शहरं
Join us  
Trending Stories
1
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
2
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
3
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
4
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
5
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
6
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
7
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
8
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
9
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
10
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
11
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
12
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
13
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
14
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
15
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
16
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
17
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
18
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
19
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
20
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

संघ ही लोकशाही मानणारी संघटना- मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2018 20:54 IST

कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल मानले प्रणव मुखर्जींचे आभार

नागपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही लोकशाही मानणारी संघटना असल्याचं प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष प्रशिक्षण वर्गाच्या समारोपाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी सरसंघचालकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल मुखर्जींचे आभार मानले. 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही लोकशाही मानणारी संघटना असून संघ लोकांना जोडण्याचं काम करतो. आम्ही देशात कोणलाही शत्रू मानत नाही. भारतामाता ही सर्वांची आहे,' असं सरसंघचालक म्हणाले. 'भारतात राहणारी प्रत्येक व्यक्ती आपली आहे, यात कोणतंही दुमत नाही. विविधतेचा सन्मान करुन एकता जपणं आवश्यक आहे. आपण सर्वांनी एकत्र येऊन देशाची सेवा करायला हवी,' असं सरसंघचालकांनी म्हटलं. 'आम्ही देशातील प्रत्येक व्यक्तीबद्दल सद्भावना बाळगतो आणि मार्गक्रमण करतो. स्थापनेनंतर संघासमोर अनेक अडचणी आल्या. मात्र तरीही संघानं आपली वाटचाल कायम राखली. आता संघ लोकप्रिय आहे. आम्ही जिथे जातो, तिथे आम्हाला सन्मान मिळतो आहे,' असंही ते म्हणाले. यावेळी सरसंघचालकांनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या उपस्थितीवरुन होणाऱ्या उलटसुलट चर्चेवरही भाष्य केलं. 'अनेक विचारांचे महापुरुष आमच्या कार्यक्रमात येतात. मात्र यावेळी कार्यक्रमाची जरा जास्तच चर्चा झाली,' असं भागवत म्हणाले. 'प्रणव मुखर्जी यांना कसं आणि का बोलावलं, याबद्दलची चर्चा निरर्थक आहे. प्रणव मुखर्जी यांनी कार्यक्रमासाठी वेळ दिला, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे,' असं सरसंघचालकांनी म्हटलं.  

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघnagpurनागपूरPranab Mukherjeeप्रणव मुखर्जीcongressकाँग्रेसBJPभाजपा