शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मणिपूर हिंसाचार; जमावाचा केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या घरावर हल्ला, घर जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2023 19:06 IST

RK Ranjan Singh House Set On Fire: मणिपूरमधील हिंसा अद्याप शमलेली नाही. सातत्याने हिंसाचाराच्या घटना घडत आहेत.

RK Ranjan Singh House Vandalised: केंद्रीय परराष्ट्र व्यवहार आणि शिक्षण राज्यमंत्री डॉ. राजकुमार रंजन सिंह यांच्या मणिपूरमधील निवासस्थानावर गुरुवारी (15 जून) रात्री उशिरा जमावाने हल्ला केला. जमावाने इंफाळच्या कोंगबा येथील राज्यमंत्र्यांच्या निवासस्थानाची तोडफोड आणि जाळपोळ केली. हल्ल्याच्या वेळी मंत्री निवासस्थानी उपस्थित नव्हते. या घटनेबाबत त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. सध्याचे राज्य सरकार शांतता प्रस्थापित करण्यात अपयशी ठरल्याचे राज्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना मंत्री आरके रंजन सिंह म्हणाले, "मी कोचीमध्ये आहे, माझ्या राज्यात (मणिपूर) नव्हतो. मी माझे घर खूप कष्टाने बांधले होते. माझ्या घरावर हल्ला झाला याचे मला दुःख आहे आणि माझ्या राज्यातील नागरिकांकडून अशा वृत्तीची अपेक्षा नव्हती. मला घरामध्ये आग लागल्याचे सांगण्यात आले, परंतु लोकांनी अग्नीशमन दालाला तेथे पोहोचू दिले नाही.'' 

''हा माझ्या आयुष्यावरचा हल्ला आहे, असे वाटते. यावरून मणिपूरमध्ये कायदा व सुव्यवस्था बिघडली असून सध्याचे सरकार शांतता निर्माण करण्यात अपयशी ठरल्याचे दिसून येते. मी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना याबाबत माहिती दिली आहे.” दरम्यान, मणिपूरमधील परिस्थिती पाहता इंटरनेट सेवा 20 जूनपर्यंत बंद करण्यात आली आहे.

मणिपूरमध्ये कर्फ्यू असूनही या आठवड्यात हल्ले आणि चकमकीच्या घटना समोर आल्या आहेत. याआधी गुरुवारी दुपारी मणिपूर रॅपिड अॅक्शन फोर्स आणि जमावामध्ये इम्फाळमध्ये चकमक झाली होती. जमावाने दोन घरे पेटवून दिली. सुमारे एक महिन्यापासून राज्यातील मेईतेई आणि कुकी समुदायांमध्ये होत असलेल्या हिंसाचारात 100 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारfireआगPoliceपोलिसministerमंत्री