शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

...हे माझं अपयश आहे; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी प्रांजळपणे दिली कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 15:13 IST

देशात 30 टक्के बोगस परवाने आहेत. परवाने देण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणावी लागणार आहे

ठळक मुद्दे12 तासांच्या आत दिल्ली मुंबईचा पल्ला गाठणं शक्य होणार आहेदरवर्षी 5 लाखांहून अधिक रस्ते अपघात देशात होतात मृतांमध्ये सर्वाधिक युवकांचा समावेश असतो

नवी दिल्ली - देशात होणारे रस्ते अपघात अन् त्यातील जीवितहानी रोखू शकलो नाही हे माझ्या मंत्रालयाचं आणि माझं अपयश आहे असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कबुली दिली आहे. आजतक या वृत्तवाहिनीशी बोलताना गडकरींनी एका सत्रात हे विधान केलं आहे. त्याचसोबत देशातील नवीन रस्ते योजनांबाबतही गडकरींनी दिलखुलास उत्तरं दिली.

यावेळी बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, 12 तासांच्या आत दिल्ली मुंबईचा पल्ला गाठणं शक्य होणार आहे. या महामार्गाचं काम सुरु आहे. गेल्या 5 वर्षात आमच्या मंत्रालयाने अनेक क्षेत्रात यश मिळविले. पण मागील 5 वर्षात रस्ते दुर्घटना कमी करण्यास अपयश आले. प्रत्येक वर्षी 5 लाख रस्ते अपघात होतात. यामध्ये अडीच लाखांपेक्षा जास्त मृत्यू होतात. मृतांपैकी 18-35 या वयोगटातील जवळपास 65 टक्के लोक आहेत. नवीन मोटार वाहन कायदा एक वर्षापासून राज्यसभेत अडकला होता. तो अलीकडेच पारित झाला आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच देशात 30 टक्के बोगस परवाने आहेत. परवाने देण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणावी लागणार आहे. एक व्यक्ती तीन वेगवेगळ्या शहरांमधील परवाने ठेवतो. त्याचसोबत बस ड्रायव्हरला चांगले प्रशिक्षण देणं गरजेचे आहे. 50 लोकांना बसमध्ये बसवून तो गाडी चालवत असतो. त्यामुळे आम्ही प्रशिक्षण शाळा उघडण्याची तयारी करतोय. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना शिक्षा म्हणून दंडाची रक्कम वाढविली आहे या भीतीमुळे वाहन चालक रस्त्यावर गाडी चालविताना वाहतूक नियमांचे पालन करेल असंही नितीन गडकरींनी सांगितले. 

दरम्यान, पाच कोटी रोजगारनिर्मिती करण्याच्या प्रश्नावर नितीन गडकरी म्हणाले की, आम्ही 40 किलोमीटर प्रतिदिन असं रस्ते बनविण्याचे ध्येय ठेवले आहे. आता 32 किमी असं सुरु आहे. यावर्षी 40 किमी होईल. तसेच 5 कोटी रोजगार निर्मिती करण्याचं ध्येय आमचं आहे. नवीन नवीन योजनांच्या माध्यमातून रोजगारासाठी नवी संधी उपलब्ध होणार आहे. आव्हानात्मक स्थिती असूनही आम्ही मार्ग काढण्याचं काम करतोय. यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल असा दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे.  

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीroad safetyरस्ते सुरक्षाAccidentअपघातMumbaiमुंबईhighwayमहामार्ग