शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
2
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
3
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
4
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
5
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
6
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
7
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
8
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
9
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
10
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
11
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
12
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
13
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
14
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
15
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
16
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
17
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
18
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
19
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
20
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?

एसबीआयची स्वेच्छानिवृत्ती योजना; वयाची ५५ वर्षे अथवा सेवेची २५ वर्षे पूर्ण झालेले ठरणार पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2020 12:24 AM

मार्च २०२०च्या आकडेवारीनुसार एसबीआयमधील संख्या २.३९ लाख इतकी होती.

नवी दिल्ली : देशाच्या सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) वयाची ५५ वर्षे पूर्ण केलेल्या अथवा २५ वर्षे सेवा झालेल्या ३०,१९० कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना तयार केली आहे. बँकेच्या व्यवस्थापनावरील खर्च कमी करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

सेकंड इनिंग्ज टॅप व्हीआरएस २०२० असे या स्वेच्छानिवृत्ती योजनेला नाव देण्यात आले असून, तिची अंमलबजावणी १ डिसेंबरपासून होणार असून, येत्या फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीपर्यंत लागू राहील. खूप कमी सेवाकाळ उरलेल्या, वैयक्तिक कारणांमुळे बँकेच्या सेवेतून मुक्त होऊन दुसºया क्षेत्रात काम करण्याची इच्छा असलेल्या व्यक्तींसाठी ही स्वेच्छानिवृत्ती योजना असल्याचे सांगण्यात आले.

मार्च २०२०च्या आकडेवारीनुसार एसबीआयमधील संख्या २.३९ लाख इतकी होती. ज्या कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज स्वीकारला जाईल, त्याला शिल्लक सेवाकाळातील (निवृत्तिवेतन देय ठरण्याच्या तारखेपर्यंत) एकूण वेतनाच्या ५० टक्के रक्कम सानुग्रह अनुदान म्हणून देण्यात येईल. ही रक्कम मागील १८ महिन्यांच्या घेतलेल्या वेतनाच्या रकमेइतकी मर्यादित असेल. स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कर्मचाºयाला ग्रॅच्युइटी, प्रॉव्हिडंट फंड, वैद्यकीय सुविधा, निवृत्तिवेतन आदी सर्व फायदे दिले जाणार आहेत. एसबीआयने सर्वप्रथम २००१ मध्ये स्वेच्छानिवृत्ती योजना जाहीर केली होती. आता एसबीआयने तयार केलेल्या योजनेला बँकेच्या संचालक मंडळाकडून मंजुरी मिळणे बाकी आहे.

२१७०.८५ कोटी रु पये वाचण्याची शक्यता

स्वेच्छानिवृत्ती योजनेसाठी एसबीआयमधील ११,५६५ अधिकारी व १८,६२५ कर्मचारी पात्र ठरू शकतात. त्यातील ३० टक्के कर्मचाºयांनी जरी स्वेच्छानिवृत्ती घेतली तर एसबीआय दरवर्षीच्या व्यवस्थापन खर्चातील २१७०.८५ कोटी रु पयांची रक्कम वाचवू शकते.

टॅग्स :SBIएसबीआयIndiaभारत