शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

"प्रतोद बदलल्याच्या ठरावात मोठी चूक", ठाकरे गटानं गोगावलेंच्या नियुक्तीचं पत्रच कोर्टात दाखवलं अन् शिंदेंना खिंडीत गाठलं!

By मोरेश्वर येरम | Updated: February 28, 2023 13:21 IST

राज्याच्या सत्तासंघर्षाची सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू असून ठाकरे गटाकडून जोरदार युक्तिवाद सुरू आहे.

नवी दिल्ली-

राज्याच्या सत्तासंघर्षाची सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू असून ठाकरे गटाकडून जोरदार युक्तिवाद सुरू आहे. गेल्या आठवड्यात जवळपास अडीच दिवस ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी बाजू मांडल्यानंतर अभिषेक मनु सिंघवी यांनी आज तासभर युक्तिवाद केला. यानंतर ठाकरे गटाचे तिसरे वकील देवदत्त कामत युक्तिवाद करत आहे. आपण प्रतोदाच्या नियुक्तीबाबत मुद्द्यावर युक्तिवाद करणार असल्याचं देवदत्त कामत यांनी सरन्यायाधीशांना सुरुवातीलाच निदर्शनास आणून दिलं. त्यानंतर युक्तिवादाला सुरुवात करताच शिंदे गटावर मोठा बॉम्ब टाकला. 

शिंदे गटानं गुवाहाटीमध्ये बसून पक्ष प्रतोद बदलत आमदार भरत गोगावले यांची प्रतोदपती नियुक्ती केली होती. याबाबतचं शिंदे गटानं सादर केलेलं पत्रच देवदत्त कामत यांनी कोर्टासमोर सादर केलं. यात शिंदे गटाकडून लेटरपॅडवर शिवसेना विधीमंडळ पक्ष असा उल्लेख केला गेला असल्याचं देवदत्त कामत यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं. 

"व्हीप ठरवण्याचा किंवा बदलण्याचा संसदीय कामकाजाशी काहीही संबंध नाही. व्हीप राजकीय पक्षाकडूनच नियुक्त केला जातो. शिंदे यांनी दिलेलं पत्र राजकीय पक्षाचं नसून विधीमंडळ पक्षाचं आहे. त्यामुळे हे फक्त प्रक्रियात्मक अनियमिततेचे प्रकरण नाही तर घटनात्मक बेकायदेशीरतेचं प्रकरण आहे", असा खणखणीत युक्तिवाद देवदत्त कामत यांनी कोर्टात केला आहे. तसंच ३ जुलै २०२२ रोजी सभापतींचा निर्णय विधीमंडळाच्या कार्यवाहीत नाही, असंही देवदत्त कामत म्हणाले. 

जे कोर्टाचं देखील काम नाही, ते राज्यपालांनी कसं काय केलं?; ठाकरे गटाच्या वकिलांनी ठेवलं वर्मावर बोट!

"राजकीय पक्ष म्हणजे नेमकं काय? शेवटी, राजकीय पक्षाचे निर्णय त्यांच्या नेतृत्वाद्वारेच घेतले जातात आणि शिवसेनेबाबत इथं बोलायचं झालं तर पक्षाचं नेतृत्व कोण करतंय हे २०१८ साली झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या पत्रकातून निवडणूक आयोगाला कळवण्यात आलं आहे", असा युक्तिवाद देवदत्त कामत यांनी केला आहे. 

निवडणूक आयोगाकडून विनाशकारी निर्णयराजकीय पक्षाची एक संरचना असते जी घटनेच्या १० व्या सूचीतही नमूद आहे. त्यानुसारच शिवसेनेचं काम होत आलं आहे. सदस्य कोण आहेत, नेतृत्व रचना काय आहे याची सर्व माहिती शिवसेनेत आहे. पक्षात कोणतीही विसंगती नाही. नेतृत्वाने दिलेले आदेशच पक्षातील सदस्यांसाठी दिशादर्शक असतात. मग पक्षांतर्गत वाद असताना मीच राजकीय पक्ष आहे आणि मी दहाव्या शेड्यूल अंतर्गत आमदार असा स्वत:चा बचाव करू शकतात का?, असा सवाल देवदत्त कामत यांनी केला.

आमदारांवर अपात्रतेची कारवाई होऊ शकत नाही असा युक्तिवाद मान्य केल्यास, यामुळे संविधानाच्या कामकाजात अडथळा येईल. निवडणूक आयोगानं दिलेला निर्णय एकतर्फी आहे. आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार असूनही XYZ ला राजकीय पक्ष म्हणून घोषीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचे परिणाम भविष्यात विनाशकारी होतील, असा जोरदार युक्तिवाद देवदत्त कामत यांनी केला आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे