शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
2
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
3
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
4
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
5
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
6
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
8
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
9
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
10
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
11
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
12
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
13
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
14
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
15
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
16
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
17
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
18
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
19
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
20
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!

RSS ने अमित शहांना दिली वॉर्निंग, '2019 मध्ये बुडू शकते भाजपाची बोट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2018 16:09 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने 2019 मधील लोकसभा निवडणुकीआधी भाजपासमोर धोक्याची घंटा वाजवली आहे. शेतकरी आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरुन भाजपाला निवडणुकीत फटका बसू शकतो अशी भीती आरएसएसने व्यक्त केली आहे.

नवी दिल्ली - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने 2019 मधील लोकसभा निवडणुकीआधी भाजपासमोर धोक्याची घंटा वाजवली आहे. शेतकरी आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरुन भाजपाला निवडणुकीत फटका बसू शकतो अशी भीती आरएसएसने व्यक्त केली आहे. टेलीग्राफच्या रिपोर्टनुसार, लोक शेतक-यांना सामोरं जावं लागणा-या समस्या आणि नोकरीच्या मुद्यावरुन वारंवार भाजपाला चेतावणी देत आहेत असं आरएसएसशी संबंधित एका नेत्याने सांगितलं आहे. पुढे ते बोलले आहेत की, 'जर सरकारने आमच्या बोलण्याकडे लक्ष दिलं असतं तर गुजरातमध्ये भाजपाची अशी परिस्थिती झाली नसती'. 

गुजरातमध्ये भाजपाने भलेही सरकार स्थापन केले असले तरी भाजपा पक्ष आणि आरएसएस या निकालामुळे समाधानी नाहीये. गेल्या शुक्रवारी आरएसएसने गुजरातमधून मिळालेला फिडबॅक भाजपासमोर मांडला. या बैठकीत भाजपाध्यक्ष अमित शहादेखील उपस्थित होते. आरएसएसचं म्हणणं आहे की, 'नोकरीत संधी उपलब्ध नसल्याने तरुणवर्ग सरकारवर नाराज असून, विश्वासघात झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे'.

आरएसएसच्या सुत्रांनुसार, जर भाजपाने या दोन मुद्द्यांवर काम केलं नाही तर 2019 मधील लोकसभा निवडणूक आणि 2018 मधील विधानसभा निवडणुकीत पक्षासमोर अडचणी उभ्या राहू शकतात. चुकीचं आर्थिक धोरण स्विकारल्यामुळे शेतकरी आणि तरुणांच्या अडचणी वाढत असल्याचं आरएसएसची आर्थिक शाखा स्वदेश जागरण मंचच्या एका नेत्याने सांगितलं आहे. 

स्वदेशी जागरण मंचने सरकारला काही सल्ले दिले आहेत. वेळेत पाऊलं उचलली नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते असं त्यांनी सांगितलं आहे. मात्र जीएसटीमधील केलेल्या बदलांवर त्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. हा सकारात्मक बदल असल्याचं ते बोलले आहेत. भाजपाने आरएसएसने सुचवलेल्या गोष्टींवर अंमलबजावणी करण्याचं आश्वासन दिलं आहे. तसंच शेतकरी आणि रोजगाराच्या मुद्यावर लोकांना नाराज करणार नाही असंही सांगितलं आहे. 

18 डिसेंबरला गुजरात निवडणुकीचा निकाल लागला.  मोदींनी गुजरात जिंकले पण, काठावरचे बहुमत मिळाल्यामुळे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हेच बाजीगर ठरले. गुजरातमध्ये भाजपाला १८२ पैकी जेमतेम ९९ जागा तर काँग्रेसने ८0 जागांवर यश मिळविले आहे. तिथे बहुमतासाठी ९२ जागांची गरज होती. शिवाय, काँग्रेस पक्षाच्या गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत अधिक 16 जागा मिळवल्या आहेत. भाजपाला सलग सहाव्यांदा निवडणूक जिंकण्यात यश आलेले आहे, मात्र 2012मध्ये भाजपानं 115 जागा जिंकल्या होत्या, तर यंदा संख्येत घट होऊन 99 जागांवर भाजपानं विजय मिळवला आहे. काँग्रेसनं ग्रामीण भागात चांगली कामगिरी बजावली आहे, मात्र शहरी भागांमध्ये काँग्रेसचं फारसा प्रभाव दिसून आला नाही. 

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाAmit Shahअमित शाह