शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

IIT च्या गोल्ड मेडलिस्टने लाखोंची नोकरी सोडली अन् बनले संन्यासी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2022 22:43 IST

Sandeep kumar Bhatt : एक कंपनीतील भरघोस पगाराची नोकरी सोडून वयाच्या 28 व्या वर्षी त्यांनी संन्यासाचा मार्ग स्वीकारला. 

नवी दिल्ली : आयआयटी दिल्लीमधून (IIT Delhi)  बीटेक केलेल्या गोल्ड मेडलिस्ट इंजिनिअरचा संन्‍यासी बनण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संदीप कुमार भट्ट (Sandeep kumar Bhatt) असे या गोल्ड मेडलिस्ट इंजिनिअरचे नाव आहे. त्यांनी लग्नही केलेले नाही. एक कंपनीतील भरघोस पगाराची नोकरी सोडून वयाच्या 28 व्या वर्षी त्यांनी संन्यासाचा मार्ग स्वीकारला. 

संन्यासी झाल्यावर ते स्वामी सुंदर गोपाल दास (Swami Sundar Gopal Das) झाले. ते मूळचे बिहारचे आहेत. त्यांनी सांगितले की, 2002 मध्ये त्याने आयआयटी दिल्लीतून बी.टेक केले. बी.टेकमध्ये गोल्‍ड मेडलिस्‍ट मिळवले. 2004 मध्ये एमटेक पूर्ण केले. 2004 ते 2007 पर्यंत लार्सन अँड टुब्रो (Larsen & Toubro) येथे व्यवस्थापक म्हणून काम केले. त्यानंतर 2007 मध्येच संन्यासी होण्याचा निर्णय घेतला.

यंत्राचा दर्जा वाढत आहे, पण माणसाची गुणवत्ता कमी होत आहे. दरवर्षी लाखो गुन्हे घडतात, हा माणसाची गुणवत्ता ढासळत असल्याचा प्रमाण आहे, असे संदीप भट्ट म्हणाले. तसेच, 'माझ्या मते सुशिक्षितांनी साधू-संत झाले पाहिजेत. शेवटी, मोठ्या कंपन्यांनी आयआयटीमधून लोकांना नोकरी देण्याचे कारण काय आहे? समाजात चांगल्या गोष्टींना चालना द्यायची असेल तर अशा लोकांनीही पुढे आले पाहिजे', असेही संदीप भट्ट यांनी सांगितले.

दरम्यान, इंजिनीअरिंग करत असताना संदीप भट्ट यांच्या लक्षात आले की, आपल्या आजूबाजूला अनेक इंजिनियर, डॉक्टर, आयएएस, न्यायाधीश, शास्त्रज्ञ, नेते आहेत. पण, समाजाला वेगळा मार्ग दाखवू शकेल, असा माणूस नाही. लोकांचे चारित्र्य सुधारण्यासाठी. धार्मिक शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी संदीप भट्ट संन्यासी बनले.

लोक भौतिक सुखांच्या मागे लागले आहेत, असे संदीप भट्ट म्हणाले. तसेच, संदीप भट्ट उर्फ ​​गोपाल दास यांनीही आत्महत्या, ड्रग्ज याविषयी भाष्य केले. सर्व चुकीच्या सवयी सुधारण्यासाठी धार्मिक शिक्षणाची गरज असल्याचे ते म्हणाले. तसेच, लोकांना माणूस कसे व्हायचे हेच कळत नाही. लोकांमध्ये स्वयंनियमन नाही. नोबेल मिळणं ही काही मोठी गोष्ट नाही, पण बिघडलेल्या माणसाला सुधारलं तर ते खरंच मोठं काम आहे, असे संदीप भट्ट यांनी सांगितले.

याचबरोबर, जेव्हा कुटुंबीयांना ते संन्यासी झाल्याची माहिती मिळाली, तेव्हा त्यांची प्रतिक्रिया कुटुंबातील कोणत्याही सदस्याची असते तशीच होती. पण, त्यांना हेच करायचे आहे, असे त्यांनी घरच्यांना समजावून सांगितले. आयआयटी दिल्लीत असताना त्यांनी श्रीमद भागवत गीताही वाचली, ज्यामुळे त्यांच्या आयुष्यात मोठा बदल झाल्याचे संदीप भट्ट म्हणतात.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेdelhiदिल्ली