शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

सरकारचं पाऊल डगमगल्यास संघ देणार सकारात्मक सल्ला- मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2019 7:38 AM

लोकसभा निवडणुकीत भाजपानं देदीप्यमान यश मिळवलं.

नवी दिल्लीः लोकसभा निवडणुकीत भाजपानं देदीप्यमान यश मिळवलं. या यशाचं श्रेय कुठे तरी आरएसएसलाही दिलं जातंय. आता मोहन भागवत म्हणाले की, जर सरकारचं पाऊल डगमगत असल्याचं दिसल्यास संघाकडून त्यांना सकारात्मक दृष्टिकोन आणि योग्य सल्ला देण्यात येईल. कानपूरच्या पं. दीनदयाल उपाध्याय सनातन धर्म विद्यालयाच्या संघ शिक्षावर्गाला संबोधित करताना ते बोलत होते.जे लोकशाही व्यवस्थेतून निवडून येतात, त्यांच्याकडे भरपूर अधिकार असतात. त्याचा अर्थ असा नाही की, त्या अधिकारांचा गैरवापर केला जावा. जर कोणत्याही कारणास्तव सरकारचं पाऊल डगमगलं तर संघ त्यांना सकारात्मक सल्ला देईल. आपल्या माणसांबरोबर नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे. जर कोणत्याही कारणास्तव निराशा असल्यास तसं सरकारनं आम्हाला सांगावं, असंही मोहन भागवत म्हणाले आहेत.  आम्ही संघाचं केंद्र नागपूरहून हलवून दिल्ली करू शकतो. परंतु असं न करणं केव्हाही चांगलंच राहील. स्वयंसेवकांना उद्देशून मोहन भागवत म्हणाले, कितीही चांगलं काम केलं असलं किंवा इतरांची मदत केली असली तरी कधीही कोणत्याही गोष्टीचा अहंकाराला बाळगू नका. इतरांना उपकाराच्या भावनेनं मदत करण्याची प्रवृत्ती प्रत्येकामध्ये असली पाहिजे. संघाच्या कार्यांचा विस्तार झाला असून, स्वयंसेवकांचा मानही आता वाढला आहे, हे ऐकून फारच आनंद झाला. संघप्रमुख मोहन भागवत शनिवारीच कानपूरला आले आहेत. ते संघाकडून 24 मे ते 13 जूनपर्यंत चालणाऱ्या प्रशिक्षण शिबिराला उपस्थिती दर्शवण्यासाठी पोहोचले होते. 

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवत