शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
3
कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ होणार! पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन
4
Axar Patel: विराट कोहली, ख्रिस गेलनंतर फक्त अक्षर पटेलच करू शकला 'अशी' कामगिरी!
5
Wife सोबत मिळून Post Office च्या या स्कीममध्ये ₹४ लाख जमा करा, पाहा महिन्याला किती मिळेल व्याज?
6
अजित पवारांचा घूमजाव, आधी म्हणाले कल्पना होती, आता म्हणतात, "पार्थच्या जमीन व्यवहाराची माहिती नाही"
7
‘तू बघत राहा, मी खोलीत गुदमरून मरेन’, पत्नीला  मेसेज पाठवून पतीने दरवाजा केला बंद, त्यानंतर...
8
महामार्गांवरून भटक्या कुत्र्यांना हटवा, त्यांचे लसीकरण आणि नसबंदी करून...; सर्वोच्च न्यायालयाचे तीन आदेश
9
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
10
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
11
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
12
मारुतीने व्हिक्टोरिस लाँच केली अन् या कारवर बंपर सूट दिली; ऑक्टोबरपेक्षा आणखी ५४,००० रुपयांनी स्वस्त केली...
13
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'
14
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड देत बनला 'नंबर वन'
15
Astro Tips: काही जातकांच्या पत्रिकेत विवाह योगच नसतो; त्यांनी कोणता उपाय करावा? पाहू 
16
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
17
शनिवारी संकष्ट चतुर्थी, ३ राशींना साडेसाती; ‘हे’ ५ उपाय नक्की करा, शनिदोषातून मुक्तता मिळवा!
18
Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
19
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
20
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल

"माझ्या वडिलांनी बॉम्बहल्ला केला होता, पण...", भाजपला सचिन पायलटांचे सडेतोड उत्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2023 13:06 IST

मिझोराममध्ये १९६६ मध्ये झालेल्या बॉम्बहल्ल्यात सचिन पायलट यांच्या वडिलांचाही हात असल्याचा आरोप अमित मालवीय यांनी केला होता. याला सचिन पायलट यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.

मणिपूर आणि इतर ईशान्येकडील राज्यावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये मतभेद पाहयला मिळतात. नुकतेच मणिपूरच्या मुद्द्यावर विरोधकांकडून संसदेत अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला होता. दरम्यान, सोशल मीडियावर काँग्रेस नेते सचिन पायलट आणि भाजप नेते अमित मालवीय यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. मिझोराममध्ये १९६६ मध्ये झालेल्या बॉम्बहल्ल्यात सचिन पायलट यांच्या वडिलांचाही हात असल्याचा आरोप अमित मालवीय यांनी केला होता. याला सचिन पायलट यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.

अमित मालविय यांनी १३ ऑगस्टला एक ट्विट केले होते. यामध्ये 'राजेश पायलट आणि सुरेश कलमाडी भारतीय हवाईदलाचे विमान उडवत होते. त्यांनी ५ मार्च १९६६ रोजी मिझोरामची राजधानी ऐझॉलवर बॉम्बहल्ला केला होता. त्यानंतर राजेश पायलट आणि सुरेश कलमाडी काँग्रेसच्या तिकीटावर मंत्री झाली. इंदिरा गांधी यांनी त्यांना राजकारणात घेऊन बक्षीस दिले हे स्पष्ट आहे. ज्यांनी आपल्याच लोकांवर बॉम्बहल्ला केला त्यांना सन्मान देण्यात आला, असा दावा अमित मालविय यांनी केला होता.

अमित मालवीय यांच्या या दाव्याला सचिन पायलट यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. कागद दाखवत सचिन पायलट यांनी ट्विटरवर म्हटले की, त्यांचे वडील राजेश पायलट हे २९ ऑक्टोबर १९६६ रोजी हवाई दलात नियुक्त झाले होते. त्यामुळे ५ मार्च १९६६ रोजी झालेल्या बॉम्बस्फोटाचा दावा पूर्णपणे निराधार आहे. तसेच, ८० च्या दशकात मिझोराममध्ये युद्धविराम आणि शांतता करार होण्यात माझ्या वडिलांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती, असेही  सचिन पायलट यांनी म्हटले आहे. याशिवाय, सचिन पायलट यांनी असा दावाही केला की, हवाई दलाचा पायलट या नात्याने माझ्या वडिलांनी बॉम्बहल्ला केला होता, पण १९७१ चे भारत-पाकिस्तान युद्ध झाले, तेव्हा ते पूर्व पाकिस्तानमध्ये होते. म्हणजेच मिझोरामबाबत तुमचा दावा पूर्णपणे चुकीचा आहे.

दरम्यान, मिझोरामचा हा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अविश्वास ठरावादरम्यान दिलेल्या भाषणानंतर निर्माण झाला आहे. आपल्या भाषणात नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर आरोप केला होता की, मिझोरममध्ये काँग्रेसने आपल्याच नागरिकांवर हवाई दलाने हल्ला केला होता, मिझोरमचे लोक काय आपल्या देशाचे नागरिक नाहीत. आजही मिझोराममध्ये ५ मार्च हा दिवस शोक दिन म्हणून पाळला जातो. मणिपूर मुद्द्यावरून काँग्रेसवर नरेंद्र मोदींनी हा हल्लाबोल केला होता. यानंतर काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

टॅग्स :Sachin Pilotसचिन पायलटBJPभाजपाcongressकाँग्रेसPoliticsराजकारण