हैदराबाद - राम मंदिराच्या मुद्द्यावरून ओवैसी आणि शिवसेना यांच्यात जोरदार वाकयुद्ध सुरू झाले आहे. "शिवसेनेला पंतप्रधान नरेंद्र मोदींना घाबरते. त्यामुळे त्यांनी आपला जनाधार टीकवण्यासाठी अग्रलेखांच्या माध्यमातून मोदींवर टीका करण्याची रणनीती अवलंबली आहे, अशी टीका ओवैसी यांनी केली आहे. तसेच, शिवसेनेमध्ये हिंमत असेल तर त्यांनी अग्रलेख लिहायचे थांबवून नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधून बाहेर पडून दाखवावे. असे आव्हान ओवैसी यांनी दिले आहे.
हिंमत असेल तर अग्रलेखांची लेखणी मोडा आणि सत्ता सोडा, ओवेसींचे शिवसेनेला आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2018 16:16 IST