शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup मध्ये भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी! ICC च्या नियमामुळे गोंधळ 
2
स्वाती मालिवाल यांच्यासोबत गैरवर्तन झालं, AAP ने दिली कबुली, दोषींवर केजरीवाल करणार कठोर कारवाई
3
मराठा रोषामुळे बीड मतदारसंघात सभा टाळली?; फडणवीसांनी दिलं रोखठोक उत्तर
4
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
5
सत्ताधाऱ्यांकडून राज्यात २ हजार कोटींचे वाटप; आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप
6
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
7
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."
8
Narendra Modi : "केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला
9
अमेठी, रायबरेलीत काँग्रेसच्या हाताला सपाच्या सायकलची साथ, अखिलेश यादव यांचे कार्यकर्त्यांना स्पष्ट आदेश 
10
सैन्यातील नोकरी सोडून गाझातल्या लोकांच्या मदतीसाठी धावले; इस्रायलच्या हल्ल्यात वैभव काळेंचा मृत्यू
11
Akhilesh Yadav : "भाजपाने Google वर 100 कोटींचा प्रचार करण्याचा रेकॉर्ड केला... हा जनतेचा पैसा"
12
ॐ मित्राय नमः! सूर्यनमस्काराचे १० जबरदस्त फायदे; इतका परिपूर्ण व्यायाम की जिमची गरजही नाही
13
कार्तिकी गायकवाडच्या घरी 'लिटील चॅम्प'चं आगमन; पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज
14
UPSC मध्ये घटस्फोटित कोट्यातून नोकरीसाठी पतीला सोडलं, पहिल्याच Marriage Anniversary ला केली विचित्र मागणी
15
तुम्ही काय दिवे लावले? हार्दिकवर टीका करणाऱ्या AB de Villiers वर गौतम गंभीर खवळला 
16
"बायको गेल्यानंतर स्वत:ला संपवायचं ठरवलं होतं", कठीण काळाबद्दल बोलताना भूषण कडू भावुक
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; अदानी एन्टरप्राईजेसमध्ये तेजी, Cipla घसरला
18
जगातील सर्वात पॉवरफुल क्रॉसओवर बाईक BMW M 1000 XR लाँच,  जाणून घ्या किंमत...
19
RCB vs CSK सामन्यावर पावसाचं सावट! सामना रद्द झाल्यास प्ले ऑफमध्ये कोण जाणार?
20
घाटकोपरसारखीच चूक २१ वेळा; होर्डिंग दुर्घटनेला जबाबदार असलेला भावेश भिंडे कोण आहे?

कलम 370 हटवल्यामुळे जम्मू-काश्मीरला फायदाच होणार- राष्ट्रपती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 8:03 PM

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशाला संबोधित केलं आहे. या भाषणात त्यांनी अनेक मुद्द्यावर मत व्यक्त केलं आहे.

नवी दिल्ली: स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशाला संबोधित केलं आहे. या भाषणात त्यांनी अनेक मुद्द्यावर मत व्यक्त केलं आहे. जम्मू- काश्मीरमधून कलम 370 हटविल्याने तेथील नागरिकांना देखील आता देशातील इतर नागरिकांप्रमाणे अधिकार मिळणार आहे. त्याचप्रमाणे त्यांना याचा नक्कीच फायदा होणार असल्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सांगितले आहे. भारताच्या 73व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशवासीयांना संबोधित करताना ते बोलत होते. 

राष्ट्रपतींनी सांगितले की, जम्मू- काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर आता तेथील लोकांना पूर्ण देशातील नागरिकांप्रमाणेच अधिकार मिळणार आहे. तसेच तेथील रहिवाशी आरक्षण आणि नोकरीचा लाभ घेऊ शकतील. त्याचप्रमाणे तिहेरी तलाक रद्द झाल्याने देशातील मुस्लिम महिलांमध्ये न्याय मिळाल्याची भावना आहे. 

भारत हे एक स्वातंत्र्य राष्ट्राच्या रूपाने 72 वर्षं पूर्ण करत आहे. त्याचप्रमाणे 2 ऑक्टोबरला राष्ट्राला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अमूल्य योगदान देणाऱ्या महात्मा गांधींची 150वी जयंती साजरी करणार आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान मतदारांनी दाखवलेल्या जनजागृतीचाही त्यांनी उल्लेख केला आहे. निवडणुकीत मोठ्या संख्येने मतदान केंद्रावर पोहचून मतदान केल्याने त्यांनी मतदारांचे मी आभार मानतो. तसेच राज्यसभा आणि लोकसभेत विविध विधेयके पारीत झाल्याचंही त्यांनी सांगितलं.

 

 

टॅग्स :Ramnath Kovindरामनाथ कोविंदIndependence Dayस्वातंत्र्य दिनIndiaभारत