शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

Pulwama Attack: संसदेचं संयुक्त अधिवेशन बोलवा; शिवसेनेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2019 17:23 IST

दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी

नवी दिल्ली: पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर शिवसेनेनं संसदेचं संयुक्त अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे. काश्मीरच्या अवंतीपुरामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर चर्चा करण्यासाठी संसदेचं अधिवेशन बोलवा, अशी मागणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली. काल पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला. यामध्ये 38 जवान शहीद झाले. या हल्ल्याचा देशभरातून निषेध करण्यात येत आहे. देशाच्या पंतप्रधानांपासून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सर्वांनीच दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याचा निषेध केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला स्पष्ट शब्दांमध्ये पाकिस्तानला इशारा दिला आहे. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सर्जिकल स्ट्राइकच्याही पुढे जाऊन पाकिस्तानचा सोक्षमोक्ष लावण्याची मागणी केली. आता हल्लेखोरांना सोडणार नाही, असं नुसतंच बोलू नका. निवडणुकांचा प्रचार जाऊ द्या, पाकिस्तानचा सोक्षमोक्ष लावा. पाकिस्तानला धडा शिकवा, अशी मागणी उद्धव यांनी केली. 2016 मध्ये भारतीय सैन्यानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राइक केला होता. या कारवाईदरम्यान भारतीय सैन्यानं दहशतवाद्यांचा खात्मा करत त्यांचे लॉन्चिंग पॅड्स उद्ध्वस्त केले होते. याचा संदर्भ देत उद्धव यांनी त्यापेक्षाही कठोर कारवाईची मागणी केली. दोन वर्षांपूर्वी करण्यात आलेला सर्जिकल स्ट्राईक पाकव्याप्त काश्मीरमध्ये करण्यात आला होता. तो भारताचाच भाग आहे. मात्र आता त्यापेक्षा पुढे जाण्याची गरज असल्याचं उद्धव म्हणाले. सध्या सरकारकडून देशातील जनतेला शांतता राखण्याचं आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे. मात्र पूर्ण देश शांतच आहे. शांत राहण्याशिवाय देशातील जनता आणखी काय करु शकते? पण तुम्ही का शांत आहात?, असा सवाल उद्धव यांनी सरकारला विचारला. पाकिस्तानात घुसा आणि मोठी कारवाई करा. संपूर्ण देश सरकारच्या मागे आहे. पाकिस्तानमध्ये घुसून त्यांना धडा शिकवायची हीच वेळ आहे, असंदेखील त्यांनी म्हटलं. काल काश्मीरच्या पुलवामामधील अवंतीपुरामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला झाला. तब्बल अडीच हजार जवान ड्युटीवर परतत असताना स्फोटकांनी भरलेल्या एका कारनं जवानांच्या एका बसला जोरदार धडक दिली. गाडीत तब्बल 350 किलो स्फोटकं असल्यानं बसला धडक देताच मोठा स्फोट झाला. त्याची तीव्रता इतकी जास्त होती की, त्याचा आवाज 2 ते 3 किलोमीटरपर्यंत ऐकू आला. या हल्ल्यात सीआरपीएफचे 38 जवान शहीद झाले. तर अनेक जवान गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. 

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाSanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाTerror Attackदहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरUddhav Thackerayउद्धव ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदी