शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पावरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

बिहारमध्ये राजकीय उलथापालथ! "नितीश यांनी 'इंडिया'सोबत राहावं, ते PM पदाचा चेहरा आहेत"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2024 17:32 IST

Dimple Yadav on Bihar Political Crisis: बिहारचे मुख्यमंत्री 'इंडिया' आघाडीला धक्का देण्याच्या तयारीत आहेत. 

Bihar Political Crisis: बिहारचे मुख्यमंत्री 'इंडिया' आघाडीला धक्का देण्याच्या तयारीत आहेत. बिहारमध्ये राजकीय उलथापथ सुरू असून नितीश कुमार पुन्हा एकदा एनडीएसोबत जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. बिहारमधील राजकीय गोंधळाबाबत समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या पत्नी आणि समाजवादी पार्टीच्या खासदार डिंपल यादव यांनी एक मोठे विधान केले. "नितीश कुमार इंडिया आघाडीसोबत राहिल्यास त्याचा त्यांना मोठा फायदा होईल, ते पंतप्रधान पदाचा चेहरा असतील. बिहारमध्ये जे काही सुरू आहे, ते मीडियाच्या माध्यमातून आम्हाला कळत आहे", असे त्यांनी सांगितले. 

डिंपल यादव म्हणाल्या की, मुख्यमंत्री नितीश कुमार सोबत राहिले तर इंडिया आघाडी खूप मजबूत होईल. सध्याचे सरकार संविधानाच्या विरोधात काम करत असून तरुणांना नाराज करत आहे. सरकारने सर्व माता भगिनींना निराश केले. शेतकऱ्यांवर अन्याय केला. 

तसेच डिंपल यादव यांनी सपा प्रमुख अखिलेश यादव यांच्या काँग्रेससोबत ११ जागांवर करार करण्याबाबत केलेल्या पोस्टवर देखील भाष्य केले. त्या म्हणाल्या की, उत्तर प्रदेशात भाजपाच्या समोर भक्कमपणे उभे राहण्याची गरज आहे आणि इंडिया आघाडीचे कोणतेही नुकसान होणार नाही याची काळजी सपा घेईल. आमच्या पक्षाचेही नुकसान होता कामा नये. जिंकणाऱ्या जागांवर लक्ष केंद्रीत करायला हवे. त्यामुळे मला वाटते की, जागांचा प्रश्न नाही कारण कोण जिंकू शकतो, हा खरा प्रश्न आहे. भाजपाला कोण हरवू शकते, याकडे पक्षाचे लक्ष आहे.

बिहारमध्ये राजकीय उलथापालथमागील काही दिवसांपासून बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी भाजपासोबत जाण्याचे संकेत दिले आहेत. नितीश कुमार यांनी पलटी घेताच बिहारमधील आरजेडी आणि जदयूचे सरकार कोसळेल, ज्याचा परिणाम २०२४ च्या लोकसभा निवडणुकीवर होईल. महाआघाडीत लालू यादव यांचा राजद, नितीश कुमार यांचा जदयू, काँग्रेस आणि इतर छोट्या पक्षांचा समावेश आहे. जेव्हा भारत सरकारने बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याची घोषणा केली तेव्हा नितीश कुमार यांनी लगेचच पोस्ट करून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले. कर्पुरी यांना भारतरत्न मिळणे ही आनंदाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. कर्पुरी ठाकूर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या गावी पोहचून नितीश यांनी कर्पुरी यांचा मुलगा रामनाथ ठाकूर यांच्याबद्दल भाष्य केले. तसेच कर्पुरी यांनी कधीच आपल्या मुलाला पुढे आणले नाही. पण आता लोक केवळ आपल्या कुटुंबाचा विचार करत आहेत, असे विधान त्यांनी केले. नितीश यांचा हा टोमणा लालू यादवांना असल्याचे बोलले जाते. 

टॅग्स :BiharबिहारNitish Kumarनितीश कुमारIndiaभारतSamajwadi Partyसमाजवादी पार्टी