शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

महामारीत निवडणुका घेण्याची नियमावली तीन दिवसांत येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2020 05:05 IST

बिहार विधानसभेची मुदत नोव्हेंबरमध्ये संपत असून ती निवडणूक त्याआधी घ्यावी लागणार आहे.

नवी दिल्ली : सध्याची कोरोना महामारी सुरू असेपर्यंतच्या काळात घ्याव्या लागणाऱ्या निवडणुका कशा घ्याव्यात आणि त्यावेळी प्रचार कसा करावा, याविषयीची सर्वंकष नियमावली निवडणूक आयोग येत्या तीन दिवसांत तयार करणार आहे. मार्चमध्ये महामारीचा प्रकोप सुरू झाल्यापासून आयोगाने राज्यसभा व राज्य विधानसभांच्या अनेक पोटनिवडणुकांचे कार्यक्रम पुढे ढकलले होते. बिहार विधानसभेची मुदत नोव्हेंबरमध्ये संपत असून ती निवडणूक त्याआधी घ्यावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर आयोग काय ठरवितो, याकडे राजकीय पक्षांचे आतुरतेने लक्ष आहे.मध्यंतरी आयोगाने याविषयी सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांची मतेही मागविली होती. त्यानंतर आयोगाने सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांशी सल्लामसलत केली. आयोगाने मंगळवारी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार मुख्य निवडणूक आयुक्त व दोन निवडणूक आयुक्तांच्या बैठकीत या विचारमंथनातून समोर आलेल्या साकल्याने विचार करण्यात आला आणि आवश्यक नियमावली तीन दिवसांत तयार करण्याचे निर्देश प्रशासकीय अधिकाºयांना देण्यात आले. आयोगाने पुढे असेही म्हटले की, आयोगाची ही नियमावली ढोबळ स्वरूपाची असेल. ज्या राज्यात प्रत्यक्ष निवडणूक होणार असेल तेथील मुख्य निवडणूक अधिकाºयांनी ही नियमावली डोळ्यापुढे ठेवून आणि स्थानिक परिस्थितीचा विचार करून निवडणूक घेण्याची सविस्तर योजना तयार करावी, अशी अपेक्षा आहे.सल्लामसलतींमध्ये व आयोगास पाठविलेल्या पत्रांमध्ये भाजपा वगळता बहुतांश अन्य राजकीय पक्षांनी प्रत्यक्ष प्रचाराऐवजी फक्त डिजिटल प्रचार करू देण्याच्या कल्पनेस विरोध केला आहे.>नवीन रुग्णांच्या संख्येत होतेय घटभारतात दररोज कोविड-१९ रुग्ण वाढण्याच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली असून रुग्ण बरे होण्याचा दरही ७३.१७ टक्क्यांवर पोहोचला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत १९,७७,७७९ रुग्ण बरे झाले असून सोमवार आणि मंगळवारदरम्यान तब्बल ५७, ९३७ रुग्ण बरे झाले. केंद्रीय रणनीतीतहत निदान चाचणी, वेळीच अलगीकरण आणि प्रभावी वैद्यकीय उपचारामुळे मृत्यूदर कमालीचा कमी झाला आहे. याकामी राष्टÑीय सरासरीपेक्षा ३० राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची कामगिरी सरस आहे.सरकारने पाच औषधी कंपन्यांना लसीच्या चिकित्सालयीन चाचण्या आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादन आणि लशीला मान्यता दिल्यास अपेक्षित किंमत याबाबत सर्वंकष अहवाल गुरुवारपर्यंत सादर करण्यास सांगितले आहे.भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) सांगितले की, सोमवारपर्यंत ३,०९,४१,२६४ कोरोना निदान चाचण्या करण्यात आल्या. यापैकी सोमवारी ८,९९,८६४ चाचण्या करण्यात आल्या.विशेष म्हणजे गेल्या चोवीस ८.९७ लाख विक्रमी चाचण्या करण्यात आल्या. एवढ्या मोठ्या प्रमाणात निदान चाचण्या करुनही संसर्गित रुग्ण आढळण्याचे प्रमाण साप्ताहिक राष्टÑीय सरासरीच्या ८.८१ टक्के आहे, असे आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी केलेल्या टष्ट्वीटमध्ये म्हटले आहे.>५५,०७९ गेल्या चोवीस तासांत रुग्ण वाढले, तर ८७५ रुग्णांचा मृत्यू झाला. तथापि, हे प्रमाण आठवडाभराच्या तुलनेत कमी आहे. भारतातील कोविड-१९ रुग्णांची संख्या २७ लाखांवर पोहोचली आहे. वास्तविक रुग्ण आणि बरे होणाºया रुग्णांची संख्या अनुक्रमे ६७३,१६६ आणि १,३०४,६१३ आहे. कोरोनामुळे ५१,७९७ जणांचा मृत्यू झाला आहे.