‘महागाई, बेरोजगारी आणि कृषी संकटाचे एकच मूळ’; काँग्रेस नेते राहुल गांधी यांची केंद्रावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2021 02:20 PM2021-12-08T14:20:06+5:302021-12-08T14:22:20+5:30

राहुल गांधी म्हणाले, अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासोबतच काँग्रेस शासित राज्यांमध्ये आम्ही जनतेचे प्रश्न सोडवत आहोत.

‘root of inflation, unemployment and the agricultural crisis is BJP’; Congress leader Rahul Gandhi criticizes BJP | ‘महागाई, बेरोजगारी आणि कृषी संकटाचे एकच मूळ’; काँग्रेस नेते राहुल गांधी यांची केंद्रावर टीका

‘महागाई, बेरोजगारी आणि कृषी संकटाचे एकच मूळ’; काँग्रेस नेते राहुल गांधी यांची केंद्रावर टीका

Next

नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा महागाईच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारवर टीका केली आहे. महागाई, बेरोजगारी, कृषी संकट, चीनचा ताबा- या सर्वांचे मूळ एकच आहे. अहंकार, मित्रप्रेम आणि मोदी सरकारचे अपयश, अशा आशयाचे ट्विट राहुल गांधींनी करुन केंद्रावर टीका केली आहे.

दुसरीकडे राहुल गांधी यांनी मंगळवारी संसदेत शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित केला. आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी आणि कुटुंबीयांना नोकऱ्या मिळाव्यात, अशी मागणी त्यांनी लोकसभेत सरकारकडे केली आहे. यासोबतच त्यांनी लोकसभेत कृषी कायद्याविरोधी आंदोलनात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांची यादी सादर केली. 

'लोकसभेतून विरोधकांचा वॉकआउट'

आंदोलनादरम्यान पंजाबमधील 400 आणि हरियाणातील 70 शेतकऱ्यांची यादी सुपूर्द करताना ते म्हणाले की, पीडित शेतकरी कुटुंबांना भरपाई आणि रोजगार मिळावा, अशी माझी इच्छा आहे. तुमच्याकडे शेतकऱ्यांच्या मृत्यूची कोणतीही आकडेवारी नाही, आम्ही तुम्हाला नाव आणि पत्ता देत आहोत. त्यांची जबाबदारी सरकारने स्वीकारली पाहिजे, अशी मागणी राहुल यांनी केली. पण, सत्ताधारी पक्षाकडून प्रतिसाद न मिळाल्याने काँग्रसने सभात्याग केला. 

पंजाब सरकारकडे आकडेवारी

काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल म्हणाले, शेतकरी आंदोलनात किती शेतकरी मरण पावले याची आकडेवारी सरकारकडे का नाही? पंजाब सरकारने 403 शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भरपाई दिली आहे. 100 हून अधिक शेतकऱ्यांच्या कुटुंबांना नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. पंजाब सरकारकडे यादी आहे, तर भारत सरकारकडे का नाही? भारत सरकारने शेतकरी आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या आकडेवारीची पडताळणी करून त्या सर्वांच्या कुटुंबीयांना भरपाई द्यावी, अशी आमची मागणी आहे.
 

Web Title: ‘root of inflation, unemployment and the agricultural crisis is BJP’; Congress leader Rahul Gandhi criticizes BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.