शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

संविधानिक दर्जा बदलला तर काश्मीरमध्ये तिरंगा फडकवायला कुणी नसेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2017 11:16 IST

भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३५(अ) मध्ये बदल करून जम्मू-काश्मीरमधील जनतेला मिळालेल्या विशेष अधिकारावर घाला घालण्याचं काम केलं तर त्याचे परिणाम भोगावे लागतील.

ठळक मुद्देभारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३५(अ) मध्ये बदल करून जम्मू-काश्मीरमधील जनतेला मिळालेल्या विशेष अधिकारावर घाला घालण्याचं काम केलं तर त्याचे परिणाम भोगावे लागतील.थोडी जरी ढवळाढवळ केली तर जम्मू-काश्मीरमध्ये तिरंग्याचं संरक्षण करणारा आणि तिरंगा फडकवणारा कोणीच उरणार नाही, असा थेट इशारा जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी दिला आहे.शुक्रवारी काश्मीरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी हा इशारा दिला.

श्रीनगर, दि. 29- भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३५(अ) मध्ये बदल करून जम्मू-काश्मीरमधील जनतेला मिळालेल्या विशेष अधिकारावर घाला घालण्याचं काम केलं तर त्याचे परिणाम भोगावे लागतील. त्यात थोडी जरी ढवळाढवळ केली तर जम्मू-काश्मीरमध्ये तिरंग्याचं संरक्षण करणारा आणि तिरंगा फडकवणारा कोणीच उरणार नाही, असा थेट इशारा जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी दिला आहे. शुक्रवारी काश्मीरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी हा इशारा दिला. जर घटनेच्या अनुच्छेद ३५(अ) मध्ये काही बदल केला किंवा त्याच्याशी छेडछाड केली तर काश्मीरमध्ये तिरंगा फडकवणाऱ्या नॅशनल कॉन्फ्रन्स आणि पीपल्स डेमोक्रॅटीक पार्टीसारख्या मुख्य प्रवाहातील पक्षांच्या कार्यकर्त्यांचं आयुष्य धोक्यात येईल, असा थेट इशारा मूफ्ती यांनी दिला आहे. काश्मिरी जनतेच्या विशेष अधिकारात कोणतीही ढवळाढवळ खपवून घेतली जाणार नसून त्याबाबत कोणतीही तडजोड करण्यात येणार नसल्याचंही मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या आहेत.  संविधानातील अनुच्छेद ३५ (अ) रद्द करण्यासंबंधी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुफ्ती यांनी हा मुद्दा उपस्थित केला. ३५ अ नुसार जम्मू-काश्मीरमधील आमदार आणि खासदारांना विशेष सवलती देण्यात येतात. घटनेमध्ये जम्मू-काश्मीरला विशेष अधिकार देण्यात आले आहेत. काश्मीरप्रश्न सोडवण्याची आवश्यकता आहे. विशेषाधिकारांवर हल्ले करून हा मुद्दा अधिक गुंतागुंतीचा करायचा नाही, असं मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या आहेत.या कार्यक्रमात बोलताना मेहबूबा मुफ्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाचं कौतुक केलं. तसंच माझ्यासाठी भारत म्हणजेच इंदिरा गांधी आहेत, असं सांगितलं. काही वृत्तवाहिन्यांवरील प्राइमटाइम शोमध्ये ज्या पद्धतीनं भारताबाबत सांगितलं जातं त्यामुळे मी नाराज असल्याचंही मुफ्ती म्हणाल्या आहेत. यामुळे भारत आणि काश्मीरमधील दरी आणखी वाढण्यास मदत होते आहे, असं मत त्यांनी मांडलं आहे. वृत्तवाहिन्यांवरील चर्चेदरम्यान ज्या भारताबद्दल बोललं जातं तो भारत देश मला माहिती नाही, असंही मुफ्ती म्हणाल्या आहेत. टेरर फंडिंगच्या आरोपाखाली एनआयएने फुटीरतावादी नेत्यांची धरपकड केली आहे. पण अशी धरपकड करून मुख्य समस्या सुटणार नाही, असं सांगतानाच पीडीपी आणि भाजप आघाडी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळातील परिस्थिती काश्मीरमध्ये पुन्हा निर्माण करण्यात यशस्वी होईल, अशी आशाही मेहबूबा मुफ्ती यांनी व्यक्त केली आहे.