शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

शरद पवारांविरोधात ईडीनं दाखल केलेल्या गुन्ह्याबद्दल राहुल गांधी म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2019 06:50 IST

ईडीच्या कारवाईवर राहुल गांधींचं भाष्य

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात मोदी सरकार सूडबुद्धीने कारवाई करीत असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला आहे.राज्य मध्यवर्ती सहकारी शिखर बँकेच्या कथित कर्ज घोटाळ्यात संशयित आरोपी म्हणून शरद पवारांचेही नाव ईडीने दाखल केले आहे. त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, विरोधी पक्षांच्या नेत्यांवर मोदी सरकार सूडबुद्धीने कारवाई करीत असून आता शरद पवार यांनाही लक्ष्य करण्यात आले आहे.महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका एक महिन्यानंतर होणार असून, त्याआधीच राजकीय संधीसाधूपणाच्या वृत्तीतून ही कारवाई झाली आहे. विविध प्रकरणांत विरोधी पक्षांच्या नेत्यांना मोदी सरकार गोवत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी याआधी केला होता. आयएएक्स मीडिया घोटाळ्यामध्ये माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. मनी लाँड्रिंगच्या एका प्रकरणात कर्नाटकमधील काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांनाही अटक करण्यात आली आहे.विरोधकांना केले जात आहे लक्ष्यपश्चिम बंगालमध्येही तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांवर सूडाने कारवाई होत असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर केला होता.विविध राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या आधी विरोधी पक्षांच्या नेत्यांवर मोदी सरकारकडून सूडबुद्धीने कारवाई होत असल्याचा आरोप काँग्रेस पक्षानेही याआधी केला आहे.एका प्रकरणात काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी व अन्य काही प्रकरणांत प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांच्यावरही खटले दाखल करण्यात आले आहेत.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारRahul Gandhiराहुल गांधीEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस