शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

RSS ने अमित शहांना दिली वॉर्निंग, '2019 मध्ये बुडू शकते भाजपाची बोट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2018 16:09 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने 2019 मधील लोकसभा निवडणुकीआधी भाजपासमोर धोक्याची घंटा वाजवली आहे. शेतकरी आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरुन भाजपाला निवडणुकीत फटका बसू शकतो अशी भीती आरएसएसने व्यक्त केली आहे.

नवी दिल्ली - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने 2019 मधील लोकसभा निवडणुकीआधी भाजपासमोर धोक्याची घंटा वाजवली आहे. शेतकरी आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरुन भाजपाला निवडणुकीत फटका बसू शकतो अशी भीती आरएसएसने व्यक्त केली आहे. टेलीग्राफच्या रिपोर्टनुसार, लोक शेतक-यांना सामोरं जावं लागणा-या समस्या आणि नोकरीच्या मुद्यावरुन वारंवार भाजपाला चेतावणी देत आहेत असं आरएसएसशी संबंधित एका नेत्याने सांगितलं आहे. पुढे ते बोलले आहेत की, 'जर सरकारने आमच्या बोलण्याकडे लक्ष दिलं असतं तर गुजरातमध्ये भाजपाची अशी परिस्थिती झाली नसती'. 

गुजरातमध्ये भाजपाने भलेही सरकार स्थापन केले असले तरी भाजपा पक्ष आणि आरएसएस या निकालामुळे समाधानी नाहीये. गेल्या शुक्रवारी आरएसएसने गुजरातमधून मिळालेला फिडबॅक भाजपासमोर मांडला. या बैठकीत भाजपाध्यक्ष अमित शहादेखील उपस्थित होते. आरएसएसचं म्हणणं आहे की, 'नोकरीत संधी उपलब्ध नसल्याने तरुणवर्ग सरकारवर नाराज असून, विश्वासघात झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे'.

आरएसएसच्या सुत्रांनुसार, जर भाजपाने या दोन मुद्द्यांवर काम केलं नाही तर 2019 मधील लोकसभा निवडणूक आणि 2018 मधील विधानसभा निवडणुकीत पक्षासमोर अडचणी उभ्या राहू शकतात. चुकीचं आर्थिक धोरण स्विकारल्यामुळे शेतकरी आणि तरुणांच्या अडचणी वाढत असल्याचं आरएसएसची आर्थिक शाखा स्वदेश जागरण मंचच्या एका नेत्याने सांगितलं आहे. 

स्वदेशी जागरण मंचने सरकारला काही सल्ले दिले आहेत. वेळेत पाऊलं उचलली नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते असं त्यांनी सांगितलं आहे. मात्र जीएसटीमधील केलेल्या बदलांवर त्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. हा सकारात्मक बदल असल्याचं ते बोलले आहेत. भाजपाने आरएसएसने सुचवलेल्या गोष्टींवर अंमलबजावणी करण्याचं आश्वासन दिलं आहे. तसंच शेतकरी आणि रोजगाराच्या मुद्यावर लोकांना नाराज करणार नाही असंही सांगितलं आहे. 

18 डिसेंबरला गुजरात निवडणुकीचा निकाल लागला.  मोदींनी गुजरात जिंकले पण, काठावरचे बहुमत मिळाल्यामुळे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हेच बाजीगर ठरले. गुजरातमध्ये भाजपाला १८२ पैकी जेमतेम ९९ जागा तर काँग्रेसने ८0 जागांवर यश मिळविले आहे. तिथे बहुमतासाठी ९२ जागांची गरज होती. शिवाय, काँग्रेस पक्षाच्या गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत अधिक 16 जागा मिळवल्या आहेत. भाजपाला सलग सहाव्यांदा निवडणूक जिंकण्यात यश आलेले आहे, मात्र 2012मध्ये भाजपानं 115 जागा जिंकल्या होत्या, तर यंदा संख्येत घट होऊन 99 जागांवर भाजपानं विजय मिळवला आहे. काँग्रेसनं ग्रामीण भागात चांगली कामगिरी बजावली आहे, मात्र शहरी भागांमध्ये काँग्रेसचं फारसा प्रभाव दिसून आला नाही. 

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाAmit Shahअमित शाह