शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

संघ ही लोकशाही मानणारी संघटना- मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2018 20:54 IST

कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल मानले प्रणव मुखर्जींचे आभार

नागपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही लोकशाही मानणारी संघटना असल्याचं प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष प्रशिक्षण वर्गाच्या समारोपाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी सरसंघचालकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल मुखर्जींचे आभार मानले. 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही लोकशाही मानणारी संघटना असून संघ लोकांना जोडण्याचं काम करतो. आम्ही देशात कोणलाही शत्रू मानत नाही. भारतामाता ही सर्वांची आहे,' असं सरसंघचालक म्हणाले. 'भारतात राहणारी प्रत्येक व्यक्ती आपली आहे, यात कोणतंही दुमत नाही. विविधतेचा सन्मान करुन एकता जपणं आवश्यक आहे. आपण सर्वांनी एकत्र येऊन देशाची सेवा करायला हवी,' असं सरसंघचालकांनी म्हटलं. 'आम्ही देशातील प्रत्येक व्यक्तीबद्दल सद्भावना बाळगतो आणि मार्गक्रमण करतो. स्थापनेनंतर संघासमोर अनेक अडचणी आल्या. मात्र तरीही संघानं आपली वाटचाल कायम राखली. आता संघ लोकप्रिय आहे. आम्ही जिथे जातो, तिथे आम्हाला सन्मान मिळतो आहे,' असंही ते म्हणाले. यावेळी सरसंघचालकांनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या उपस्थितीवरुन होणाऱ्या उलटसुलट चर्चेवरही भाष्य केलं. 'अनेक विचारांचे महापुरुष आमच्या कार्यक्रमात येतात. मात्र यावेळी कार्यक्रमाची जरा जास्तच चर्चा झाली,' असं भागवत म्हणाले. 'प्रणव मुखर्जी यांना कसं आणि का बोलावलं, याबद्दलची चर्चा निरर्थक आहे. प्रणव मुखर्जी यांनी कार्यक्रमासाठी वेळ दिला, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे,' असं सरसंघचालकांनी म्हटलं.  

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघnagpurनागपूरPranab Mukherjeeप्रणव मुखर्जीcongressकाँग्रेसBJPभाजपा