शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

पूरग्रस्त केरळमध्ये नद्या, विहिरी कोरड्याठाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2018 04:26 IST

पूरग्रस्त केरळमध्ये ऊन तापत असून, नद्या आणि विहिरी अपवादात्मकरीत्या कोरड्या पडल्या असल्यामुळे राज्य सरकारने या घटनांचा शास्त्रीय अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आहे.

तिरुअनंतपुरम : पूरग्रस्त केरळमध्ये ऊन तापत असून, नद्या आणि विहिरी अपवादात्मकरीत्या कोरड्या पडल्या असल्यामुळे राज्य सरकारने या घटनांचा शास्त्रीय अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आहे.मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी राज्याच्या विज्ञान, तंत्रज्ञान आणि पर्यावरण परिषदेला हा अभ्यास करण्याचा आदेश दिला आहे. परिषदेने या प्रश्नावर उत्तरेही सुचवावीत, असेही विजयन यांनी सांगितले आहे. तापमान वाढत असून, नद्यांच्या पाण्याची पातळी खाली गेली असून, झपाट्याने विहिरी कोरड्या पडल्या आहेत व जमिनीतील पाण्याची पातळी खालावली आहे, तसेच गांडूळ मोठ्या प्रमाणात नष्ट झाले आहेत. या सगळ्या घटना केरळमध्ये गेल्या महिन्यात विध्वंसकारक ठरलेल्या पुराच्या परिस्थितीनंतर राज्याच्या वेगवेगळ्या भागांत काळजीच्या ठरल्या आहेत. पुराने वायनाड जिल्ह्याला मोठा फटका बसला. हा जिल्हा जैवविविधतेसाठी प्रसिद्ध आहे. या जिल्ह्यात गांडूळ फार मोठ्या संख्येत नष्ट झाले असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठी काळजी वाटत आहे. जमीन वेगाने कोरडी पडल्यामुळे व जमिनीच्या रचनेत बदल झाल्याचा परिणाम गांडूळ नष्ट होण्यात झाल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.>तज्ज्ञांनी केले दुष्काळाचे भाकीतपेरियार, भारतपुझ्झा, पॅम्पा आणि कबानीसह अनेक नद्या कोरड्या पडत आहेत. अनेक जिल्ह्यांत विहिरी कोरड्या पडून कोसळत आहेत. राज्यात पुराने अनेक भागांत त्यांच्या स्वाभाविक रचनेत बदल घडवला व इडुक्की आणि वायानंदच्या विशेषत: डोंगराळ भागात एकेक किलोमीटर लांबीच्या भेगा पडल्या आहेत. याच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर दरडीही कोसळल्या आहेत. पुरानंतर राज्याच्या दक्षिण भागातील अनेक जिल्ह्यांत तज्ज्ञांनी दुष्काळी परिस्थितीचे भाकीत केले आहे.

टॅग्स :KeralaकेरळKerala Floodsकेरळ पूर