शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

अशोक गेहलोत यांच्यावरच सचिन पायलट नाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2020 01:28 IST

पायलट हे सोमवारच्या विधीमंडळ बैठकीपासून दूर राहिले होते. काँग्रेसचे १८ आमदारही या बैठकीपासून दूर राहिले. तत्पूर्वी, आपल्या पाठीशी काँग्रेसचे ३० आमदार व काही अपक्ष आमदार आहेत, असा दावा पायलट यांनी केला होता.

जयपूर/नवी दिल्ली : २०१८ मधील विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसने अशोक गेहलोत यांना मुख्यमंत्रीपद दिल्यापासून सचिन पायलट नाराज होते. पण मध्यप्रदेशात ज्योदिरादित्य सिंदिया यांच्या बंडानंतर पायलट यांनी समर्थक आमदारांसह भाजपशी संपर्क सुरू केला. ते पुरेसे आमदार घेऊन आल्यास भाजप नेते त्यांना मुख्यमंत्री करण्यास तयार होते, अशी चर्चा सुरूच होती. विधानसभेतील विजय पायलट यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या कार्यकाळात मिळाल्याने त्यांचा या पदावर दावा आहे, असे समर्थकांचे म्हणणे होते.पायलट हे सोमवारच्या विधीमंडळ बैठकीपासून दूर राहिले होते. काँग्रेसचे १८ आमदारही या बैठकीपासून दूर राहिले. तत्पूर्वी, आपल्या पाठीशी काँग्रेसचे ३० आमदार व काही अपक्ष आमदार आहेत, असा दावा पायलट यांनी केला होता. मात्र, २०० सदस्यांच्या विधानसभेत काँग्रेसच्या १०७ पैकी बहुतांश व काही अपक्षांनी गेहलोत सरकारवर विश्वास व्यक्त केला. त्यानंतर पायलट यांनी गेहलोत यांना बहुमत सिद्ध करण्याचे आव्हान दिले.मंगळवारी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक संपल्यानंतर काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पायलट व दोन जणांना मंत्रीपदावरून बरखास्त केल्याची घोषणा केली.पक्षाचे ओबीसी नेते गोविंदसिंग डोटासरा हे राजस्थानचे नवे प्रदेशाध्यक्ष असतील. त्याचबरोबर आदिवासी नेते व आ. गणेश घोगरा यांची युवा काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.गेहलोत यांनी घेतली राज्यपालांची भेटविधिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री गेहलोत यांनी राज्यपाल कलराज मिश्रा यांची भेट घेतली व तीन जणांना मंत्रिमंडळातून काढण्याची शिफारस केली. दरम्यान, राज्यातील राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले होते.बहुमत सिद्ध करा, भाजपची मागणीभाजपने गेहलोत सरकारच्या बहुमताच्या चाचणीची मागणी केली आहे. आमदारांच्या घरांवर पाळत ठेवली जात आहे व बीटीपीच्या आमदारांना धमकावले जात आहे, असा आरोपही पक्षाने केला आहे. विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया यांनी म्हटले आहे की, सरकारने आधी बहुमत सिद्ध करावे व नंतर मंत्रिमंडळाचा फेरबदल करावा.हकालपट्टी दुर्दैवी, काँग्रेस नेत्यांची प्रतिक्रियासचिन पायलट यांची दोन्ही पदांवरून हकालपट्टी करण्याचा निर्णय दुर्दैर्वी व दु:खदायक आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेत्यांनी दिली. पक्षाचे प्रवक्ते अभिषेक सिंघवी यांनी म्हटले आहे की, खुल्या दरवाजांचा वापर केला जात नसेल तर काही दरवाजे बंद केलेच पाहिजेत. आम्हाला अजूनही आशा आहे.

टॅग्स :Sachin Pilotसचिन पायलटAshok Gahlotअशोक गहलोत