शहरं
Join us  
Trending Stories
1
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
2
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
4
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
5
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
6
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
7
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
8
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
9
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
10
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
11
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
12
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
13
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
14
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
15
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
16
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
17
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
18
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
20
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष

RSS ने अमित शहांना दिली वॉर्निंग, '2019 मध्ये बुडू शकते भाजपाची बोट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2018 16:09 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने 2019 मधील लोकसभा निवडणुकीआधी भाजपासमोर धोक्याची घंटा वाजवली आहे. शेतकरी आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरुन भाजपाला निवडणुकीत फटका बसू शकतो अशी भीती आरएसएसने व्यक्त केली आहे.

नवी दिल्ली - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने 2019 मधील लोकसभा निवडणुकीआधी भाजपासमोर धोक्याची घंटा वाजवली आहे. शेतकरी आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरुन भाजपाला निवडणुकीत फटका बसू शकतो अशी भीती आरएसएसने व्यक्त केली आहे. टेलीग्राफच्या रिपोर्टनुसार, लोक शेतक-यांना सामोरं जावं लागणा-या समस्या आणि नोकरीच्या मुद्यावरुन वारंवार भाजपाला चेतावणी देत आहेत असं आरएसएसशी संबंधित एका नेत्याने सांगितलं आहे. पुढे ते बोलले आहेत की, 'जर सरकारने आमच्या बोलण्याकडे लक्ष दिलं असतं तर गुजरातमध्ये भाजपाची अशी परिस्थिती झाली नसती'. 

गुजरातमध्ये भाजपाने भलेही सरकार स्थापन केले असले तरी भाजपा पक्ष आणि आरएसएस या निकालामुळे समाधानी नाहीये. गेल्या शुक्रवारी आरएसएसने गुजरातमधून मिळालेला फिडबॅक भाजपासमोर मांडला. या बैठकीत भाजपाध्यक्ष अमित शहादेखील उपस्थित होते. आरएसएसचं म्हणणं आहे की, 'नोकरीत संधी उपलब्ध नसल्याने तरुणवर्ग सरकारवर नाराज असून, विश्वासघात झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे'.

आरएसएसच्या सुत्रांनुसार, जर भाजपाने या दोन मुद्द्यांवर काम केलं नाही तर 2019 मधील लोकसभा निवडणूक आणि 2018 मधील विधानसभा निवडणुकीत पक्षासमोर अडचणी उभ्या राहू शकतात. चुकीचं आर्थिक धोरण स्विकारल्यामुळे शेतकरी आणि तरुणांच्या अडचणी वाढत असल्याचं आरएसएसची आर्थिक शाखा स्वदेश जागरण मंचच्या एका नेत्याने सांगितलं आहे. 

स्वदेशी जागरण मंचने सरकारला काही सल्ले दिले आहेत. वेळेत पाऊलं उचलली नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते असं त्यांनी सांगितलं आहे. मात्र जीएसटीमधील केलेल्या बदलांवर त्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. हा सकारात्मक बदल असल्याचं ते बोलले आहेत. भाजपाने आरएसएसने सुचवलेल्या गोष्टींवर अंमलबजावणी करण्याचं आश्वासन दिलं आहे. तसंच शेतकरी आणि रोजगाराच्या मुद्यावर लोकांना नाराज करणार नाही असंही सांगितलं आहे. 

18 डिसेंबरला गुजरात निवडणुकीचा निकाल लागला.  मोदींनी गुजरात जिंकले पण, काठावरचे बहुमत मिळाल्यामुळे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हेच बाजीगर ठरले. गुजरातमध्ये भाजपाला १८२ पैकी जेमतेम ९९ जागा तर काँग्रेसने ८0 जागांवर यश मिळविले आहे. तिथे बहुमतासाठी ९२ जागांची गरज होती. शिवाय, काँग्रेस पक्षाच्या गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत अधिक 16 जागा मिळवल्या आहेत. भाजपाला सलग सहाव्यांदा निवडणूक जिंकण्यात यश आलेले आहे, मात्र 2012मध्ये भाजपानं 115 जागा जिंकल्या होत्या, तर यंदा संख्येत घट होऊन 99 जागांवर भाजपानं विजय मिळवला आहे. काँग्रेसनं ग्रामीण भागात चांगली कामगिरी बजावली आहे, मात्र शहरी भागांमध्ये काँग्रेसचं फारसा प्रभाव दिसून आला नाही. 

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाAmit Shahअमित शाह