शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

"शरद पवार रामद्रोही! त्यांचे ते विधान मोदीविरोधी नव्हे, तर श्रीरामविरोधी" उमा भारतींंची घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2020 15:39 IST

मंदिर बांधून कोरोना जाणार नाही असे विधान शरद पवार यांनी केले होते. पवार यांच्या या विधानानंतर उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

ठळक मुद्देभाजपाच्या आक्रमक नेत्या उमा भारती यांची शरद पवार यांच्या विधानावर जहरी टीका तप्रधान दोन तासांच्या दौऱ्यासाठी अयोध्येत गेले तर अर्थव्यवस्थेवर कुठले संकट येणार आहे?मला वाटते की शरद पवार यांचे हे विधान राम द्रोही आहे. ते भगवान श्री रामाविरोधात आहे

भोपाळ - अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाची तयारी सुरू झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या बाबीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला होता. मंदिर बांधून कोरोना जाणार नाही असे विधान शरद पवार यांनी केले होते. पवार यांच्या या विधानानंतर उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दरम्यान, रामजन्मभूमी आंदोलनात आघाडीवर असलेल्या भाजपाच्या आक्रमक नेत्या उमा भारती यांनी आता शरद पवार यांच्या विधानावर जहरी टीका केली आहे. शरद पवार यांनी राम मंदिरावरून केलेले विधान हे मोदी विरोधी नव्हे तर भगवान श्री रामाविरोधातील असल्याचे म्हटले आहे.

उमा भारती शदर पवारांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना म्हणाल्या की, ‘’शरद पवार यांनी काल केलेले विधान हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधातील नाही तर भगवान श्री राम यांच्याविरोधातील आहे. पंतप्रधान दोन तासांच्या दौऱ्यासाठी अयोध्येत गेले तर अर्थव्यवस्थेवर कुठले संकट येणार आहे.आपले पंतप्रधान असे व्यक्ती आहेत जे चार तासांपेक्षा अधिक काळ झोपत नाहीत. नेहमीच कार्यमग्न असतात. त्यांनी आजपर्यंत एकही सुट्टी घेतलेली नाही. ते विमानातूनसुद्धा काम करत जातील. मला त्यांचा स्वभाव माहीत आहे. ते फाइल वर्क करत जातील आणि फाइल वर्क करत येतील. भगवान रामांना दोन तास देतील. त्यामुळे मला वाटते की शरद पवार यांचे हे विधान राम द्रोही आहे. ते भगवान श्री रामाविरोधात आहे. ‘’

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार हे रविवारी सोलापूर दौऱ्यावर गेले होते. तिथे विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरून मोदींवर टीका केली होती. काही लोकांनी वाटतेय की राम मंदिरामुळे कोरोना बरा होईल. कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यावे हे त्यांनी ठरवायला हवे. सध्या कोरोनावर लक्ष द्यायला हवे. कोरोनाच्या संकटात सापडलेल्या लोकांनी बाहेर काढायला हवे. कदाचित राम मंदिरामुळे कोरोना जाईल असे त्यांना वाटत असावे. कोरोनामुळे लॉकडाऊन केल्याने देशाची अर्थव्यवस्था खचली आहे. त्यावर मोदींनी लक्ष द्यावे, असे मला वाटत असल्याचे पवार म्हणाले. आपले खासदार याबाबत जिथे गरजेचे आहे तिथे सरकारचे लक्ष वेधतील असे पवार यांनी सांगितले. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी

coronavirus: धक्कादायक! कोरोनाच्या रिपोर्टमध्ये केले गोलमाल, डॉक्टर झाला मालामाल

भारतानंतर आता या देशाने चीनला दाखवली सैनिकी तादक, घुसखोरीला चोख प्रत्युत्तर देण्याचा दिला इशारा

 महिंद्रांनी सुरक्षा दलांसाठी आणले दणकट चिलखती अस्र; आता माओवादी, दहशतवाद्यांची खैर नाही

…म्हणून भारतातील दहा पैकी तीन कोरोना रुग्ण करू शकत नाहीत प्लाझ्मा दान

coronavirus: कोरोनाबाधित रुग्णाचे तब्बल दीड कोटींचे बिल केले माफ, तिकीट देऊन केली मायदेशी पाठवणी

गेल्या सहा महिन्यांत कोरोनाबाबत तज्ज्ञांना मिळाली ही महत्त्वाची माहिती, लस आणि हर्ड इम्युनिटीबाबत मिळाले असे संकेत…

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारRam Mandirराम मंदिरNarendra Modiनरेंद्र मोदीUma Bhartiउमा भारतीAyodhyaअयोध्या