शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

शिवसेनेकडून 10 रुपयांत जेवण, 'साहेब खाना' योजना सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2019 12:57 IST

गरिबांना पोटभर जेवण मिळावे यासाठी फक्त 10 रुपयांत थाळी देण्याचे वचन दिले आहे.

ठळक मुद्देजम्मू काश्मीरमध्ये गरजू लोकांसाठी 10 रुपयांत 'साहेब खाना' योजना सुरू करण्यात आली आहे. शिवसेना भवनात गरजू लोकांना 10 रुपयांत या सेवेचा लाभ घेता येणार आहे. 'साहेब खाना' मध्ये राजमा, भात, पुरी आणि चण्याची भाजी अशा पदार्थांची व्यवस्था करण्यात येणार आहे.

नवी दिल्ली - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरील शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात सर्वसामान्य नागरिकांसाठी काही महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. युतीची सत्ता राज्यात आल्यानंतर 10 रुपयांत सामान्य माणसांना सकस जेवण दिले जाईल. एक रुपयात हृदयरोग आणि अन्य आरोग्य चाचण्या करण्यासाठी केंद्र उभे केले जाईल, असे आश्वासन दिले आहे. गरिबांना पोटभर जेवण मिळावे यासाठी फक्त 10 रुपयांत थाळी देण्याचे वचन दिले आहे. याचाच आदर्श घेत जम्मू काश्मीरमध्ये गरजू लोकांसाठी 10 रुपयांत 'साहेब खाना' योजना सुरू करण्यात आली आहे. 

शिवसेनेचे जम्मू-कश्मीर प्रदेशाध्यक्ष मनीष सहानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मूमध्ये 'साहेब खाना' योजनेचे उद्घाटन करण्यात आले असून शिवसेना भवनात गरजू लोकांना 10 रुपयांत या सेवेचा लाभ घेता येणार आहे. दरदिवशी 500 लोकांसाठी दहा रुपयाप्रमाणे 'साहेब खाना' मध्ये राजमा, भात, पुरी आणि चण्याची भाजी अशा पदार्थांची व्यवस्था करण्यात येणार आहे. जम्मूचे राजकीय मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल, श्री महाराजा गुलाब सिंह हॉस्पिटल व जम्मू तवी रेल्वे स्टेशनवर देखील या योजनेअंतर्गत 10 रुपयांत पोटभर जेवण सुरू करण्यात येणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

शिवसेनेने वचननाम्यात दिलेल्या 10 रुपयांमध्ये जेवण या आश्वासनाची सर्वाधिक चर्चा होत आहे. शिववडा 12 रुपयाला मिळत असताना 10 रुपयांत जेवण कसे देणार अशी टीका विरोधकांकडून शिवसेनेवर होत आहे. यावर शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी काही दिवसांपूर्वी भाष्य केले होते. 

'वचननामा जाहीर करण्यापूर्वी तज्ज्ञांशी आणि अर्थतज्ज्ञांशी बोलून 10 रुपयांची भोजन थाळी देण्याचा निर्णय झाला आहे. मराठमोळ्या जेवणात 1-2 चपाती, 2-3 भाजी, वरण भात या एका थाळीचा खर्च 40 रुपये आहे. सरकारमध्ये आम्ही आल्यानंतर ही योजना लागू करू. यामध्ये 10 रुपये ग्राहक देईल तर 30 रुपये सरकार अनुदान देईल. वर्षाकाळी 1 हजार कोटी रुपये या योजनेला खर्च येईल. महाराष्ट्रात कोणीही उपाशी राहणार नाही अशी ही योजना आहे. वाढलेल्या उत्पन्नातून हा खर्च केला जाईल त्यासाठी वेगळा कर लादला जाणार नाही. अन्न, वस्त्र आणि निवारा या मुलभूत गरजा आहे. त्यामुळे अन्नावर सध्या आम्ही भर दिला आहे' असे सुभाष देसाई यांनी म्हटले आहे. 

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाJammu Kashmirजम्मू-काश्मीरUddhav Thackerayउद्धव ठाकरे