शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
3
"अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
4
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
5
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
6
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
7
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
8
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
9
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
10
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
11
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
12
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
13
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
14
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
15
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
16
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
17
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
18
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
19
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

बदलत्या काळात राज्यपालांची भूमिका अधिक महत्त्वाची - राष्ट्रपती रामनाथ कोविंद

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2019 3:15 AM

देशात सहकारी आणि स्पर्धात्मक संघराज्यावर अधिक भर दिला जात असल्यामुळे राज्यपाल आणि नायब राज्यपाल यांची भूमिका महत्त्वाची बनली आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शनिवारी केले.

नवी दिल्ली : देशात सहकारी आणि स्पर्धात्मक संघराज्यावर अधिक भर दिला जात असल्यामुळे राज्यपाल आणि नायब राज्यपाल यांची भूमिका महत्त्वाची बनली आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शनिवारी केले.येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यपाल आणि नायब राज्यपालांच्या दोनदिवसीय परिषदेचे उद्घाटन राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. कोविंद यांनी सांगितले की, देशातील सर्वच राज्यपालांना सार्वजनिक जीवनाचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्याचा जास्तीत जास्त लाभ देशातील जनतेला व्हायला हवा. राष्ट्रपती भवनाच्या वतीने अधिकृतरीत्या जारी करण्यात आलेल्या निवेदनात राष्ट्रपती कोविंद यांच्या भाषणाची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार कोविंद यांनी म्हटले की, आपण हल्ली सहकारी संघराज्य आणि निरोगी स्पर्धात्मक संघराज्य यावर भर देत आहोत. या पार्श्वभूमीवर राज्यपालांची  भूमिका अधिक महत्त्वाची ठरते. सहकारी संघराज्य म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारांनी परस्परविरोधी धोरणांऐवजी स्थानिक स्वराज्य संस्थांना सोबत घेऊन एकसमान धोरणांवर काम करणे होय. स्पर्धात्मक संघराज्य म्हणजे राज्यांनी परस्परांशी, केंद्राशी स्पर्धा करणे होय.बांधिलकी...कोविंद यांनी सांगितले की, घटनेचे संरक्षण करणे एवढेच मर्यादित काम राज्यपालांचे नाही. आपल्या राज्यातील लोकांच्या सेवेत सातत्याने कार्यरत राहण्याशी त्यांची बांधिलकी आहे. अंतिमत: आपण सगळेच लोकांसाठी काम करतो. आपण लोकांना उत्तरदायीही आहोत.

टॅग्स :Ramnath Kovindरामनाथ कोविंदPresidentराष्ट्राध्यक्षIndiaभारत