शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

सनातनचा अपमान केला, आज औरंगजेबाचे वंशज रिक्षा चालवतात; सीएम योगींचे मोठे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 16:10 IST

'सनातन धर्माने सर्व पंथ आणि धर्माला आपत्तीच्या काळात आश्रय दिला, पण प्रत्येक काळात हिंदू मंदिरांवर हल्ले झाले.'

अयोध्या :उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येत आयोजित एका कार्यक्रमात संभल प्रकरणावर मोठे वक्तव्य केले आहे. प्रत्येक काळात हिंदू मंदिरांवर हल्ले झाले, अयोध्या, संभल आणि भोजपूरमध्ये मंदिरे पाडण्यात आली. सनातन धर्माने सर्वांना आश्रय दिला, तरीदेखील मंदिरांना नुकसान पोहोचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला गेला, असे योगी आदित्यनाथ म्हणाले. ते अयोध्या धाममध्ये आयोजित 'अष्टोत्रशता ​​108 श्रीमद भागवत पाठ, पंच नारायण महायज्ञ' कार्यक्रमात बोलत होते.

प्रत्येक काळात हिंदूंना टार्गेट केलंसनातन धर्माच्या महत्त्वाबाबत बोलताना योगी आदित्यनाथ म्हणतात की, सनातन धर्म सुरक्षित असेल, तर सर्वजण सुरक्षित राहतील. सनातन धर्म हा एकमेव धर्म आहे, ज्याने प्रत्येक पंथ आणि धर्माला आपत्तीच्या काळात आश्रय दिला. पण हिंदूंच्या बाबतीत असे घडताना दिसत नाही. बांग्लादेशात, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात काय झाले? हे आपण सर्वजण पाहत आहोत. कधी काशी विश्वनाथ, कधी अयोध्या, कधी संभलम तर कधी भोजपूर...सर्वत्र हिंदू मंदिरांना लक्ष्य करण्यात आले.

मंदिरे पाडणाऱ्यांचे वंश नष्ट झालेमला विचारायचे आहे की, सनातन धर्माची श्रद्धास्थाने पाडणारे कोण होते? असे करण्यामागे त्यांचा हेतू काय होता? या रानटी कृत्यांमधून संपूर्ण पृथ्वीला नर्क बनवण्याचा त्यांचा डाव होता. हिंदूंची अनेक मंदिरे नष्ट केली, पण आता मंदिरे पाडणाऱ्यांचेच वंश नष्ट झाले आहे. मी ऐकलंय की, औरंगजेबाचे वंशज आज कोलकात्याजवळ रिक्षा चालवतात. त्याने मंदिरे पाडली नसती, तर आज त्याच्या वंशजांना अशा अवस्थेत राहण्याची वेळ आली नसती. सनातन धर्म हा भारताचा राष्ट्रधर्म आहे. हा धर्म सुरक्षित ठेवणे, हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. धर्म आणि संस्कृतीच्या माध्यमातून समाजात सकारात्मकता आणि शांतता पसरते, असेही सीएम योगी यावेळी म्हणाले.  

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशSanatan Sansthaसनातन संस्थाHinduहिंदू