शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
2
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
3
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
4
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
5
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
6
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
7
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
8
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
9
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
10
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
11
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
12
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
13
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
14
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
15
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
16
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
17
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
18
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत
19
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
20
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!

केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 14:06 IST

Shashi Tharoor: दहशतवादाविरोधातील भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी केंद्र सरकारने सात सदस्यीय सर्वपक्षीय शिष्टमंडळाची स्थापना केली आहे. हे शिष्टमंडळ जगभरातील प्रमुख देशांचा दौरा करून तेथे भारताची भूमिका स्पष्टपणे मांडणार आहे. मात्र या शिष्टमंडळामध्ये शशी थरूर यांचा समावेश करण्यात आल्याने काँग्रेस अवाक् झाली आहे.

पहलगाममध्ये झालेला दहशतवादी हल्ला, त्यानंतर भारतीय सैन्य दलांनी ऑपरेशन सिंदूर राबवत त्याचा घेतलेला बदला, पुढे भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेला संघर्ष आणि युद्धविराम, या सर्व घडामोडींमुळे भारतीय उपखंडामध्ये मागच्या महिनाभरापासून कमालीचं तणावपूर्ण वातावरण निर्माण झालेलं आहे. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरही भारताकडून पाकिस्तान आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाविरोधात आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. दरम्यान, दहशतवादाविरोधातील भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी केंद्र सरकारने सात सदस्यीय सर्वपक्षीय शिष्टमंडळाची स्थापना केली आहे. हे शिष्टमंडळ जगभरातील प्रमुख देशांचा दौरा करून तेथे भारताची भूमिका स्पष्टपणे मांडणार आहे. मात्र या शिष्टमंडळामध्ये शशी थरूर यांचा समावेश करण्यात आल्याने काँग्रेस अवाक् झाली आहे. आपण दिलेल्या चार नावांपैकी कुणाचाच या शिष्टमंडळात समावश केलेला नाही, असे काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी म्हटले आहे.

याबाबत प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश म्हणाले की, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी १६ मे रोजी सकाळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना फोन केला होता. त्यात त्यांनी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाबाबत भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी परदेशात पाठवण्यात येणाऱ्या सर्वपक्षीय शिष्टमंडळामध्ये समावेश करण्यासाठी चार नावं सुचवण्यास सांगितले होते. त्यानुसार मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांनी संसदीय कार्यमंत्र्यांना पत्र लिहून आनंद शर्मा, गौरव गोगोई, सय्यद नासिर हुसेन आणि राजा बरार यांची नावं सूचवली होती. मात्र केंद्र सरकारने या चारही नावांना वगळून काँग्रेस पक्षाच्या वतीने शशी थरूर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

दरम्यान, या सर्वपक्षीय शिष्टमंडळाचं नेतृत्व शशी थरूर हे करणार असून. या शिष्टमंडळामध्ये भाजपाचे रविशंकर प्रसाद आणि बैजयंत पांडा, जेडीयूचे संजय कुमार झा, डीएमकेच्या कनिमोळी, शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे आणि शिवसेना शिंदे गटाचे श्रीकांत शिंदे यांचा समावेश आहे.

दहशतवादाबाबत भारताची झीरो टॉलरेंस धोरण जगापर्यंत पोहचवणे, हा हे शिष्टमंडळ पाठवण्यामागचा मुख्य हेतू आहे. या शिष्टमंडळामध्ये सर्व प्रमुख पक्षातील राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला आहे. त्यामाध्यमातून दहशतवादाविरोधात भारत एकजूट आहे असे संकेत दिले जात आहेत. संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून याची माहिती दिली. त्यांनी म्हटलं की, सर्वात महत्त्वाच्या क्षणी भारत एकजूट उभा राहतो. ७ सदस्यीय शिष्टमंडळ लवकरच प्रमुख देशांचा दौरा करेल. तिथे दहशतवादाविरोधात भारताच्या धोरण स्पष्ट करेल. राजकारण आणि मतभेद यापेक्षा राष्ट्रीय एकता शक्तीशाली प्रतिक असल्याचं त्यांनी सांगितले. याबाबत मिळत असलेल्या अधिक माहितीनुसार, हे शिष्टमंडळ अमेरिका, ब्रिटन, दक्षिण आफ्रिका, कतार आणि संयुक्त अरब अमीरातसारख्या देशांचा दौरा करणार आहे. हा परदेश दौरा २२ मे पासून सुरू होण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरCentral Governmentकेंद्र सरकारcongressकाँग्रेसBJPभाजपाShashi Tharoorशशी थरूर