शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्त केरळमध्ये नद्या, विहिरी कोरड्याठाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2018 04:26 IST

पूरग्रस्त केरळमध्ये ऊन तापत असून, नद्या आणि विहिरी अपवादात्मकरीत्या कोरड्या पडल्या असल्यामुळे राज्य सरकारने या घटनांचा शास्त्रीय अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आहे.

तिरुअनंतपुरम : पूरग्रस्त केरळमध्ये ऊन तापत असून, नद्या आणि विहिरी अपवादात्मकरीत्या कोरड्या पडल्या असल्यामुळे राज्य सरकारने या घटनांचा शास्त्रीय अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आहे.मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी राज्याच्या विज्ञान, तंत्रज्ञान आणि पर्यावरण परिषदेला हा अभ्यास करण्याचा आदेश दिला आहे. परिषदेने या प्रश्नावर उत्तरेही सुचवावीत, असेही विजयन यांनी सांगितले आहे. तापमान वाढत असून, नद्यांच्या पाण्याची पातळी खाली गेली असून, झपाट्याने विहिरी कोरड्या पडल्या आहेत व जमिनीतील पाण्याची पातळी खालावली आहे, तसेच गांडूळ मोठ्या प्रमाणात नष्ट झाले आहेत. या सगळ्या घटना केरळमध्ये गेल्या महिन्यात विध्वंसकारक ठरलेल्या पुराच्या परिस्थितीनंतर राज्याच्या वेगवेगळ्या भागांत काळजीच्या ठरल्या आहेत. पुराने वायनाड जिल्ह्याला मोठा फटका बसला. हा जिल्हा जैवविविधतेसाठी प्रसिद्ध आहे. या जिल्ह्यात गांडूळ फार मोठ्या संख्येत नष्ट झाले असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठी काळजी वाटत आहे. जमीन वेगाने कोरडी पडल्यामुळे व जमिनीच्या रचनेत बदल झाल्याचा परिणाम गांडूळ नष्ट होण्यात झाल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.>तज्ज्ञांनी केले दुष्काळाचे भाकीतपेरियार, भारतपुझ्झा, पॅम्पा आणि कबानीसह अनेक नद्या कोरड्या पडत आहेत. अनेक जिल्ह्यांत विहिरी कोरड्या पडून कोसळत आहेत. राज्यात पुराने अनेक भागांत त्यांच्या स्वाभाविक रचनेत बदल घडवला व इडुक्की आणि वायानंदच्या विशेषत: डोंगराळ भागात एकेक किलोमीटर लांबीच्या भेगा पडल्या आहेत. याच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर दरडीही कोसळल्या आहेत. पुरानंतर राज्याच्या दक्षिण भागातील अनेक जिल्ह्यांत तज्ज्ञांनी दुष्काळी परिस्थितीचे भाकीत केले आहे.

टॅग्स :KeralaकेरळKerala Floodsकेरळ पूर