शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
5
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
6
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
7
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
8
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
9
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
10
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
11
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
12
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
13
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
14
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
15
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
16
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
17
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
19
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
20
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर

"...तर मी सरन्यायाधीशांच्या पायाचे तीर्थ प्यायला तयार"; PM मोदींचा उल्लेख करत संजय राऊतांचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2024 11:13 IST

रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादावर तोडगा काढण्यासाठी आपण देवाकडे प्रार्थना केल्याचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी म्हटलं आहे.

Sanjay Raut on CJI DY Chandrachud : भारताचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी नुकताच अयोध्या-बाबरी मशीद वाद प्रकरणात निकाल देण्याआधीचा किस्सा सांगितला आहे. या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी देवाकडे प्रार्थना केल्याचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सांगितले. सरन्यायाधीशांनी केलेल्या विधानाची देशभरात चर्चा होच आहे. दुसरीकडे, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना पक्षाच्या प्रलंबित खटल्यावरुन सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यावर टीका केली आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड हे विष्णुचे चौदावे अवतार असू शकतात असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 

रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादावर तोडगा काढण्यासाठी आपण देवाकडे प्रार्थना केली होती, असे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी म्हटले आहे.  तुमची आस्था असेल तर देव तुम्हाला मार्ग शोधून देतात, देवाने मलाही मार्ग दाखवला, असेही सरन्यायाधीश म्हणाले. सरन्यायाधीश चंद्रचूड पुण्याच्या खेड तालुक्यातील कण्हेरसर या त्यांच्या मूळ गावी एका सभेत बोलत होते. सरन्यायाधीशांच्या विधानावरुन खासदार संजय राऊत यांनी टोला लगावला आहे. ईश्वराची इच्छा काय त्यापेक्षा संविधानाची इच्छा काय हे महत्त्वाचे असल्याचे संजय राऊत यांनी म्हटलं.

"म्हणून नरेंद्र मोदींना सरन्यायाधीशांना गणपतीच्या आरतीसाठी बोलवलं होतं. ते संविधानावर विसंबून नसून, कायद्याचे पुस्तक त्यांच्यासाठी महत्त्वाचे नसून त्यांना जे साक्षात्कार होतात त्यावर अवलंबून ते निर्णय घेतात की काय असं लोकांच्या मनात येऊ शकतं. ईश्वराची इच्छा काय त्यापेक्षा संविधानाची इच्छा काय. शिवसेनेला न्याय देऊ नका अशी ईश्वराची इच्छा नक्कीच नसणार. ही इच्छा विष्णुच्या तेराव्या अवताराची असेल आणि या तेराव्या अवताराने सरन्यायाधीशांना काही साक्षात्कार दिला असेल. म्हणून आमचा निकाल विधानसभेची मुदत संपल्यावरही लागणार नसेल तर नक्कीच मी सरन्यायाधीशांच्या पायाचे तीर्थ प्यायला तयार आहे. कारण ते विष्णुचे चौदावे अवतार असू शकतात," असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

काय म्हणाले सरन्यायाधीश?

"न्यायालयात काम करत असताना अशी प्रकरणं समोर येतात जी सोडवणं कठीण असतं. अयोध्या प्रकरणाचा निकाल देताना माझी अशीच काहीशी स्थिती झाली होती. अयोध्या खटल्यात तीन महिने आम्ही त्यावरील सुनावणी करत होतो. शेकडो वर्षे जो वाद कोणी सोडवू शकलं नव्हतं, तेच प्रकरण आमच्या पुढे आलं होतं. त्यावेळी यातून मार्ग कसा शोधायचा? असा प्रश्न आम्हाला पडला होता. मी या खटल्याचा निकाल देण्यापूर्वी देवाची पूजा करताना देवाकडेच मदत मागितली. मी दररोज सकाळी देवाची पूजा करतो तशीच पूजा त्या दिवशी देखील करत होतो. मी भगवंतापुढे बसलो आणि भगवंताला म्हणालो, आता तुम्हीच मला मार्ग शोधून द्या. तुमचा यावर विश्वास असेल, तुमची आस्था असेल तर देव तुम्हाला मार्ग शोधून देतात, देवाने मलाही मार्ग दाखवला,” असं सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :DY Chandrachudडी. वाय. चंद्रचूडSanjay Rautसंजय राऊतNarendra Modiनरेंद्र मोदी