शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

नोटाबंदी - तामिळनाडूत एका बेनामी खात्यात सापडलं 246 कोटी रुपयांचं घबाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2017 12:28 IST

नोटाबंदी केल्यानंतरच्या काही दिवसांमध्ये तामिळनाडू विभागातील एका बँक खात्यात एकाच वेळी 246 कोटी रुपये जमा केल्याचा प्रकार प्राप्तीकर खात्याच्या लक्षात आला आहे. हे काळे धन एका राजकीय नेत्याशी संबंधित असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने देण्यात येत आहे

ठळक मुद्देतामिळनाडूमध्ये एका खात्यामध्ये 246 कोटी रुपये भरण्यात आल्याचे आढळलेते ही बँकेची कामाची वेळ संपल्यानंतर असे एका अधिकाऱ्याने सांगितलेनोटाबंदीनंतर जमा करण्यात आलेली ही सगळ्यात मोठी रक्कम

चेन्नई, दि. 9 - नोटाबंदी केल्यानंतरच्या काही दिवसांमध्ये तामिळनाडू विभागातील एका बँक खात्यात एकाच वेळी 246 कोटी रुपये जमा केल्याचा प्रकार प्राप्तीकर खात्याच्या लक्षात आला आहे. हे काळे धन एका राजकीय नेत्याशी संबंधित असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने देण्यात येत आहे.काळा पैसा बाहेर काढण्यासाठी 500 व 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या व बँकेत त्या जमा करण्यासाठी 8 नोव्हेंबर ते 30 डिसेंबरची मुदत देण्यात आली. या काळात लाखो खात्यांमध्ये काही हजार कोटी रुपये काळ्याचे पांढरे करण्यासाठी जमा करण्यात आल्याचे सांगण्यात येत असून एकाच खात्यात 246 कोटी रुपये जमा करणे हा त्यातलाच प्रकार असण्याची शक्यता आहे.

तामिळनाडूमध्ये असंही लक्षात आलं आहे की 441 खात्यांमध्ये 240 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. परंतु या खातेदारांची बँकांकडे नीट माहिती नसल्याचे समोर आले आहे. मोठ्या व संशयित रकमांच्या व्यवहारांची उकल करण्यासाठी प्राप्तीकर खात्याने जवळपास 27,739 खातेदारांना नोटिसा पाठवल्या आहेत.

विशेष म्हणजे एका खात्यामध्ये 246 कोटी रुपये भरण्यात आल्याचे आढळले व ते ही बँकेची कामाची वेळ संपल्यानंतर असे प्राप्तीकर खात्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. नोटाबंदीच्या काळात जमा करण्यात आलेल्या रकमांमधील ही सगळ्यात मोठी रक्कम असल्याचे तो म्हणाला. आम्ही या खातेदाराला नोटीस पाठवली आणि सदर खातेदार प्रधान मंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत कर व दंड भरण्यास तयार झाल्याचे प्राप्तीकर खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

संशयित आर्थिक व्यवहारांसदर्भात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने प्राप्तीकर खात्याला काही माहिती दिली असून त्याआधारे खात्यांच्या छाननीचं काम करण्यात येत आहे. त्याअंतर्गत 27,739 जणांना नोटिसा पाठवल्या असून 18,220 जणांकडून प्रतिसाद आला आहे. उरलेल्या सुमारे 9500 खातेदारांनी अनेक वेळा नोटिसा देऊनही प्रतिसाद दिला नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

ज्या बँकांनी केवायसी किंवा नो युवर कस्टमर यांचे पालन केलेले नाही त्यांना ग्राहकाची ओळख पटवण्यात समस्या येत असून बँकांनी अशा प्रकरणांमध्ये आपल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करायला हवी असेही सांगण्यात येत आहे. बँकांच्या अधिकाऱ्यांनी काही ग्राहकांना काला पैसा बेनामी खात्यात ठेवण्यास मदत केली असावी असा संशय आहे. सुमारे 3,600 कोटी रुपयांची रक्कम होईल इतकी संशयित खाती छाननीत आढळल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. नोटाबंदीनंतर ज्यांनी एक कोटीपेक्षा जास्त रक्कम बँक खात्यात भरली आहे, अशांची आता छाननी करण्यात येत आहे.

टॅग्स :Note BanनोटाबंदीTamilnaduतामिळनाडूCrimeगुन्हा