शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

शिवसेनेकडून 10 रुपयांत जेवण, 'साहेब खाना' योजना सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2019 12:57 IST

गरिबांना पोटभर जेवण मिळावे यासाठी फक्त 10 रुपयांत थाळी देण्याचे वचन दिले आहे.

ठळक मुद्देजम्मू काश्मीरमध्ये गरजू लोकांसाठी 10 रुपयांत 'साहेब खाना' योजना सुरू करण्यात आली आहे. शिवसेना भवनात गरजू लोकांना 10 रुपयांत या सेवेचा लाभ घेता येणार आहे. 'साहेब खाना' मध्ये राजमा, भात, पुरी आणि चण्याची भाजी अशा पदार्थांची व्यवस्था करण्यात येणार आहे.

नवी दिल्ली - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरील शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात सर्वसामान्य नागरिकांसाठी काही महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. युतीची सत्ता राज्यात आल्यानंतर 10 रुपयांत सामान्य माणसांना सकस जेवण दिले जाईल. एक रुपयात हृदयरोग आणि अन्य आरोग्य चाचण्या करण्यासाठी केंद्र उभे केले जाईल, असे आश्वासन दिले आहे. गरिबांना पोटभर जेवण मिळावे यासाठी फक्त 10 रुपयांत थाळी देण्याचे वचन दिले आहे. याचाच आदर्श घेत जम्मू काश्मीरमध्ये गरजू लोकांसाठी 10 रुपयांत 'साहेब खाना' योजना सुरू करण्यात आली आहे. 

शिवसेनेचे जम्मू-कश्मीर प्रदेशाध्यक्ष मनीष सहानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मूमध्ये 'साहेब खाना' योजनेचे उद्घाटन करण्यात आले असून शिवसेना भवनात गरजू लोकांना 10 रुपयांत या सेवेचा लाभ घेता येणार आहे. दरदिवशी 500 लोकांसाठी दहा रुपयाप्रमाणे 'साहेब खाना' मध्ये राजमा, भात, पुरी आणि चण्याची भाजी अशा पदार्थांची व्यवस्था करण्यात येणार आहे. जम्मूचे राजकीय मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल, श्री महाराजा गुलाब सिंह हॉस्पिटल व जम्मू तवी रेल्वे स्टेशनवर देखील या योजनेअंतर्गत 10 रुपयांत पोटभर जेवण सुरू करण्यात येणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

शिवसेनेने वचननाम्यात दिलेल्या 10 रुपयांमध्ये जेवण या आश्वासनाची सर्वाधिक चर्चा होत आहे. शिववडा 12 रुपयाला मिळत असताना 10 रुपयांत जेवण कसे देणार अशी टीका विरोधकांकडून शिवसेनेवर होत आहे. यावर शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी काही दिवसांपूर्वी भाष्य केले होते. 

'वचननामा जाहीर करण्यापूर्वी तज्ज्ञांशी आणि अर्थतज्ज्ञांशी बोलून 10 रुपयांची भोजन थाळी देण्याचा निर्णय झाला आहे. मराठमोळ्या जेवणात 1-2 चपाती, 2-3 भाजी, वरण भात या एका थाळीचा खर्च 40 रुपये आहे. सरकारमध्ये आम्ही आल्यानंतर ही योजना लागू करू. यामध्ये 10 रुपये ग्राहक देईल तर 30 रुपये सरकार अनुदान देईल. वर्षाकाळी 1 हजार कोटी रुपये या योजनेला खर्च येईल. महाराष्ट्रात कोणीही उपाशी राहणार नाही अशी ही योजना आहे. वाढलेल्या उत्पन्नातून हा खर्च केला जाईल त्यासाठी वेगळा कर लादला जाणार नाही. अन्न, वस्त्र आणि निवारा या मुलभूत गरजा आहे. त्यामुळे अन्नावर सध्या आम्ही भर दिला आहे' असे सुभाष देसाई यांनी म्हटले आहे. 

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाJammu Kashmirजम्मू-काश्मीरUddhav Thackerayउद्धव ठाकरे