शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
4
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
5
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
6
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
7
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
8
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
9
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
10
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
11
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
12
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
13
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
14
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
15
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
16
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
17
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
18
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
19
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
20
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
Daily Top 2Weekly Top 5

सनातनचा अपमान केला, आज औरंगजेबाचे वंशज रिक्षा चालवतात; सीएम योगींचे मोठे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 16:10 IST

'सनातन धर्माने सर्व पंथ आणि धर्माला आपत्तीच्या काळात आश्रय दिला, पण प्रत्येक काळात हिंदू मंदिरांवर हल्ले झाले.'

अयोध्या :उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येत आयोजित एका कार्यक्रमात संभल प्रकरणावर मोठे वक्तव्य केले आहे. प्रत्येक काळात हिंदू मंदिरांवर हल्ले झाले, अयोध्या, संभल आणि भोजपूरमध्ये मंदिरे पाडण्यात आली. सनातन धर्माने सर्वांना आश्रय दिला, तरीदेखील मंदिरांना नुकसान पोहोचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला गेला, असे योगी आदित्यनाथ म्हणाले. ते अयोध्या धाममध्ये आयोजित 'अष्टोत्रशता ​​108 श्रीमद भागवत पाठ, पंच नारायण महायज्ञ' कार्यक्रमात बोलत होते.

प्रत्येक काळात हिंदूंना टार्गेट केलंसनातन धर्माच्या महत्त्वाबाबत बोलताना योगी आदित्यनाथ म्हणतात की, सनातन धर्म सुरक्षित असेल, तर सर्वजण सुरक्षित राहतील. सनातन धर्म हा एकमेव धर्म आहे, ज्याने प्रत्येक पंथ आणि धर्माला आपत्तीच्या काळात आश्रय दिला. पण हिंदूंच्या बाबतीत असे घडताना दिसत नाही. बांग्लादेशात, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात काय झाले? हे आपण सर्वजण पाहत आहोत. कधी काशी विश्वनाथ, कधी अयोध्या, कधी संभलम तर कधी भोजपूर...सर्वत्र हिंदू मंदिरांना लक्ष्य करण्यात आले.

मंदिरे पाडणाऱ्यांचे वंश नष्ट झालेमला विचारायचे आहे की, सनातन धर्माची श्रद्धास्थाने पाडणारे कोण होते? असे करण्यामागे त्यांचा हेतू काय होता? या रानटी कृत्यांमधून संपूर्ण पृथ्वीला नर्क बनवण्याचा त्यांचा डाव होता. हिंदूंची अनेक मंदिरे नष्ट केली, पण आता मंदिरे पाडणाऱ्यांचेच वंश नष्ट झाले आहे. मी ऐकलंय की, औरंगजेबाचे वंशज आज कोलकात्याजवळ रिक्षा चालवतात. त्याने मंदिरे पाडली नसती, तर आज त्याच्या वंशजांना अशा अवस्थेत राहण्याची वेळ आली नसती. सनातन धर्म हा भारताचा राष्ट्रधर्म आहे. हा धर्म सुरक्षित ठेवणे, हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. धर्म आणि संस्कृतीच्या माध्यमातून समाजात सकारात्मकता आणि शांतता पसरते, असेही सीएम योगी यावेळी म्हणाले.  

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशSanatan Sansthaसनातन संस्थाHinduहिंदू