शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

शेतकरी आंदोलनात खेळाडूंची उडी; अर्जुन आणि पद्म पुरस्कार परत देण्याचा इशारा

By मोरेश्वर येरम | Updated: December 2, 2020 11:20 IST

शेतकरी आंदोलकांवर पाण्याचे फवारे आणि अश्रूधुराचा वापर केल्याच्या मुद्द्यावर माजी खेळाडूंनी केंद व हरियाणा सरकारवर संताप व्यक्त केला.

ठळक मुद्देमाजी खेळाडूंनी दिला शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबायेत्या ५ डिसेंबरला राष्ट्रपती भवनासमोर पुरस्कार ठेवून खेळाडू व्यक्त करणार निषेधशेतकऱ्यांवर पाण्याचे फवारे, लाठीचार्जचा व्यक्त केला निषेध

दिल्लीनव्या कृषी कायद्यांच्या विरोधात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आता माजी खेळाडूंचाही पाठिंबा मिळाला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कार परत देण्याची घोषणा माजी खेळाडूंनी केली आहे. शेतकऱ्यांना जर अशी वागणूक मिळणार असेल तर पुरस्कारांचं काय करायचं? शेतकऱ्यांच्या विरोधात बळाचा वापर करणं कोणत्याही अर्थाने योग्य नसून याचा आम्ही विरोध करतो, असं या खेळाडूंनी म्हटलं आहे. खेळाडूंच्या या भूमिकेमुळे केंद्र सरकारला मोठा धक्का बसला आहे. 

दरम्यान, केंद्र सरकार आणि शेतकरी संघटना यांच्यात मंगळवारी चर्चा झाली. पाच सदस्यांची समिती नेमून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्याचा सरकारचा प्रस्ताव शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी फेटाळून लावला. त्यामुळे सरकारने विज्ञान भवनात बोलावलेल्या बैठकीची तिसरी फेरी देखील निष्फळ ठरली आहे. आज सलग सातव्या दिवशी दिल्लीच्या वेशीवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. जोवर कायदे मागे घेतले जात नाहीत तोवर आंदोलन सुरुच राहणार असल्याची ठाम भूमिका शेतकरी संघटनांनी घेतली आहे. 

शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुढे आलेल्या माजी खेळाडूंमध्ये पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कार विजेते कुस्तीपटू कर्तार सिंग, अर्जुन पुरस्कार विजेते बास्केटबॉलपटू साजन सिंग चीमा आणि अर्जुन पुरस्कार विजेते हॉकीपटू राजबिर कौर यांचा समावेश आहे. या खेळाडूंसह आणखी काही खेळाडूंनी सरकारला ५ डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले गेले नाहीत तर येत्या ५ डिसेंबरला दिल्लीत राष्ट्रपती भवनासमोर आपल्याला मिळालेले पुरस्कार ठेवून ते परत देण्याचा इशारा या खेळाडूंनी दिला आहे. 

शेतकरी आंदोलकांवर पाण्याचे फवारे आणि अश्रूधुराचा वापर केल्याच्या मुद्द्यावर माजी खेळाडूंनी केंद व हरियाणा सरकारवर संताप व्यक्त केला. ''आपण सर्व शेतकऱ्यांची मुलं आहोत आणि गेल्या काही महिन्यांपासून ते अतिशय शांत पद्धतीने आपला निषेध व्यक्त करत आहेत. हिंसा झाल्याची एकही घटना समोर आली नाही. पण ते दिल्लीकडे जात असताना त्यांच्यावर पाण्याचे फवारे मारले गेले, अश्रूधुराचा वापर करण्यात आला हे अतिशय निंदनीय आहे. जर आपल्या वडीलधारी व्यक्तींना अशी वागणूक मिळणार असेल तर आमचे पुरस्कार काय कामाचे? त्यामुळे हे पुरस्कार आम्ही परत करण्याचा निर्णय घेतला आहे", असं साजन सिंग चीमा म्हणाले. साजन सिंग हे पंजाब पोलीस दलात पोलीस अधिकारी देखील राहीले आहेत. 

शेतकऱ्यांना जर हे नवे कायदे नको असतील तर मग केंद्र सरकार ते लादण्याचा प्रयत्न का करत आहेत? असा सवाल देखील साजन सिंग यांनी यावेळी उपस्थित केला. याशिवाय हरियाणातील माजी खेळाडूंनाही या आंदोलनात सामील करुन घेण्यासाठी संपर्क साधत असल्याचं त्यांनी सांगितलं. 

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपdelhiदिल्लीHaryanaहरयाणाPunjabपंजाब