शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

UP Election 2022: “देशात मशिदी बांधण्यासाठी मंदिरे पाडली गेली, त्या ठिकाणी भाजप पुन्हा मंदिरे बांधणार”

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2021 13:16 IST

आगामी काही महिन्यांमध्ये उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.

नवी दिल्ली: आगामी काही महिन्यांमध्ये उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर हळूहळू राजकारण तापताना पाहायला मिळत आहे. काही निवडणूकपूर्व अंदाजानुसार योगी आदित्यनाथ सत्ता राखण्यात यशस्वी ठरतील. मात्र, यातच आता देशात मशिदी बांधण्यासाठी मंदिरे पाडली गेली, त्या ठिकाणी भाजप पुन्हा मंदिरे बांधणार असल्याचे विधान एका भाजप नेत्याने केले आहे. (sangeet som claimed bjp will build temples at india where temples have been razed to build mosques) 

“पालकमंत्री उदय सामंत कोकणातील शक्ती कपूर, सचिन वाझेचे भाऊ”; राणेंची शिवसेनेवर टीका

सरधानाचे आमदार संगीत सोम यांनी हे विधान केले असून, ते नेहमीच त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतात. उत्तर प्रदेशमधील योगी सरकारला साडेचार वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात बोलताना सोम यांनी सदर दावा केला असून, अखिलेश यादव हे हंगामी हिंदू असल्याची टीका सोम यांनी केली आहे. 

“काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून राष्ट्रवादीचा जन्म, शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत”

अखिलेश यादव हंगामी हिंदू आहेत. ते इथे चालणार नाहीत

अखिलेश यादव हंगामी हिंदू आहेत. ते इथे चालणार नाहीत, भारतात प्रत्येकजण हिंदू आहे, मुस्लिमही हिंदू आहे, हिंदूही हिंदू आहे आणि हिंदुस्थान हा हिंदूंचा आहे. अखिलेश यादव सारखे लोक म्हणत आहेत की ते विश्वकर्मा मंदिर बांधतील, हे तेच लोक आहेत ज्यांनी राम भक्तांवर गोळीबार केला. ज्यांनी बनारसमध्ये साधूंवर लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले? हे लोक आता हात जोडून माफी मागत आहेत. पण लोक त्यांना माफ करणार नाही, अशी टीका करत भारतातील ज्या ठिकाणी मशिदी बांधण्यासाठी मंदिरे पाडली गेली आहेत, त्या सर्व ठिकाणी भाजपाकडून मंदिरे बांधली जातील. सपा प्रमुखांमध्ये हिंमत असल्यास, मथुरेतील मंदिरे पाडून तिथे मशीद बांधली गेली, असे बोलून दाखवण्याचे आव्हान सोम यांनी यावेळी दिले. 

लहान मुलांसाठी संजीवनी! ‘या’ कंपनीची लस ठरणार अधिक प्रभावी, लवकरच मिळणार मंजुरी

दरम्यान, उत्तर देताना योगींनी मै आऊंगा ना म्हणत मी पुन्हा येईन, असेच म्हटले आहे. तसेच आम्ही रेकॉर्ड तोडण्यासाठीच आलो आहोत, जो ट्रेंड सुरू आहे त्यानुसार, भाजपला ३५० पेक्षा कमी जागा मिळणार नाहीत, असे म्हणत एकहाती सत्ता येणार असल्याचे योगी आदित्यनाथ यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे. 

टॅग्स :Politicsराजकारणyogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपाRam Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याElectionनिवडणूक