शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

...हे माझं अपयश आहे; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी प्रांजळपणे दिली कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 15:13 IST

देशात 30 टक्के बोगस परवाने आहेत. परवाने देण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणावी लागणार आहे

ठळक मुद्दे12 तासांच्या आत दिल्ली मुंबईचा पल्ला गाठणं शक्य होणार आहेदरवर्षी 5 लाखांहून अधिक रस्ते अपघात देशात होतात मृतांमध्ये सर्वाधिक युवकांचा समावेश असतो

नवी दिल्ली - देशात होणारे रस्ते अपघात अन् त्यातील जीवितहानी रोखू शकलो नाही हे माझ्या मंत्रालयाचं आणि माझं अपयश आहे असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कबुली दिली आहे. आजतक या वृत्तवाहिनीशी बोलताना गडकरींनी एका सत्रात हे विधान केलं आहे. त्याचसोबत देशातील नवीन रस्ते योजनांबाबतही गडकरींनी दिलखुलास उत्तरं दिली.

यावेळी बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, 12 तासांच्या आत दिल्ली मुंबईचा पल्ला गाठणं शक्य होणार आहे. या महामार्गाचं काम सुरु आहे. गेल्या 5 वर्षात आमच्या मंत्रालयाने अनेक क्षेत्रात यश मिळविले. पण मागील 5 वर्षात रस्ते दुर्घटना कमी करण्यास अपयश आले. प्रत्येक वर्षी 5 लाख रस्ते अपघात होतात. यामध्ये अडीच लाखांपेक्षा जास्त मृत्यू होतात. मृतांपैकी 18-35 या वयोगटातील जवळपास 65 टक्के लोक आहेत. नवीन मोटार वाहन कायदा एक वर्षापासून राज्यसभेत अडकला होता. तो अलीकडेच पारित झाला आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच देशात 30 टक्के बोगस परवाने आहेत. परवाने देण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणावी लागणार आहे. एक व्यक्ती तीन वेगवेगळ्या शहरांमधील परवाने ठेवतो. त्याचसोबत बस ड्रायव्हरला चांगले प्रशिक्षण देणं गरजेचे आहे. 50 लोकांना बसमध्ये बसवून तो गाडी चालवत असतो. त्यामुळे आम्ही प्रशिक्षण शाळा उघडण्याची तयारी करतोय. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना शिक्षा म्हणून दंडाची रक्कम वाढविली आहे या भीतीमुळे वाहन चालक रस्त्यावर गाडी चालविताना वाहतूक नियमांचे पालन करेल असंही नितीन गडकरींनी सांगितले. 

दरम्यान, पाच कोटी रोजगारनिर्मिती करण्याच्या प्रश्नावर नितीन गडकरी म्हणाले की, आम्ही 40 किलोमीटर प्रतिदिन असं रस्ते बनविण्याचे ध्येय ठेवले आहे. आता 32 किमी असं सुरु आहे. यावर्षी 40 किमी होईल. तसेच 5 कोटी रोजगार निर्मिती करण्याचं ध्येय आमचं आहे. नवीन नवीन योजनांच्या माध्यमातून रोजगारासाठी नवी संधी उपलब्ध होणार आहे. आव्हानात्मक स्थिती असूनही आम्ही मार्ग काढण्याचं काम करतोय. यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल असा दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे.  

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीroad safetyरस्ते सुरक्षाAccidentअपघातMumbaiमुंबईhighwayमहामार्ग