शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

Maharashtra Government : शिवसेनेच्या खासदारांनाही वाटते भाजपासोबत सरकार व्हावे! - रामदास आठवले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 18:38 IST

Maharashtra News : गेल्या २५ दिवसांपासून महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी राजकीय पक्षांमध्ये विविध स्तरावर चर्चा सुरू आहे.

नवी दिल्ली : मी शिवसेनेच्या काही खासदारांशी चर्चा केली. त्यांनाही वाटते महाराष्ट्रात भाजपासोबत सरकार व्हावे. तीन आणि दोन वर्षे असा फॉर्म्युला असावा असे मला वाटते. लवकरच या दिशेने चर्चा होऊ शकते अशी माहिती केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले यांनी लोकमतशी बोलताना दिली. 

गेल्या २५ दिवसांपासून महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी राजकीय पक्षांमध्ये विविध स्तरावर चर्चा सुरू आहे. या चर्चेच्या धुराळ्यात केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले यांनी नवाच फॉर्म्युला देऊन या चर्चेत रंगत आणली आहे. मुख्यमंत्रीपदावरून उत्पन्न झालेला तिढा सोडविण्यासाठी ३ वर्षांसाठी भाजपाला मुख्यमंत्रीपद द्यावे व उर्वरित दोन वर्षे शिवसेनेने हे पद घ्यावे, अशी सूचना त्यांनी केली आहे.

आठवले म्हणाले, या फॉर्म्युल्यावर लोकसभेतील शिवसेनेचे गटनेते विनायक राऊत यांच्याशी बोलणे झाले आहे. तीन-दोनचा फॉर्म्युला भाजपाला मान्य आहे काय? हे आधी स्पष्ट झाले पाहिजे, असे खासदार राऊत यांनी विचारले आहे.  सेनेच्या ब-याच खासदारांशीही मी या मुद्यावर बोललो. या फॉर्म्युल्याला भाजपाची मान्यता असेल तर आमचा पक्ष यासाठी सहमत होईल, असे मत खासदारांनी व्यक्त केले. खासदार राहुल शेवाळे, खासदार श्रीकांत शिंदे, खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्यासह पाच-सहा खासदारांशी या मुद्यावर चर्चा झाल्याचा दावा आठवले यांनी केला.  

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्याशीही या फॉर्म्युल्यावर चर्चा झाल्याचे आठवले यांनी सांगितले. भाजपाच्या वरिष्ठ पातळीवर होणा-या निर्णयाला प्रदेश भाजपा बांधिल असल्याचे पाटील यांचे मत असल्याचे आठवले यांनी सांगितले.

तिढा लवकर सुटेल- शाहमहाराष्ट्रातील तिढा लवकरच सुटेल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला आहे. हिवाळी अधिवेशनाच्यापूर्वी सर्वपक्षीय बैठकीच्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी आठवले यांनी चर्चा केली. महाराष्ट्रातील  तिढा लवकर सोडवावा, अशी विनंती शाह यांना केली. चिंता करू नका, सर्व काही ठिक होईल, असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केल्याचे आठवले यांनी सांगितले. 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेMaharashtraमहाराष्ट्रBJPभाजपाShiv SenaशिवसेनाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019