शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

शरद पवारांविरोधात ईडीनं दाखल केलेल्या गुन्ह्याबद्दल राहुल गांधी म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2019 06:50 IST

ईडीच्या कारवाईवर राहुल गांधींचं भाष्य

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात मोदी सरकार सूडबुद्धीने कारवाई करीत असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला आहे.राज्य मध्यवर्ती सहकारी शिखर बँकेच्या कथित कर्ज घोटाळ्यात संशयित आरोपी म्हणून शरद पवारांचेही नाव ईडीने दाखल केले आहे. त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, विरोधी पक्षांच्या नेत्यांवर मोदी सरकार सूडबुद्धीने कारवाई करीत असून आता शरद पवार यांनाही लक्ष्य करण्यात आले आहे.महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका एक महिन्यानंतर होणार असून, त्याआधीच राजकीय संधीसाधूपणाच्या वृत्तीतून ही कारवाई झाली आहे. विविध प्रकरणांत विरोधी पक्षांच्या नेत्यांना मोदी सरकार गोवत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी याआधी केला होता. आयएएक्स मीडिया घोटाळ्यामध्ये माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. मनी लाँड्रिंगच्या एका प्रकरणात कर्नाटकमधील काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांनाही अटक करण्यात आली आहे.विरोधकांना केले जात आहे लक्ष्यपश्चिम बंगालमध्येही तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांवर सूडाने कारवाई होत असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर केला होता.विविध राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या आधी विरोधी पक्षांच्या नेत्यांवर मोदी सरकारकडून सूडबुद्धीने कारवाई होत असल्याचा आरोप काँग्रेस पक्षानेही याआधी केला आहे.एका प्रकरणात काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी व अन्य काही प्रकरणांत प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांच्यावरही खटले दाखल करण्यात आले आहेत.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारRahul Gandhiराहुल गांधीEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस