शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
2
आरपीआय महायुतीतून बाहेर पडली का? रामदास आठवलेंनी मांडली भूमिका; म्हणाले, "काही पक्ष मुंबईत दादागिरी करू पाहताहेत"
3
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
4
PMC Election 2026: वकील आला अन् बातमी फुटली; अजित पवारांकडून गुंड आंदेकरच्या घरातील दोघींना तिकीट
5
सोशल मीडियावरील अश्लील कंटेन्टबद्दल भारत सरकारने घेतला मोठा निर्णय; कडक शब्दांत दिला इशारा
6
कोण आहे १७ वर्षीय G Kamalini? जिला स्मृतीच्या जागी मिळाली टीम इंडियाकडून T20I पदार्पणाची संधी
7
परभणीत उद्धवसेना आणि काँग्रेसची आघाडी; १२ जागांवर मैत्रीपूर्ण लढती
8
"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
9
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू जाणार संघाबाहेर, अचानक घटलं सहा किलो वजन  
10
Mumbai Accident: कोस्टल रोडवर तीन वाहनांमध्ये जोरदार धडक! दोन जण जखमी, अपघात नेमका कसा घडला?
11
Shravan Singh : Video - मोठा होऊन काय होणार?, जवानांची सेवा करणाऱ्या चिमुकल्याने जिंकलं मोदींचं मन
12
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदूची हत्या,  बजेंद्र बिस्वास याचा गोळ्या झाडून घेतला जीव
13
मुंबई: शिवडीमध्ये भीषण आग! एकापाठोपाठ एक ४ सिलेंडरचा स्फोट झाल्याने खळबळ, जिवीतहानी नाही
14
"लोकांनीच त्यांना स्वीकारलं त्यामुळे..."; एकाच घरात तिघांना उमेदवारी मिळाल्यानंतर राहुल नार्वेकरांचे स्पष्टीकरण
15
वर्षाअखेरीस बाजारात 'सुस्ती'! गुंतवणूकदारांचे २२,००० कोटी पाण्यात; टाटा स्टीलची मात्र बाजी
16
Viral Video: सूर्या दादानं शेरवानी घातली तर, वहिनींनी नेसली रेशमी साडी; दोघेही बालाजीच्या चरणी नतमस्तक!
17
'रोहित आणि विराटला निवृत्त होण्यास भाग पाडले...', माजी क्रिकेटपटूचा धक्कादायक दावा
18
MS Dhoni च्या तालमीत तयार झालेल्या CSK क्रिकेटरने दिली गुड न्यूज, लवकरच होणार 'बाबा'
19
BMC Election 2026: महायुतीत मोठी फूट! अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंतर बड्या पक्षाची 'एकला चलो रे'ची हाक
20
"मुलगी मित्रांसोबत गेली...", रक्ताच्या थारोळ्यात सापडली नववीची विद्यार्थिनी; ICU मध्ये मृत्यूशी झुंज
Daily Top 2Weekly Top 5

Russia Ukraine War : भयावह! जीव वाचवण्यासाठी भारतीय विद्यार्थ्यांची धडपड; जाळताहेत स्वतःचच सामान, 'हे' आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2022 12:33 IST

Russia Ukraine War : परतलेल्या विद्यार्थ्यांची व्यथा ऐकून तिथे किती भयावह परिस्थिती आहे, याचा अंदाज येईल.

नवी दिल्ली - रशिया-युक्रेन युद्धात युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना पुन्हा भारतात आणले जात आहे. परतलेल्या विद्यार्थ्यांची व्यथा ऐकून तिथे किती भयावह परिस्थिती आहे, याचा अंदाज येईल. 22 वर्षीय आदित्य, जो युक्रेनमधील टेर्नोपिल नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये दुसऱ्या वर्षात शिकत आहे. त्याने आपला अनुभव सांगितला आहे. "युद्धग्रस्त भागातून शेजारच्या देशांच्या सीमेवर जाणाऱ्या मुला-मुलींचे शरीर थंडीने गोठत आहे. पायी जाताना किंवा टॅक्सीने जाताना आपले सामान त्यांना सोडून जावं लागत आहे. थंडीपासून संरक्षण व्हावं यासाठी रस्त्यावर पडलेलं आणि प्रसंगी स्वतःच सामान जाळून विद्यार्थी जीव वाचवत आहेत. यात कोणाकडे खायला आहे, तर कोणी इतरांना वाटून आपली तहान भूक भागवत आहे" असं म्हटलं आहे. 

3 मार्च रोजी दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर विशेष विमानाने उतरलेल्या आदित्यच्या म्हणण्यानुसार, "ज्यावेळी 24 फेब्रुवारीला युद्ध सुरू झाले तेव्हा मी सर्वजण युक्रेनच्या सीमेकडे धावताना पाहिले. आम्ही 5 मित्रांनीही तिथून निघायचं ठरवलं. पोलंडची शेनी सीमा आपल्यापासून सुमारे 200 किलोमीटर अंतरावर आहे. आम्ही दोघांनी मिळून टॅक्सीने जायचे ठरवले. पण टॅक्सी चालकाने आम्हाला तिथून खूप दूर सोडले. त्यानंतर 2-3 दिवस पायी प्रवास करावा लागला. शेनी चौक सीमेच्या आधी सुमारे 3 किलोमीटर आहे. तिथे आम्हाला थांबवण्यात आलं, आमच्यासोबत गैरव्यवहार झाला. इतर विद्यार्थी 4-4 दिवस बसून असल्याचे पाहिले. ते पार करण्याची वाट पाहत होते. आम्ही आशा सोडून दिल्या होत्या, पुन्हा टेर्नोपिलला परत जावंसं वाटलं. मात्र, 6-7 तासांनंतर आम्हाला सीमा ओलांडण्याची परवानगी मिळाली.

"शरीर थंडीने गोठलं, अन्न-पाणी, गरजेच्या वस्तू संपल्या"

"वाटेत आमच्याकडे अन्न-पाणी आणि इतर गरजेच्या वस्तू संपू लागल्या. मग आम्ही सर्वत्र पडलेल्या इतर लोकांच्या सापडलेल्या गोष्टींमधून आमच्या कामाच्या गोष्टी वापरल्या. वाटेत पडलेल्या इतर आणि कमी वापराच्या वस्तू जाळून शरीर उबदार ठेवण्याची व्यवस्था केली"  असं देखील म्हटलं आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, बरेच लोक अद्याप युक्रेनमध्ये कुठे आहेत, हे शोधणं बाकी आहे. त्यात त्याचा मित्र हिमेश आहे. तो 9 दिवसांपासून बेपत्ता आहे. तो अवघ्या 3 महिन्यांपूर्वी युक्रेनमध्ये शिक्षणासाठी आला होता. मेडिकलच्या पहिल्या वर्षात शिकत होता. आता कुठे, कोणत्या अवस्थेत असेल मला माहीत नाही.

"आजूबाजूला स्फोटाचे आवाज, प्रचंड भीतीसह 2 दिवस पायी चाललो"

19 वर्षीय इकराही आदित्यसोबत परतली आहे. 'इंडिया टुडे'शी संवाद साधताना ती म्हणाली, 'आमच्या कॉलेजच्या समन्वयकाने आम्हाला खूप मदत केली. त्यांनी आमच्यासाठी बसची व्यवस्था केली. जेणेकरून आम्ही रोमानिया सीमेपर्यंत जाऊ शकू. मात्र, जिथून बस निघाली तिथून आम्ही 2 दिवस चालत सीमेवर पोहोचलो. दुसरा पर्याय नसल्याने आम्हाला आमचे सामान वाटेतच सोडावे लागले. खारकीव्हमध्ये शिकणाऱ्या माझ्या सहकारी विद्यार्थ्यांसाठी मला खूप भीती वाटते. जेव्हा युद्ध सुरू झाले तेव्हा आम्ही निघेपर्यंत आम्हाला आमच्या आजूबाजूला स्फोटाचे आवाज ऐकू येत होते. खारकीव्हमध्ये युद्ध शिगेला पोहोचले आहे. ते लोक कसे असतील माहीत नाही.'' हे सांगेपर्यंत इकरा भावूक झाली. ती युक्रेनमधील फ्रँकिश नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये शिकते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाIndiaभारतStudentविद्यार्थी