शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

IIT च्या गोल्ड मेडलिस्टने लाखोंची नोकरी सोडली अन् बनले संन्यासी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2022 22:43 IST

Sandeep kumar Bhatt : एक कंपनीतील भरघोस पगाराची नोकरी सोडून वयाच्या 28 व्या वर्षी त्यांनी संन्यासाचा मार्ग स्वीकारला. 

नवी दिल्ली : आयआयटी दिल्लीमधून (IIT Delhi)  बीटेक केलेल्या गोल्ड मेडलिस्ट इंजिनिअरचा संन्‍यासी बनण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संदीप कुमार भट्ट (Sandeep kumar Bhatt) असे या गोल्ड मेडलिस्ट इंजिनिअरचे नाव आहे. त्यांनी लग्नही केलेले नाही. एक कंपनीतील भरघोस पगाराची नोकरी सोडून वयाच्या 28 व्या वर्षी त्यांनी संन्यासाचा मार्ग स्वीकारला. 

संन्यासी झाल्यावर ते स्वामी सुंदर गोपाल दास (Swami Sundar Gopal Das) झाले. ते मूळचे बिहारचे आहेत. त्यांनी सांगितले की, 2002 मध्ये त्याने आयआयटी दिल्लीतून बी.टेक केले. बी.टेकमध्ये गोल्‍ड मेडलिस्‍ट मिळवले. 2004 मध्ये एमटेक पूर्ण केले. 2004 ते 2007 पर्यंत लार्सन अँड टुब्रो (Larsen & Toubro) येथे व्यवस्थापक म्हणून काम केले. त्यानंतर 2007 मध्येच संन्यासी होण्याचा निर्णय घेतला.

यंत्राचा दर्जा वाढत आहे, पण माणसाची गुणवत्ता कमी होत आहे. दरवर्षी लाखो गुन्हे घडतात, हा माणसाची गुणवत्ता ढासळत असल्याचा प्रमाण आहे, असे संदीप भट्ट म्हणाले. तसेच, 'माझ्या मते सुशिक्षितांनी साधू-संत झाले पाहिजेत. शेवटी, मोठ्या कंपन्यांनी आयआयटीमधून लोकांना नोकरी देण्याचे कारण काय आहे? समाजात चांगल्या गोष्टींना चालना द्यायची असेल तर अशा लोकांनीही पुढे आले पाहिजे', असेही संदीप भट्ट यांनी सांगितले.

दरम्यान, इंजिनीअरिंग करत असताना संदीप भट्ट यांच्या लक्षात आले की, आपल्या आजूबाजूला अनेक इंजिनियर, डॉक्टर, आयएएस, न्यायाधीश, शास्त्रज्ञ, नेते आहेत. पण, समाजाला वेगळा मार्ग दाखवू शकेल, असा माणूस नाही. लोकांचे चारित्र्य सुधारण्यासाठी. धार्मिक शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी संदीप भट्ट संन्यासी बनले.

लोक भौतिक सुखांच्या मागे लागले आहेत, असे संदीप भट्ट म्हणाले. तसेच, संदीप भट्ट उर्फ ​​गोपाल दास यांनीही आत्महत्या, ड्रग्ज याविषयी भाष्य केले. सर्व चुकीच्या सवयी सुधारण्यासाठी धार्मिक शिक्षणाची गरज असल्याचे ते म्हणाले. तसेच, लोकांना माणूस कसे व्हायचे हेच कळत नाही. लोकांमध्ये स्वयंनियमन नाही. नोबेल मिळणं ही काही मोठी गोष्ट नाही, पण बिघडलेल्या माणसाला सुधारलं तर ते खरंच मोठं काम आहे, असे संदीप भट्ट यांनी सांगितले.

याचबरोबर, जेव्हा कुटुंबीयांना ते संन्यासी झाल्याची माहिती मिळाली, तेव्हा त्यांची प्रतिक्रिया कुटुंबातील कोणत्याही सदस्याची असते तशीच होती. पण, त्यांना हेच करायचे आहे, असे त्यांनी घरच्यांना समजावून सांगितले. आयआयटी दिल्लीत असताना त्यांनी श्रीमद भागवत गीताही वाचली, ज्यामुळे त्यांच्या आयुष्यात मोठा बदल झाल्याचे संदीप भट्ट म्हणतात.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेdelhiदिल्ली