शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

शिवसैनिकांनी काही चुकीचे केले नाही, ‘अदानी एअरपोर्ट’चा बोर्ड हटवणे योग्यच: संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 15:23 IST

शिवसैनिकांनी काहीही चुकीचे केले नाही. ‘अदानी एअरपोर्ट’चा बोर्ड हटवणे योग्यच असल्याचे सांगत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी या कृत्याचे समर्थन केले.

नवी दिल्ली: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालन अदानी समूहाने ताब्यात घेतले. यानंतर अदानी समूहाने विमानतळ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोरच ‘अदानी एअरपोर्ट’ असा फलक लावला होता. शिवसैनिकांनी हा फलक उखडून फेकला. यानंतर शिवसैनिकांनी काहीही चुकीचे केले नाही. ‘अदानी एअरपोर्ट’चा बोर्ड हटवणे योग्यच असल्याचे सांगत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी या कृत्याचे समर्थन केले. (sanjay raut reacts on shiv sainiks for vandalizing adani airport branding)

अदानी समूहाने गेल्या काही वर्षांत एव्हिएशन सेक्टरमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. देशातील अनेक मोठ्या विमानतळांचे संचालन आता अदानी समूहाकडे आहे. जुलै महिन्यात मुंबईतील इंटरनॅशनल एअरपोर्टचे संचालन पूर्णपणे अदानी समूहाकडे आहे. यानंतर अदानी समूहाकडून सदर फलक लावण्यात आला होता. शिवसैनिकांनी या फलकाची तोडफोड केल्याच्या कृत्यानंतर समर्थन देत संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. ते दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. 

जय श्रीराम! अयोध्येतील राम मंदिराचा गाभारा सोन्याचा करा; शिवसेना नेत्याचे PM मोदींना पत्र

 जे झाले तेच पुढेही होत राहणार

शिवसैनिकांनी काहीही चुकीचे केलेले नाही. शिवसेना सत्तेत असली तरी असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. कुणी मालकी हक्क दाखवून ब्रँडिंग करत असेल. प्रचार करत असेल, शिवसेना सत्तेत असली तरी असले प्रकार सहन करणार नाही. काल जे झाले तेच पुढेही होत राहणार, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. 

Vi मोजतंय अखेरच्या घटका! बिर्ला यांची मोठी ऑफर; सरकारच्या ताब्यात जाणार कंपनी?

अदानींनी विमानतळ विकत घेतले आहे का?

छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट हे नाव केवळ महाराष्ट्र आणि मुंबईच नाही, तर संपूर्ण जगभरात ओळखले जाते. यापूर्वी येथे जीव्हीकेसारख्या मोठ्या कंपन्या होत्या. मात्र, त्यांनी असे कधीही केले नाही. विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव असताना जाणूनबुजून मुंबई, महाराष्ट्र अस्थिर करण्याचे काम का करत आहात? अदानींनी विमानतळ विकत घेतले आहे का? असा सवाल महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.

रेल्वेचे कन्फर्म रिझर्व्हेशन मिळाले नाही, तर प्लॅटफॉर्म तिकिटावर प्रवास करणे शक्य?

दरम्यान, आर्थिक संकटात सापडलेल्या जीव्हीके समूहाकडून अलीकडेच अदानी समूहाने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडचा ताबा स्वत:कडे घेतला आहे. त्याचबरोबर, नवी मुंबईतील प्रस्तावित विमानतळाचा ताबाही 'अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेड'कडे गेला आहे. त्यानंतर तिथे अनेक बदल केले जात आहेत. त्याचाच भाग म्हणून 'अदानी एअरपोर्ट' असा नामफलक लावण्यात आला होता. वास्तविक हे विमानतळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखलं जाते. असे असतानाही तिथे अदानींचा फलक लागल्याने शिवसैनिक संतापले. त्यातून हा फलक हटवण्यात आला. 

टॅग्स :AdaniअदानीAirportविमानतळShiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊत