शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
2
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
3
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
4
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
5
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
6
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
7
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
8
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
9
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
10
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
11
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
12
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
13
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
14
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
15
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
16
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
17
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
18
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
19
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
20
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो

'मी लिहून देतो, मोदी सरकार येणार नाही', राहुल गांधीसोबतच्या चर्चेत सत्यपाल मलिकांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2023 16:05 IST

राहुल गांधी यांनी जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा केली.

Rahul Gandhi-Satyapal Malik: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्याशी चर्चा केली. 28 मिनिटांच्या या संभाषणात राहुल गांधींनी सत्यपाल मलिकांशी पुलवामा हल्ला, शेतकरी आंदोलन, एमएसपी, जातिगणना, मणिपूर हिंसाचार यासह विविध मुद्द्यांवर चर्चा केली. या चर्चेदरम्यान सत्यपाल मलिक यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. तसेच, मी लिहून देतो, मोदी सरकार सत्तेत येणार नाही, असेही ठणकावून सांगितले.

जम्मू-काश्मीरवर काय म्हणाले मलिक?सत्यपाल मलिक म्हणाले, माझं स्पष्ट मत आहे की, जम्मू-काश्मीरच्या लोकांवर बळाचा वापर करुन काहीही फायदा होणार नाही. त्यांना प्रेमाणे, विश्वासाने जिंकावे लागेल. त्यांना राज्याचा दर्जा परत मिळावा, असे मलाही वाटते. त्यांनी कलम 370 मागे घेत केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती केली. राज्याचीस पोलीस बंड करतील, अशी भीती त्यांना वाटत होती. पण, जम्मू-काश्मीर पोलिसांनी केंद्र सरकारला नेहमीच पाठिंबा दिला आहे. अमित शहा यांनी राज्याचा दर्जा परत करू असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा परत करून तेथे निवडणुका घ्याव्यात, असं मलिक म्हणाले.

पुलवामा हल्ल्यावर प्रतिक्रियाराहुल गांधी यांनी पुलवामा हल्ल्याबाबत प्रश्न विचारला असता सत्यपाल मलिक म्हणाले, पुलवामा हल्ल्याबाबत मी असे म्हणणार नाही की सरकारने तो घडवून आणला, पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि त्याचा राजकीय वापर केला. जेव्हा तुम्ही मतदानाला जाल, तेव्हा पुलवामाच्या हौतात्म्याना आठवा. पंतप्रधानांनी श्रीनगरला जायला हवे होते. राजनाथ सिंह तिथे आले होते, मीही तिथे होतो. ज्या दिवशी हे घडले, त्या दिवशी पीएम मोदी जीम कॉर्बेटमध्ये शूटिंग करत होते, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. 

RSS च्या विचारसरणीवर मलिक काय म्हणाले ?

राहुल म्हणाले की, भारतीय राजकारणात दोन विचारधारांमध्ये लढा आहे, एक गांधीवादी आणि दुसरी आरएसएस. दोन्ही हिंदुत्वाच्या आहेत. एक अहिंसा आणि बंधुभावाची विचारधारा आहे, तर दुसरी द्वेष आणि हिंसेची, यावर तुमचे काय म्हणणे आहे? या प्रश्नाला उत्तर देताना सत्यपाल मलिक म्हणाले की, मला वाटते की भारत उदारमतवादी हिंदू धर्माच्या मार्गावर चालेल तेव्हाच एक देश म्हणून टिकेल, अन्यथा त्याचे तुकडे पडतील. 

त्यांना मुद्द्यांचा इव्हेंट बनव्याची सवय - मलिकतो कोणत्याही मुद्द्यातून इव्हेंट कसा बनवायचा, ते त्यांना माहीत आहे. महिला आरक्षण विधेयकाबाबतही तेच करण्यात आले. महिलांना काही मिळणार नाही, पणष त्यांनी खूप मोठे काम केले, असे ते दाखवून देत आहेत. संसदेच्या नवीन इमारतीची गरज नव्हती, पण त्यांनी (पंतप्रधान मोदींना) ती बांधली.  राहुल म्हणाले की, जेव्हा तुम्ही पुलवामा आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा मुद्दा उपस्थित केला तेव्हा तुम्हाला सीबीआय आदींकडून धमक्या देण्यात आल्या. यावर मलिक म्हणाले, तक्रारदाराला शिक्षा होऊ शकत नाही, असा कायदा आहे. मी ज्यांची तक्रार केली, त्यांच्याऐवजी माझी तीनवेळा चौकशी झाली. मी म्हणालो, तुम्ही काहीही करा, तुम्ही माझे नुकसान करू शकणार नाही. मी भिकारी आहे, माझ्याकडे काही नाही, अशी प्रतिक्रिया मलिक यांनी यावेळी व्यक्त केली. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदी