शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
4
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
6
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
7
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
8
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
9
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
10
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
11
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
12
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
13
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
14
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
15
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
16
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
17
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
18
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
19
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
20
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

पूरग्रस्त केरळमध्ये नद्या, विहिरी कोरड्याठाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2018 04:26 IST

पूरग्रस्त केरळमध्ये ऊन तापत असून, नद्या आणि विहिरी अपवादात्मकरीत्या कोरड्या पडल्या असल्यामुळे राज्य सरकारने या घटनांचा शास्त्रीय अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आहे.

तिरुअनंतपुरम : पूरग्रस्त केरळमध्ये ऊन तापत असून, नद्या आणि विहिरी अपवादात्मकरीत्या कोरड्या पडल्या असल्यामुळे राज्य सरकारने या घटनांचा शास्त्रीय अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आहे.मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी राज्याच्या विज्ञान, तंत्रज्ञान आणि पर्यावरण परिषदेला हा अभ्यास करण्याचा आदेश दिला आहे. परिषदेने या प्रश्नावर उत्तरेही सुचवावीत, असेही विजयन यांनी सांगितले आहे. तापमान वाढत असून, नद्यांच्या पाण्याची पातळी खाली गेली असून, झपाट्याने विहिरी कोरड्या पडल्या आहेत व जमिनीतील पाण्याची पातळी खालावली आहे, तसेच गांडूळ मोठ्या प्रमाणात नष्ट झाले आहेत. या सगळ्या घटना केरळमध्ये गेल्या महिन्यात विध्वंसकारक ठरलेल्या पुराच्या परिस्थितीनंतर राज्याच्या वेगवेगळ्या भागांत काळजीच्या ठरल्या आहेत. पुराने वायनाड जिल्ह्याला मोठा फटका बसला. हा जिल्हा जैवविविधतेसाठी प्रसिद्ध आहे. या जिल्ह्यात गांडूळ फार मोठ्या संख्येत नष्ट झाले असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठी काळजी वाटत आहे. जमीन वेगाने कोरडी पडल्यामुळे व जमिनीच्या रचनेत बदल झाल्याचा परिणाम गांडूळ नष्ट होण्यात झाल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.>तज्ज्ञांनी केले दुष्काळाचे भाकीतपेरियार, भारतपुझ्झा, पॅम्पा आणि कबानीसह अनेक नद्या कोरड्या पडत आहेत. अनेक जिल्ह्यांत विहिरी कोरड्या पडून कोसळत आहेत. राज्यात पुराने अनेक भागांत त्यांच्या स्वाभाविक रचनेत बदल घडवला व इडुक्की आणि वायानंदच्या विशेषत: डोंगराळ भागात एकेक किलोमीटर लांबीच्या भेगा पडल्या आहेत. याच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर दरडीही कोसळल्या आहेत. पुरानंतर राज्याच्या दक्षिण भागातील अनेक जिल्ह्यांत तज्ज्ञांनी दुष्काळी परिस्थितीचे भाकीत केले आहे.

टॅग्स :KeralaकेरळKerala Floodsकेरळ पूर