शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
2
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
3
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
4
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
5
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
6
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
7
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
8
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
9
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
11
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
12
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
13
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
14
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
15
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
16
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
17
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
18
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
19
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
20
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला

'सैन्यदलातील कपात म्हणजे सुरक्षेशी तडजोड'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 2:47 AM

राष्ट्रीय सुरक्षेशी समझोता या शीर्षकाखाली एकापाठोपाठ एक असे तीन ट्वीट करून त्यांनी मोदी सरकारच्या विरोधात तिखट प्रतिक्रिया नोंदवली.

नवी दिल्ली : ‘भारतीय सैन्यदल जगातल्या ५ मोठ्या सैन्यदलांपैकी एक आहे. इतकेच नव्हे तर देशाविषयी समर्पणाची भावना अन् संरक्षण सिद्धतेबाबत विशेष कौशल्याचे व कार्यक्षमतेचे दर्शन या सैन्यदलाने साऱ्या जगाला वेळोवेळी घडवले आहे, अशा सैन्यदलाबद्दल प्रत्येक भारतीयाला गर्व व अभिमान आहे. आता खर्च कमी करण्यासाठी सैन्यदलात मोठ्या प्रमाणावर कपात करण्याचा केंद्र सरकारचा जो प्रस्ताव चर्चेत आहे, तो राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड करणारा आहे, अशा आशयाचे तीन ट्वीट भाजपचे बंडखोर खासदार व अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी गुरुवारी केले.प्रसारमाध्यमातील ज्या वृत्तांशी संबंधित हे ट्वीट शत्रुघ्न सिन्हांनी केले, त्या बातम्यांमध्ये ५ ते ७ हजार कोटींच्या संरक्षण खरेदीसाठी सैन्यदलात सुमारे दीड लाख जवानांची मोठी कपात करण्याचा सरकारचा इरादा असल्याचे नमूद केले होते. संरक्षण व्यवस्थेवर होणारा अफाट खर्च कमी करण्याबाबत असा तर्क मांडला गेला की, भारतीय संरक्षण व्यवस्थेसाठी सध्या १.२ लाख कोटी रुपयांचे बजेट आहे. त्यातला ८३ टक्के खर्च केवळ संरक्षण व्यवस्थेचा महसुली खर्च (एस्टॅब्लिशमेंट कॉस्ट) व सैन्यदलाचे वेतन यासाठी खर्च होतो. सैन्यदलाला मिळणाºया बजेटपैकी फक्त १७ टक्के म्हणजे २६ हजार ८२८ कोटी संरक्षण सिद्धतेसाठी लागणाºया साधनसामग्रीवर खर्च होतो. या बजेटवर सैन्यदल अगोदरच नाराज आहे. आगामी काळात सैन्यदलात व्यापक कपात करून जे ३१ हजार ८२६ ते ३३ हजार ८२६ कोटी हाती येतील त्यातून ५ ते ७ हजार कोटींच्या शस्त्रास्त्रांची खरेदी भारताच्या संरक्षणासाठी करण्याचा सरकारचा इरादा आहे. याच वृत्तावर सिन्हा भडकले व राष्ट्रीय सुरक्षेशी समझोता या शीर्षकाखाली एकापाठोपाठ एक असे तीन ट्वीट करून त्यांनी मोदी सरकारच्या विरोधात तिखट प्रतिक्रिया नोंदवली.दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष शिसोदिया यांच्यासह शहादरा येथे सफाई मजुरांना विशेष संदेश देण्यासाठी आयोजित सरकारी कार्यक्रमात शत्रुघ्न सिन्हा गेले तेव्हा भाजप कार्यर्क्त्यांनी काळे झेंडे दाखवून सिन्हांचा जोरदार निषेध केला. वाजपेयी मंत्रिमंडळात शत्रुघ्न सिन्हा मंत्री असताना शहादराचे विद्यमान जिल्हाधिकारी त्यांचे वैयक्तिक सचिव या नात्याने जबाबदारी सांभाळीत होते.मी बोलतो ती ‘दिल की बात’भाजप कार्यकर्त्यांकडून सुरू असलेल्या निषेध घोषणांच्या पार्श्वभूमीवर शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, ‘मन की बात’ करण्याचे पेटंट काही माझ्यापाशी नाही. मी जे काही बोलतो ती दिल की बात असते. देशात पेट्रोल, डिझेल व गॅसच्या किमती वाढत असल्यामुळे जनता निराश आहे. मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून गॅसच्या किमतीत दुप्पट वाढ झाली आहे. इंधनाचे भाव आकाशाला भिडले आहेत, सैन्यदलात कपात करण्याचा प्रस्ताव तर धक्कादायक आहे. अशा वेळी इतरांना सल्ले देण्याऐवजी केंद्र सरकार आपल्या मंत्रिमंडळावर होणाºया खर्चात कपात का करीत नाही.’

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानNarendra Modiनरेंद्र मोदीShatrughan Sinhaशत्रुघ्न सिन्हा