शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

"...तर मी सरन्यायाधीशांच्या पायाचे तीर्थ प्यायला तयार"; PM मोदींचा उल्लेख करत संजय राऊतांचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2024 11:13 IST

रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादावर तोडगा काढण्यासाठी आपण देवाकडे प्रार्थना केल्याचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी म्हटलं आहे.

Sanjay Raut on CJI DY Chandrachud : भारताचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी नुकताच अयोध्या-बाबरी मशीद वाद प्रकरणात निकाल देण्याआधीचा किस्सा सांगितला आहे. या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी देवाकडे प्रार्थना केल्याचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सांगितले. सरन्यायाधीशांनी केलेल्या विधानाची देशभरात चर्चा होच आहे. दुसरीकडे, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना पक्षाच्या प्रलंबित खटल्यावरुन सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यावर टीका केली आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड हे विष्णुचे चौदावे अवतार असू शकतात असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 

रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादावर तोडगा काढण्यासाठी आपण देवाकडे प्रार्थना केली होती, असे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी म्हटले आहे.  तुमची आस्था असेल तर देव तुम्हाला मार्ग शोधून देतात, देवाने मलाही मार्ग दाखवला, असेही सरन्यायाधीश म्हणाले. सरन्यायाधीश चंद्रचूड पुण्याच्या खेड तालुक्यातील कण्हेरसर या त्यांच्या मूळ गावी एका सभेत बोलत होते. सरन्यायाधीशांच्या विधानावरुन खासदार संजय राऊत यांनी टोला लगावला आहे. ईश्वराची इच्छा काय त्यापेक्षा संविधानाची इच्छा काय हे महत्त्वाचे असल्याचे संजय राऊत यांनी म्हटलं.

"म्हणून नरेंद्र मोदींना सरन्यायाधीशांना गणपतीच्या आरतीसाठी बोलवलं होतं. ते संविधानावर विसंबून नसून, कायद्याचे पुस्तक त्यांच्यासाठी महत्त्वाचे नसून त्यांना जे साक्षात्कार होतात त्यावर अवलंबून ते निर्णय घेतात की काय असं लोकांच्या मनात येऊ शकतं. ईश्वराची इच्छा काय त्यापेक्षा संविधानाची इच्छा काय. शिवसेनेला न्याय देऊ नका अशी ईश्वराची इच्छा नक्कीच नसणार. ही इच्छा विष्णुच्या तेराव्या अवताराची असेल आणि या तेराव्या अवताराने सरन्यायाधीशांना काही साक्षात्कार दिला असेल. म्हणून आमचा निकाल विधानसभेची मुदत संपल्यावरही लागणार नसेल तर नक्कीच मी सरन्यायाधीशांच्या पायाचे तीर्थ प्यायला तयार आहे. कारण ते विष्णुचे चौदावे अवतार असू शकतात," असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

काय म्हणाले सरन्यायाधीश?

"न्यायालयात काम करत असताना अशी प्रकरणं समोर येतात जी सोडवणं कठीण असतं. अयोध्या प्रकरणाचा निकाल देताना माझी अशीच काहीशी स्थिती झाली होती. अयोध्या खटल्यात तीन महिने आम्ही त्यावरील सुनावणी करत होतो. शेकडो वर्षे जो वाद कोणी सोडवू शकलं नव्हतं, तेच प्रकरण आमच्या पुढे आलं होतं. त्यावेळी यातून मार्ग कसा शोधायचा? असा प्रश्न आम्हाला पडला होता. मी या खटल्याचा निकाल देण्यापूर्वी देवाची पूजा करताना देवाकडेच मदत मागितली. मी दररोज सकाळी देवाची पूजा करतो तशीच पूजा त्या दिवशी देखील करत होतो. मी भगवंतापुढे बसलो आणि भगवंताला म्हणालो, आता तुम्हीच मला मार्ग शोधून द्या. तुमचा यावर विश्वास असेल, तुमची आस्था असेल तर देव तुम्हाला मार्ग शोधून देतात, देवाने मलाही मार्ग दाखवला,” असं सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :DY Chandrachudडी. वाय. चंद्रचूडSanjay Rautसंजय राऊतNarendra Modiनरेंद्र मोदी