शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

Maharashtra Government : शिवसेनेच्या खासदारांनाही वाटते भाजपासोबत सरकार व्हावे! - रामदास आठवले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 18:38 IST

Maharashtra News : गेल्या २५ दिवसांपासून महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी राजकीय पक्षांमध्ये विविध स्तरावर चर्चा सुरू आहे.

नवी दिल्ली : मी शिवसेनेच्या काही खासदारांशी चर्चा केली. त्यांनाही वाटते महाराष्ट्रात भाजपासोबत सरकार व्हावे. तीन आणि दोन वर्षे असा फॉर्म्युला असावा असे मला वाटते. लवकरच या दिशेने चर्चा होऊ शकते अशी माहिती केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले यांनी लोकमतशी बोलताना दिली. 

गेल्या २५ दिवसांपासून महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी राजकीय पक्षांमध्ये विविध स्तरावर चर्चा सुरू आहे. या चर्चेच्या धुराळ्यात केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले यांनी नवाच फॉर्म्युला देऊन या चर्चेत रंगत आणली आहे. मुख्यमंत्रीपदावरून उत्पन्न झालेला तिढा सोडविण्यासाठी ३ वर्षांसाठी भाजपाला मुख्यमंत्रीपद द्यावे व उर्वरित दोन वर्षे शिवसेनेने हे पद घ्यावे, अशी सूचना त्यांनी केली आहे.

आठवले म्हणाले, या फॉर्म्युल्यावर लोकसभेतील शिवसेनेचे गटनेते विनायक राऊत यांच्याशी बोलणे झाले आहे. तीन-दोनचा फॉर्म्युला भाजपाला मान्य आहे काय? हे आधी स्पष्ट झाले पाहिजे, असे खासदार राऊत यांनी विचारले आहे.  सेनेच्या ब-याच खासदारांशीही मी या मुद्यावर बोललो. या फॉर्म्युल्याला भाजपाची मान्यता असेल तर आमचा पक्ष यासाठी सहमत होईल, असे मत खासदारांनी व्यक्त केले. खासदार राहुल शेवाळे, खासदार श्रीकांत शिंदे, खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्यासह पाच-सहा खासदारांशी या मुद्यावर चर्चा झाल्याचा दावा आठवले यांनी केला.  

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्याशीही या फॉर्म्युल्यावर चर्चा झाल्याचे आठवले यांनी सांगितले. भाजपाच्या वरिष्ठ पातळीवर होणा-या निर्णयाला प्रदेश भाजपा बांधिल असल्याचे पाटील यांचे मत असल्याचे आठवले यांनी सांगितले.

तिढा लवकर सुटेल- शाहमहाराष्ट्रातील तिढा लवकरच सुटेल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला आहे. हिवाळी अधिवेशनाच्यापूर्वी सर्वपक्षीय बैठकीच्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी आठवले यांनी चर्चा केली. महाराष्ट्रातील  तिढा लवकर सोडवावा, अशी विनंती शाह यांना केली. चिंता करू नका, सर्व काही ठिक होईल, असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केल्याचे आठवले यांनी सांगितले. 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेMaharashtraमहाराष्ट्रBJPभाजपाShiv SenaशिवसेनाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019