शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अशोक गेहलोत यांच्यावरच सचिन पायलट नाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2020 01:28 IST

पायलट हे सोमवारच्या विधीमंडळ बैठकीपासून दूर राहिले होते. काँग्रेसचे १८ आमदारही या बैठकीपासून दूर राहिले. तत्पूर्वी, आपल्या पाठीशी काँग्रेसचे ३० आमदार व काही अपक्ष आमदार आहेत, असा दावा पायलट यांनी केला होता.

जयपूर/नवी दिल्ली : २०१८ मधील विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसने अशोक गेहलोत यांना मुख्यमंत्रीपद दिल्यापासून सचिन पायलट नाराज होते. पण मध्यप्रदेशात ज्योदिरादित्य सिंदिया यांच्या बंडानंतर पायलट यांनी समर्थक आमदारांसह भाजपशी संपर्क सुरू केला. ते पुरेसे आमदार घेऊन आल्यास भाजप नेते त्यांना मुख्यमंत्री करण्यास तयार होते, अशी चर्चा सुरूच होती. विधानसभेतील विजय पायलट यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या कार्यकाळात मिळाल्याने त्यांचा या पदावर दावा आहे, असे समर्थकांचे म्हणणे होते.पायलट हे सोमवारच्या विधीमंडळ बैठकीपासून दूर राहिले होते. काँग्रेसचे १८ आमदारही या बैठकीपासून दूर राहिले. तत्पूर्वी, आपल्या पाठीशी काँग्रेसचे ३० आमदार व काही अपक्ष आमदार आहेत, असा दावा पायलट यांनी केला होता. मात्र, २०० सदस्यांच्या विधानसभेत काँग्रेसच्या १०७ पैकी बहुतांश व काही अपक्षांनी गेहलोत सरकारवर विश्वास व्यक्त केला. त्यानंतर पायलट यांनी गेहलोत यांना बहुमत सिद्ध करण्याचे आव्हान दिले.मंगळवारी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक संपल्यानंतर काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पायलट व दोन जणांना मंत्रीपदावरून बरखास्त केल्याची घोषणा केली.पक्षाचे ओबीसी नेते गोविंदसिंग डोटासरा हे राजस्थानचे नवे प्रदेशाध्यक्ष असतील. त्याचबरोबर आदिवासी नेते व आ. गणेश घोगरा यांची युवा काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.गेहलोत यांनी घेतली राज्यपालांची भेटविधिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री गेहलोत यांनी राज्यपाल कलराज मिश्रा यांची भेट घेतली व तीन जणांना मंत्रिमंडळातून काढण्याची शिफारस केली. दरम्यान, राज्यातील राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले होते.बहुमत सिद्ध करा, भाजपची मागणीभाजपने गेहलोत सरकारच्या बहुमताच्या चाचणीची मागणी केली आहे. आमदारांच्या घरांवर पाळत ठेवली जात आहे व बीटीपीच्या आमदारांना धमकावले जात आहे, असा आरोपही पक्षाने केला आहे. विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया यांनी म्हटले आहे की, सरकारने आधी बहुमत सिद्ध करावे व नंतर मंत्रिमंडळाचा फेरबदल करावा.हकालपट्टी दुर्दैवी, काँग्रेस नेत्यांची प्रतिक्रियासचिन पायलट यांची दोन्ही पदांवरून हकालपट्टी करण्याचा निर्णय दुर्दैर्वी व दु:खदायक आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेत्यांनी दिली. पक्षाचे प्रवक्ते अभिषेक सिंघवी यांनी म्हटले आहे की, खुल्या दरवाजांचा वापर केला जात नसेल तर काही दरवाजे बंद केलेच पाहिजेत. आम्हाला अजूनही आशा आहे.

टॅग्स :Sachin Pilotसचिन पायलटAshok Gahlotअशोक गहलोत