शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
5
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
6
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
7
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
8
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
9
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
10
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
11
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
12
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
13
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
14
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
15
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
17
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
18
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
19
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

IIT च्या गोल्ड मेडलिस्टने लाखोंची नोकरी सोडली अन् बनले संन्यासी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2022 22:43 IST

Sandeep kumar Bhatt : एक कंपनीतील भरघोस पगाराची नोकरी सोडून वयाच्या 28 व्या वर्षी त्यांनी संन्यासाचा मार्ग स्वीकारला. 

नवी दिल्ली : आयआयटी दिल्लीमधून (IIT Delhi)  बीटेक केलेल्या गोल्ड मेडलिस्ट इंजिनिअरचा संन्‍यासी बनण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संदीप कुमार भट्ट (Sandeep kumar Bhatt) असे या गोल्ड मेडलिस्ट इंजिनिअरचे नाव आहे. त्यांनी लग्नही केलेले नाही. एक कंपनीतील भरघोस पगाराची नोकरी सोडून वयाच्या 28 व्या वर्षी त्यांनी संन्यासाचा मार्ग स्वीकारला. 

संन्यासी झाल्यावर ते स्वामी सुंदर गोपाल दास (Swami Sundar Gopal Das) झाले. ते मूळचे बिहारचे आहेत. त्यांनी सांगितले की, 2002 मध्ये त्याने आयआयटी दिल्लीतून बी.टेक केले. बी.टेकमध्ये गोल्‍ड मेडलिस्‍ट मिळवले. 2004 मध्ये एमटेक पूर्ण केले. 2004 ते 2007 पर्यंत लार्सन अँड टुब्रो (Larsen & Toubro) येथे व्यवस्थापक म्हणून काम केले. त्यानंतर 2007 मध्येच संन्यासी होण्याचा निर्णय घेतला.

यंत्राचा दर्जा वाढत आहे, पण माणसाची गुणवत्ता कमी होत आहे. दरवर्षी लाखो गुन्हे घडतात, हा माणसाची गुणवत्ता ढासळत असल्याचा प्रमाण आहे, असे संदीप भट्ट म्हणाले. तसेच, 'माझ्या मते सुशिक्षितांनी साधू-संत झाले पाहिजेत. शेवटी, मोठ्या कंपन्यांनी आयआयटीमधून लोकांना नोकरी देण्याचे कारण काय आहे? समाजात चांगल्या गोष्टींना चालना द्यायची असेल तर अशा लोकांनीही पुढे आले पाहिजे', असेही संदीप भट्ट यांनी सांगितले.

दरम्यान, इंजिनीअरिंग करत असताना संदीप भट्ट यांच्या लक्षात आले की, आपल्या आजूबाजूला अनेक इंजिनियर, डॉक्टर, आयएएस, न्यायाधीश, शास्त्रज्ञ, नेते आहेत. पण, समाजाला वेगळा मार्ग दाखवू शकेल, असा माणूस नाही. लोकांचे चारित्र्य सुधारण्यासाठी. धार्मिक शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी संदीप भट्ट संन्यासी बनले.

लोक भौतिक सुखांच्या मागे लागले आहेत, असे संदीप भट्ट म्हणाले. तसेच, संदीप भट्ट उर्फ ​​गोपाल दास यांनीही आत्महत्या, ड्रग्ज याविषयी भाष्य केले. सर्व चुकीच्या सवयी सुधारण्यासाठी धार्मिक शिक्षणाची गरज असल्याचे ते म्हणाले. तसेच, लोकांना माणूस कसे व्हायचे हेच कळत नाही. लोकांमध्ये स्वयंनियमन नाही. नोबेल मिळणं ही काही मोठी गोष्ट नाही, पण बिघडलेल्या माणसाला सुधारलं तर ते खरंच मोठं काम आहे, असे संदीप भट्ट यांनी सांगितले.

याचबरोबर, जेव्हा कुटुंबीयांना ते संन्यासी झाल्याची माहिती मिळाली, तेव्हा त्यांची प्रतिक्रिया कुटुंबातील कोणत्याही सदस्याची असते तशीच होती. पण, त्यांना हेच करायचे आहे, असे त्यांनी घरच्यांना समजावून सांगितले. आयआयटी दिल्लीत असताना त्यांनी श्रीमद भागवत गीताही वाचली, ज्यामुळे त्यांच्या आयुष्यात मोठा बदल झाल्याचे संदीप भट्ट म्हणतात.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेdelhiदिल्ली