शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
7
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
8
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
9
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
10
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
11
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
12
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
13
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
14
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
15
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
16
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
17
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
18
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
19
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
20
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...

गेल्या ५ वर्षांत देशद्रोहात ४७२ तर, UAPA चे तब्बल ७२४३ जण अटकेत; शिक्षेचे प्रमाण केवळ ३ टक्के

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2022 12:12 IST

देशद्रोहाच्या कायद्याचा गैरवापर होत असल्याची टीका विरोधकांकडून सातत्याने केली जाते.

नवी दिल्ली: दिल्ली दंगलीप्रकरणातील आरोपी शर्जील इमामवर देशद्रोह आणि यूएपीएसह अन्य कलमे लावण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतर आता याबाबत मोठी चर्चा देशभरात सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. तसेच यानिमित्ताने समोर आलेल्या एका आकडेवारीनुसार, गेल्या ५ वर्षांच्या कालावधीत देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली ४७२ जणांना तर यूएपीएच्या गुन्ह्याखाली तब्बल ७ हजार २४३ जणांना अटक करण्यात आली. मात्र, दोषसिद्धी होऊन शिक्षा झालेल्यांचे प्रमाण केवळ ३ टक्के असल्याचे पाहायला मिळत आहे. 

या दोन्ही कायद्यांच्या वापराबाबत विरोधकांकडून नेहमी प्रश्न उपस्थित झाल्याचे दिसून येते. सन २०१९ मध्ये यूएपीए कायद्यातील दुरुस्तीवरून विरोधकांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. २०१४ ते २०२० या कालावधीत देशद्रोहाच्या कलमाखाली ३२२ गुन्हे नोंद करण्यात आले. यामध्ये ४७२ जणांना अटक करण्यात आली. यापैकी केवळ १२ जणांना शिक्षा ठोठावण्यात आली. तसेच यूएपीए कायद्याखाली याच कालावधीत ५ हजार ०२७ गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये तब्बल ७ हजार २४३ जणांना अटक करण्यात आली. विशेष म्हणजे दोषसिद्धी होऊन केवळ २१२ लोकांना शिक्षा सुनावण्यात आली. 

शर्जीलवरील सुनावणीमुळे आकडेवारी चर्चेत

अ‍ॅडिशनल सेशन जज अमिताभ रावत यांनी हानिर्णय दिला आहे. त्यांनी दिलेल्या आदेशानुसार, शरजील इमामलवर आयपीसीच्या सेक्शन १२५अ (देशद्रोह), १५३अ, १५३ब आणि ५०५ आणि UAPA च्या सेक्शन १३ अंतर्गत गुन्हा दाखल होईल. २०१९ च्या डिसेंबर महिन्यात देण्यात आलेल्या भाषणांसाठी शर्जील इमामला ट्रायलचा सामना करावा लागणार आहे. शर्जीलची ती भाषणे न्यायालयाने भडकाऊ अथवा चिथावणीखोर असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, सरकारच्या टीकाकारांविरोधात देशद्रोहाचा कायदा वापरला जात असल्याचा संदर्भ देत देशद्रोहासंदर्भातील कायदा संपुष्टात आणण्याचा आणि व्यक्ती स्वातंत्र्याला पूर्ण परावनगी देण्याची हीच योग्य वेळ आहे, असे न्या. नरीमन यांनी अलीकडेच म्हटले होते. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करणाऱ्यांविरोधात देशद्रोहाचा कायदा वापरुन खटले दाखल केले जात आहेत. मात्र त्याचवेळेस चुकीची भाषा वापरणाऱ्यांविरोधात कारवाई होताना दिसत नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली होती.  

टॅग्स :seditionदेशद्रोहCentral Governmentकेंद्र सरकार