शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
5
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
6
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
7
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
8
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
9
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
10
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
11
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
12
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
13
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
14
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
15
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
16
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
17
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
18
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
19
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
20
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

सनातनचा अपमान केला, आज औरंगजेबाचे वंशज रिक्षा चालवतात; सीएम योगींचे मोठे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 16:10 IST

'सनातन धर्माने सर्व पंथ आणि धर्माला आपत्तीच्या काळात आश्रय दिला, पण प्रत्येक काळात हिंदू मंदिरांवर हल्ले झाले.'

अयोध्या :उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येत आयोजित एका कार्यक्रमात संभल प्रकरणावर मोठे वक्तव्य केले आहे. प्रत्येक काळात हिंदू मंदिरांवर हल्ले झाले, अयोध्या, संभल आणि भोजपूरमध्ये मंदिरे पाडण्यात आली. सनातन धर्माने सर्वांना आश्रय दिला, तरीदेखील मंदिरांना नुकसान पोहोचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला गेला, असे योगी आदित्यनाथ म्हणाले. ते अयोध्या धाममध्ये आयोजित 'अष्टोत्रशता ​​108 श्रीमद भागवत पाठ, पंच नारायण महायज्ञ' कार्यक्रमात बोलत होते.

प्रत्येक काळात हिंदूंना टार्गेट केलंसनातन धर्माच्या महत्त्वाबाबत बोलताना योगी आदित्यनाथ म्हणतात की, सनातन धर्म सुरक्षित असेल, तर सर्वजण सुरक्षित राहतील. सनातन धर्म हा एकमेव धर्म आहे, ज्याने प्रत्येक पंथ आणि धर्माला आपत्तीच्या काळात आश्रय दिला. पण हिंदूंच्या बाबतीत असे घडताना दिसत नाही. बांग्लादेशात, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात काय झाले? हे आपण सर्वजण पाहत आहोत. कधी काशी विश्वनाथ, कधी अयोध्या, कधी संभलम तर कधी भोजपूर...सर्वत्र हिंदू मंदिरांना लक्ष्य करण्यात आले.

मंदिरे पाडणाऱ्यांचे वंश नष्ट झालेमला विचारायचे आहे की, सनातन धर्माची श्रद्धास्थाने पाडणारे कोण होते? असे करण्यामागे त्यांचा हेतू काय होता? या रानटी कृत्यांमधून संपूर्ण पृथ्वीला नर्क बनवण्याचा त्यांचा डाव होता. हिंदूंची अनेक मंदिरे नष्ट केली, पण आता मंदिरे पाडणाऱ्यांचेच वंश नष्ट झाले आहे. मी ऐकलंय की, औरंगजेबाचे वंशज आज कोलकात्याजवळ रिक्षा चालवतात. त्याने मंदिरे पाडली नसती, तर आज त्याच्या वंशजांना अशा अवस्थेत राहण्याची वेळ आली नसती. सनातन धर्म हा भारताचा राष्ट्रधर्म आहे. हा धर्म सुरक्षित ठेवणे, हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. धर्म आणि संस्कृतीच्या माध्यमातून समाजात सकारात्मकता आणि शांतता पसरते, असेही सीएम योगी यावेळी म्हणाले.  

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशSanatan Sansthaसनातन संस्थाHinduहिंदू