शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
3
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
4
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
5
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
6
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
7
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
8
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
9
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
10
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
11
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
12
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
13
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
14
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
15
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
16
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
17
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
18
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
19
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
20
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव

गेल्या ५ वर्षांत देशद्रोहात ४७२ तर, UAPA चे तब्बल ७२४३ जण अटकेत; शिक्षेचे प्रमाण केवळ ३ टक्के

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2022 12:12 IST

देशद्रोहाच्या कायद्याचा गैरवापर होत असल्याची टीका विरोधकांकडून सातत्याने केली जाते.

नवी दिल्ली: दिल्ली दंगलीप्रकरणातील आरोपी शर्जील इमामवर देशद्रोह आणि यूएपीएसह अन्य कलमे लावण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतर आता याबाबत मोठी चर्चा देशभरात सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. तसेच यानिमित्ताने समोर आलेल्या एका आकडेवारीनुसार, गेल्या ५ वर्षांच्या कालावधीत देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली ४७२ जणांना तर यूएपीएच्या गुन्ह्याखाली तब्बल ७ हजार २४३ जणांना अटक करण्यात आली. मात्र, दोषसिद्धी होऊन शिक्षा झालेल्यांचे प्रमाण केवळ ३ टक्के असल्याचे पाहायला मिळत आहे. 

या दोन्ही कायद्यांच्या वापराबाबत विरोधकांकडून नेहमी प्रश्न उपस्थित झाल्याचे दिसून येते. सन २०१९ मध्ये यूएपीए कायद्यातील दुरुस्तीवरून विरोधकांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. २०१४ ते २०२० या कालावधीत देशद्रोहाच्या कलमाखाली ३२२ गुन्हे नोंद करण्यात आले. यामध्ये ४७२ जणांना अटक करण्यात आली. यापैकी केवळ १२ जणांना शिक्षा ठोठावण्यात आली. तसेच यूएपीए कायद्याखाली याच कालावधीत ५ हजार ०२७ गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये तब्बल ७ हजार २४३ जणांना अटक करण्यात आली. विशेष म्हणजे दोषसिद्धी होऊन केवळ २१२ लोकांना शिक्षा सुनावण्यात आली. 

शर्जीलवरील सुनावणीमुळे आकडेवारी चर्चेत

अ‍ॅडिशनल सेशन जज अमिताभ रावत यांनी हानिर्णय दिला आहे. त्यांनी दिलेल्या आदेशानुसार, शरजील इमामलवर आयपीसीच्या सेक्शन १२५अ (देशद्रोह), १५३अ, १५३ब आणि ५०५ आणि UAPA च्या सेक्शन १३ अंतर्गत गुन्हा दाखल होईल. २०१९ च्या डिसेंबर महिन्यात देण्यात आलेल्या भाषणांसाठी शर्जील इमामला ट्रायलचा सामना करावा लागणार आहे. शर्जीलची ती भाषणे न्यायालयाने भडकाऊ अथवा चिथावणीखोर असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, सरकारच्या टीकाकारांविरोधात देशद्रोहाचा कायदा वापरला जात असल्याचा संदर्भ देत देशद्रोहासंदर्भातील कायदा संपुष्टात आणण्याचा आणि व्यक्ती स्वातंत्र्याला पूर्ण परावनगी देण्याची हीच योग्य वेळ आहे, असे न्या. नरीमन यांनी अलीकडेच म्हटले होते. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करणाऱ्यांविरोधात देशद्रोहाचा कायदा वापरुन खटले दाखल केले जात आहेत. मात्र त्याचवेळेस चुकीची भाषा वापरणाऱ्यांविरोधात कारवाई होताना दिसत नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली होती.  

टॅग्स :seditionदेशद्रोहCentral Governmentकेंद्र सरकार