शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

Tejashwi Yadav: “लाऊडस्पीकर नसताना देवाची भक्ती होत नव्हती का?”; तेजस्वी यादवांचा थेट सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2022 15:00 IST

Tejashwi Yadav: जनहिताचे खरे मुद्दे सोडून लोकांची दिशाभूल केली जात आहे, असा आरोप तेजस्वी यादव यांनी केला.

पाटणा: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महाराष्ट्रात मशिदींवरील भोंग्यांबाबत घेतलेल्या भूमिकेचे पडसाद देशभरात उमटताना पाहायला मिळत आहे. राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारला ३ मेपर्यंत अल्टिमेटम दिले आहे. मात्र, यानंतर उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने धडक करवाई करत तेथील बेकायदा लाऊडस्पीकर काढण्याची मोहीम हाती घेतली. या कारवाईचे राज ठाकरे यांनी कौतुकही केले. यानंतर आता राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांनी लाऊडस्पीकर अस्तित्वात नव्हते तेव्हा भगवान आणि खुदा नव्हते का, अशी विचारणा केली आहे. 

तेजस्वी यादव यांनी ट्विट करत यासंदर्भात भाष्य केले आहे. लाऊडस्पीकरचा मुद्दा उपस्थित करणाऱ्यांना विचारू इच्छितो की, लाऊडस्पीकरचा शोध १९२५ मध्ये लागला आणि भारतातील मंदिरे/मशिदींमध्ये त्याचा वापर ७० च्या सुमारास सुरू झाला. जेव्हा लाऊडस्पीकर नव्हते तेव्हा भगवान आणि खुदा नव्हते का? लाऊडस्पीकरशिवाय प्रार्थना, जागरण, भजन, भक्ती आणि साधना होत नव्हती का, अशी विचारणा तेजस्वी यादव यांनी केली आहे. 

अनावश्यक विषयांना धार्मिक रंग देतात

किंबहुना ज्यांना धर्म आणि कर्माचे मर्म कळत नाही, ते अनावश्यक विषयांना धार्मिक रंग देतात. स्वत:ची जाणीव असलेला माणूस या मुद्द्यांची तुलना कधीच करणार नाही. देव सदैव आपल्यासोबत असतो. तो प्रत्येक क्षण आणि प्रत्येक कणात व्यापलेला आहे. कोणताही धर्म आणि देव कोणत्याही लाऊडस्पीकरशी बांधील नाही, अशी टीका तेजस्वी यादव यांनी केली आहे. तसेच लाऊडस्पीकर आणि बुलडोझरवर चर्चा सुरू आहे, मात्र महागाई, बेरोजगारी, शेतकरी, कामगार यांच्याबाबत बोलले जात नाही. जनहिताचे खरे मुद्दे सोडून लोकांची दिशाभूल केली जात आहे, असा आरोप तेजस्वी यादव यांनी केला. याशिवाय, ज्याला शिक्षण, औषध, नोकरी, रोजगार मिळत नाही, तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे, यावर चर्चा का होत नाही? अशी सवालही तेजस्वी यादव यांनी केला आहे. 

दरम्यान, उत्तर प्रदेशमधील ११ हजार धार्मिक स्थळांवरील भोंगे काढण्यात आले आहेत. तर ३५ हजार धार्मिक स्थळांवरील भोंग्यांसाठी आवाजाची मर्यादा निश्चित करुन देण्यात आली आहे. मागील चार दिवसांमध्ये उत्तर प्रदेश पोलिसांनी ही कारवाई केली असल्याची माहिती राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली. राज्य सरकारने भोंग्यांच्या आवाजासंदर्भात तातडीने कारवाई करण्यासंदर्भातील निर्देश जिल्हास्तरीय प्रशासनाला दिल्यानंतर राज्यात भोंग्याविरोधातील मोहीम सुरु करण्यात आली आहे. 

टॅग्स :Tejashwi Yadavतेजस्वी यादवPoliticsराजकारण