शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

शेतकरी आंदोलनात खेळाडूंची उडी; अर्जुन आणि पद्म पुरस्कार परत देण्याचा इशारा

By मोरेश्वर येरम | Updated: December 2, 2020 11:20 IST

शेतकरी आंदोलकांवर पाण्याचे फवारे आणि अश्रूधुराचा वापर केल्याच्या मुद्द्यावर माजी खेळाडूंनी केंद व हरियाणा सरकारवर संताप व्यक्त केला.

ठळक मुद्देमाजी खेळाडूंनी दिला शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबायेत्या ५ डिसेंबरला राष्ट्रपती भवनासमोर पुरस्कार ठेवून खेळाडू व्यक्त करणार निषेधशेतकऱ्यांवर पाण्याचे फवारे, लाठीचार्जचा व्यक्त केला निषेध

दिल्लीनव्या कृषी कायद्यांच्या विरोधात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आता माजी खेळाडूंचाही पाठिंबा मिळाला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कार परत देण्याची घोषणा माजी खेळाडूंनी केली आहे. शेतकऱ्यांना जर अशी वागणूक मिळणार असेल तर पुरस्कारांचं काय करायचं? शेतकऱ्यांच्या विरोधात बळाचा वापर करणं कोणत्याही अर्थाने योग्य नसून याचा आम्ही विरोध करतो, असं या खेळाडूंनी म्हटलं आहे. खेळाडूंच्या या भूमिकेमुळे केंद्र सरकारला मोठा धक्का बसला आहे. 

दरम्यान, केंद्र सरकार आणि शेतकरी संघटना यांच्यात मंगळवारी चर्चा झाली. पाच सदस्यांची समिती नेमून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्याचा सरकारचा प्रस्ताव शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी फेटाळून लावला. त्यामुळे सरकारने विज्ञान भवनात बोलावलेल्या बैठकीची तिसरी फेरी देखील निष्फळ ठरली आहे. आज सलग सातव्या दिवशी दिल्लीच्या वेशीवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. जोवर कायदे मागे घेतले जात नाहीत तोवर आंदोलन सुरुच राहणार असल्याची ठाम भूमिका शेतकरी संघटनांनी घेतली आहे. 

शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुढे आलेल्या माजी खेळाडूंमध्ये पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कार विजेते कुस्तीपटू कर्तार सिंग, अर्जुन पुरस्कार विजेते बास्केटबॉलपटू साजन सिंग चीमा आणि अर्जुन पुरस्कार विजेते हॉकीपटू राजबिर कौर यांचा समावेश आहे. या खेळाडूंसह आणखी काही खेळाडूंनी सरकारला ५ डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले गेले नाहीत तर येत्या ५ डिसेंबरला दिल्लीत राष्ट्रपती भवनासमोर आपल्याला मिळालेले पुरस्कार ठेवून ते परत देण्याचा इशारा या खेळाडूंनी दिला आहे. 

शेतकरी आंदोलकांवर पाण्याचे फवारे आणि अश्रूधुराचा वापर केल्याच्या मुद्द्यावर माजी खेळाडूंनी केंद व हरियाणा सरकारवर संताप व्यक्त केला. ''आपण सर्व शेतकऱ्यांची मुलं आहोत आणि गेल्या काही महिन्यांपासून ते अतिशय शांत पद्धतीने आपला निषेध व्यक्त करत आहेत. हिंसा झाल्याची एकही घटना समोर आली नाही. पण ते दिल्लीकडे जात असताना त्यांच्यावर पाण्याचे फवारे मारले गेले, अश्रूधुराचा वापर करण्यात आला हे अतिशय निंदनीय आहे. जर आपल्या वडीलधारी व्यक्तींना अशी वागणूक मिळणार असेल तर आमचे पुरस्कार काय कामाचे? त्यामुळे हे पुरस्कार आम्ही परत करण्याचा निर्णय घेतला आहे", असं साजन सिंग चीमा म्हणाले. साजन सिंग हे पंजाब पोलीस दलात पोलीस अधिकारी देखील राहीले आहेत. 

शेतकऱ्यांना जर हे नवे कायदे नको असतील तर मग केंद्र सरकार ते लादण्याचा प्रयत्न का करत आहेत? असा सवाल देखील साजन सिंग यांनी यावेळी उपस्थित केला. याशिवाय हरियाणातील माजी खेळाडूंनाही या आंदोलनात सामील करुन घेण्यासाठी संपर्क साधत असल्याचं त्यांनी सांगितलं. 

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपdelhiदिल्लीHaryanaहरयाणाPunjabपंजाब