शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

आरएसएस भारतातील दहशतवादी संघटना; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पणतूचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 3:35 PM

प्रजासत्ताक दिनाच्या सायंकाळी ते कर्नाटकमधील एका सभेमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी त्यांच्या पाकिस्तानमधील भाषणाचा हवाला दिला.

ठळक मुद्देआरएसएस भारतातील अतिरेकी संघटना आहे. या संघटनेवर बंदी आणा.या संघटनेचे लोक आज दहशतवादी कृत्यामध्ये पकडले जात आहेत.

बेंगळुरू : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतातील दहशतवादी संघटना आहे आणि याचे पुरावेही आपल्याकडे असल्याचा गंभीर आरोप भारतीय संविधानाचे निर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांनी केला आहे. 

प्रजासत्ताक दिनाच्या सायंकाळी ते कर्नाटकमधील एका सभेमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी त्यांच्या पाकिस्तानमधील भाषणाचा हवाला दिला. तेथे मी म्हटले होते की आरएसएस भारतातील अतिरेकी संघटना आहे. या संघटनेवर बंदी आणा. माझ्याकडे पुरावे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाजुला साध्वी बसलेली आहे. ती मुलाखतीत सांगते की, जेव्हा भारतीय सैन्याकडील दारुगोळा, बंदुका संपल्या, तेव्हा आरएसएसने त्यांना ती पुरविली. आरएसएसकडे एवढे बॉम्ब कसे आणि कुठून आले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर बंदुका कुठून आल्या, असा प्रश्न त्यांनी विचारला. 

पंतप्रधानांच्या बाजुला बसलेली साध्वी अशा प्रकारचे वक्तव्य करते. ज्या घरात बॉम्ब सापडला ते घर किंवा घरातील मुलगा दहशतवादी ठरत नाही का. मग जर या संघटनेकडे जर एवढ्या मोठ्या प्रमाणावर दारुगोळा असेल तर ही संघटना दहशतवादी नाही का होत, असा आरोप राजरत्न यांनी केला. या संघटनेचे लोक आज दहशतवादी कृत्यामध्ये पकडले जात आहेत. अशा संघटनेवर जागतिक बंदी आणण्याची गरज आहे. ते काम आम्ही करत आहोत, असेही राजरत्न आंबेडकर यांनी सांगितले.  

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघTerrorismदहशतवाद