शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

अर्थसंकल्पात आरोग्यासाठी स्वतंत्र निधी ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2021 05:26 IST

प्रधानमंत्री स्वास्थ्य संवर्धन योजना; केंद्राने तयार केला प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्क   नवी दिल्ली : कोरोना, बर्ड फ्लू अशा विविध साथींनी सध्या देशाला ग्रासले आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा अधिक मजबूत करण्यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद २०२१-२२च्या अर्थसंकल्पामध्ये करण्याची शक्यता आहे. त्या निधीमधून प्रधानमंत्री स्वास्थ्य संवर्धन ही नवी योजना राबविली जाईल.प्रधानमंत्री स्वास्थ्य संवर्धन योजनेची घोषणा केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन आगामी अर्थसंकल्पात करण्याची शक्यता आहे. या योजनेच्या प्रस्तावात म्हटले आहे की, आरोग्य खात्याकरिता वर्षभरासाठी तरतूद केलेल्या स्वतंत्र निधीची रक्कम वित्तीय वर्ष संपले तरी अबाधित राहील. प्राप्तिकर व कॉर्पोरेट करावर केंद्र सरकार शिक्षण व आरोग्य विषयांसाठी ४ टक्के उपकर लादते. त्यातील ३ टक्के वाटा शिक्षण उपकराचा व १ टक्का वाटा आरोग्य उपकराचा असतो. या उपकरांतून मिळणाऱ्या उत्पन्नापैकी २५ टक्के रक्कम आरोग्य खात्यासाठीच्या स्वतंत्र निधीत वळती केली जाईल. हा निधी प्रामुख्याने आयुषमान भारत, पंतप्रधान स्वास्थ्य सुरक्षा योजना यावर खर्च केला जाईल. स्वतंत्र निधीमुळे जगातील आणखी अद्ययावत उपचार भारतात उपलब्ध होऊ शकतील. सध्या राष्ट्रीय ठोकळ उत्पन्नाच्या (जीडीपी) फक्त १.४ टक्के रक्कम आरोग्य क्षेत्रावर खर्च होते. पण हे प्रमाण २०२४ उजाडेस्तोवर ४ टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा विचार आहे.

नागरिकांना मोफत लस द्यावी -केजरीवालदेशभरातील नागरिकांना केंद्र सरकारने कोरोना लस मोफत द्यावी, मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्याबाबत विनंती केली आहे. जर ते त्यास तयार झाले नाहीत तर दिल्लीकरांना मोफत लस उपलब्ध करून देऊ, अशी माहिती मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली. केजरीवाल म्हणाले, सर्वप्रथम आरोग्यसेवकांना ही लस दिली जाईल. केंद्र सरकार आणि शास्त्रज्ञांनी सर्वच टप्प्यांवरती काळजी घेत ही लस उपलब्ध केली आहे. केंद्र सरकार मोफत लसीबाबत कोणता निर्णय घेते ते कळेल. परंतु, केंद्राने ही बाब मान्य केली नाही तर आम्ही दिल्लीकरांचे मोफत लसीकरण करू, असे ते म्हणाले.

राजकीय नेत्यांना प्राधान्याने लस द्यापुडुचेरी : लोकांना विश्वास वाटण्यासाठी सर्व राजकीय नेते, मंत्री, खासदार यांना कोरोना लसीकरण मोहिमेत प्राधान्याने लस द्यावी, अशी मागणी पुडुचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणस्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहून केली आहे.ते म्हणाले, सर्व राजकीय नेत्यांनी ही लस घेतल्याचे पाहून सर्वसामान्य जनतेचाही आत्मविश्वास वाढेल. 

 

टॅग्स :Healthआरोग्यCorona vaccineकोरोनाची लसprime ministerपंतप्रधान