कुरुक्षेत्रमध्ये नैसर्गिक शेती मिशनची बैठक आणि चंदिगढमध्ये शेतकरी संघटनांच्या शिष्टमंडळांसोबत चर्चा करायची आहे."

"मी एअर इंडियाच्या फ्लाईट क्रमांक AI436मध्ये तिकीट आरक्षित केले होते. मला सीट क्रमांक ८सी आरक्षित झाला होता. मी जाऊन सीटवर बसलो. सीट तुटलेले होते आणि खड्डा पडलेला होता. मला बसण्यासाठी त्रासदायक होते."

"मी विमानातील कर्मचाऱ्यांना विचारले की, सीट खराब होते, तर आरक्षित का केले गेले? त्यांनी सांगितले की, यांची माहिती व्यवस्थापनाला आधीच देण्यात आली होती की, हे आसन चांगले नाहीये. याचे तिकीट विक्री करू नये. अशी एक नाही, तर अनेक आसने आहेत"

"विमानातील इतर काही प्रवाशांनी मला त्यांच्या सीट बदलून त्यांच्या सीटवर बसण्याचा आग्रह केला. पण, माझ्यासाठी मी इतरांना का त्रास देऊ? मी निर्णय घेतला की याच सीटवर बसून प्रवास पूर्ण करायचा."

"माझी अशी समजूत झाली होती की, टाटा व्यवस्थापनाकडे आल्यानंतर एअर इंडियाची सेवा चांगली झाली असेल, पण हा माझा भ्रम होता. मला झालेल्या त्रासाचे मला काही वाटत नाही. पण, प्रवाशांकडून पूर्ण पैसे घेऊन त्यांना खराब आणि त्रासदायक सीटवर बसवणे नैतिकतेला धरून नाही. हा प्रवाशांसोबत केलेला विश्वासघात नाहीये का?"

"यापुढे प्रवाशांना असा त्रास होणार नाही, यासाठी एअर इंडिया व्यवस्थापन काही उपाययोजना करणार आहे की, लवकर पोहचण्याच्या प्रवाशांच्या मजबुरीचा फायदा घेत राहणार आहे?", असा सवाल शिवराज सिंह चौहान यांनी केला.

टॅग्स :shivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानAir Indiaएअर इंडियाTataटाटाairplaneविमान