शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

"माझ्या वडिलांनी बॉम्बहल्ला केला होता, पण...", भाजपला सचिन पायलटांचे सडेतोड उत्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2023 13:06 IST

मिझोराममध्ये १९६६ मध्ये झालेल्या बॉम्बहल्ल्यात सचिन पायलट यांच्या वडिलांचाही हात असल्याचा आरोप अमित मालवीय यांनी केला होता. याला सचिन पायलट यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.

मणिपूर आणि इतर ईशान्येकडील राज्यावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये मतभेद पाहयला मिळतात. नुकतेच मणिपूरच्या मुद्द्यावर विरोधकांकडून संसदेत अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला होता. दरम्यान, सोशल मीडियावर काँग्रेस नेते सचिन पायलट आणि भाजप नेते अमित मालवीय यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. मिझोराममध्ये १९६६ मध्ये झालेल्या बॉम्बहल्ल्यात सचिन पायलट यांच्या वडिलांचाही हात असल्याचा आरोप अमित मालवीय यांनी केला होता. याला सचिन पायलट यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.

अमित मालविय यांनी १३ ऑगस्टला एक ट्विट केले होते. यामध्ये 'राजेश पायलट आणि सुरेश कलमाडी भारतीय हवाईदलाचे विमान उडवत होते. त्यांनी ५ मार्च १९६६ रोजी मिझोरामची राजधानी ऐझॉलवर बॉम्बहल्ला केला होता. त्यानंतर राजेश पायलट आणि सुरेश कलमाडी काँग्रेसच्या तिकीटावर मंत्री झाली. इंदिरा गांधी यांनी त्यांना राजकारणात घेऊन बक्षीस दिले हे स्पष्ट आहे. ज्यांनी आपल्याच लोकांवर बॉम्बहल्ला केला त्यांना सन्मान देण्यात आला, असा दावा अमित मालविय यांनी केला होता.

अमित मालवीय यांच्या या दाव्याला सचिन पायलट यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. कागद दाखवत सचिन पायलट यांनी ट्विटरवर म्हटले की, त्यांचे वडील राजेश पायलट हे २९ ऑक्टोबर १९६६ रोजी हवाई दलात नियुक्त झाले होते. त्यामुळे ५ मार्च १९६६ रोजी झालेल्या बॉम्बस्फोटाचा दावा पूर्णपणे निराधार आहे. तसेच, ८० च्या दशकात मिझोराममध्ये युद्धविराम आणि शांतता करार होण्यात माझ्या वडिलांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती, असेही  सचिन पायलट यांनी म्हटले आहे. याशिवाय, सचिन पायलट यांनी असा दावाही केला की, हवाई दलाचा पायलट या नात्याने माझ्या वडिलांनी बॉम्बहल्ला केला होता, पण १९७१ चे भारत-पाकिस्तान युद्ध झाले, तेव्हा ते पूर्व पाकिस्तानमध्ये होते. म्हणजेच मिझोरामबाबत तुमचा दावा पूर्णपणे चुकीचा आहे.

दरम्यान, मिझोरामचा हा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अविश्वास ठरावादरम्यान दिलेल्या भाषणानंतर निर्माण झाला आहे. आपल्या भाषणात नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर आरोप केला होता की, मिझोरममध्ये काँग्रेसने आपल्याच नागरिकांवर हवाई दलाने हल्ला केला होता, मिझोरमचे लोक काय आपल्या देशाचे नागरिक नाहीत. आजही मिझोराममध्ये ५ मार्च हा दिवस शोक दिन म्हणून पाळला जातो. मणिपूर मुद्द्यावरून काँग्रेसवर नरेंद्र मोदींनी हा हल्लाबोल केला होता. यानंतर काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

टॅग्स :Sachin Pilotसचिन पायलटBJPभाजपाcongressकाँग्रेसPoliticsराजकारण