शहरं
Join us  
Trending Stories
1
मातृभाषेसोबतच आणखी एक भारतीय भाषा शिकवा; यूजीसीचं सर्व राज्यांना पत्र, नियमावली जारी
2
काहीही होवो, सरकार शेतकरी कर्जमाफी करणारच : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
आजचे राशीभविष्य, ०८ डिसेंबर २०२५: आपण केलेल्या कामातून यश अन् कीर्ती लाभ होईल
4
इंडिगोवर मोठा आर्थिक दंड लावा; डीजीसीए आणि कंपनीच्या प्रमुखांना हटवा
5
यंदा अनावश्यक गर्दी टाळणार, आजपासून हिवाळी अधिवेशन, प्रशासन सज्ज : सभापती, उपसभापतींनी घेतला आढावा
6
देशातील सर्वांत मोठी एअरलाइन का डगमगली?; नवीन नियमांमुळे संकट! कमी कर्मचारी मॉडेलचाही फटका
7
विमानसेवाच जमीनदोस्त ! अनेक विमानतळांवर गोंधळ सुरू, प्रवाशांचे हाल
8
विरोधी पक्षनेतेपद मुद्यावरून सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; ‘मविआ’ला खुर्चीचीच चिंता असल्याची सरकारची टीका
9
महाराष्ट्रात लवकरच येणार ‘मेडिकल व्हॅल्यू टुरिझम’ योजना, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती
10
विमानतळावर इंडिगोने स्थापन केला आपत्ती व्यवस्थापन गट; अडथळ्यांबाबत २४ तासांत स्पष्टीकरण देण्याची नोटीस
11
क्रिकेटपटू स्मृती मानधना अन् पलाशचे लग्न अखेर माेडले; कुटुंबांच्या गोपनीयतेचा आदर करा : स्मृती
12
...ये दोस्ती हम नही तोडेंगे ! मोदी आणि पुतीन यांच्या भेटीकडे अमेरिका, युरोप आणि चीनचेही होते लक्ष
13
आजी-आजोबांच्या ‘स्क्रीन’च्या ‘व्यसनां’चं काय करणार?
14
गोव्यात नाइट क्लब ठरला ‘मृत्यू क्लब’; अग्नितांडवात २५ ठार; सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
15
गोवा नाइट क्लबमध्ये कशामुळे भडकली आग? 25 जणांच्या मृत्यूला कोण जबाबदार? CM सावंत यांचा मोठा खुलासा, 4 जणांना अटक
16
Bigg Boss 19: गौरव खन्नाने करुन दाखवलं! 'बिग बॉस १९'च्या ट्रॉफीवर कोरलं नाव
17
गोवा क्लबला दोन एक्झिट गेट, बाहेर पडण्यासाठी धडपडत होते लोक; यामुळे झपाट्याने पसरली आग
18
नाईट क्लब पाडण्याचे आदेश रद्द करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई; गोव्यातील दुर्घटनेनंतर पंचायत संचालकासह तिघे निलंबित
19
'बिग बॉस १९'मधून तान्या मित्तलचा प्रवास संपला; प्रणित मोरेची टॉप ३ मध्ये एन्ट्री, ट्रॉफी जिंकणार?
20
मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण: शीतल तेजवानीनंतर रवींद्र तारूला अटक, घरातून घेतलं ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

तापमानवाढीमुळे कामगारांचे आरोग्य आले धोक्यात; गर्भवती महिलांवर होतोय वाईट परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 13:42 IST

उत्पादन क्षमता २ ते ३% घटली, कोणते आजार वाढले? वाचा

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: २० अंश सेल्सिअसपेक्षा तापमान प्रत्येकी १ अंशाने वाढले की कामगारांची उत्पादनक्षमता २ ते ३ टक्क्यांनी घटते असे संयुक्त राष्ट्रांच्या आरोग्य आणि हवामान संस्थांनी काढलेल्या अहवालातून समोर आले आहे. मागील ५० वर्षांच्या अभ्यासावर हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि जागतिक हवामान संघटना यांनी उष्णतेचे वाढते धोके कसे परिणाम करत आहेत याबाबतचा अभ्यास केला. जगभरात अति उष्णतेच्या घटना अधिक वेळा घडत असून, त्या आणखी तीव्र झाल्या आहेत.

२०२४ हे वर्ष आतापर्यंतचे सर्वांत उष्ण वर्ष ठरले आहे. ४० ते ५० अंश सेल्सियस तापमान सामान्य होत चाललेय. ४ अब्ज लोकसंख्या या दुष्परिणामांना तोंड देत आहे.

कोणते आजार वाढले? :उष्माघात, शरीरातील पाण्याची कमतरता, मेंदू आणि मूत्रपिंडाचे विकार असे आजार वाढत आहेत. त्यामुळे कामगारांचे  आरोग्य, आर्थिक सुरक्षितता धोक्यात येते, असे अभ्यासात म्हटले आहे.

अहवालात काय?

  • कामाच्या ठिकाणी उष्णतेच्या धोक्यांवर उपाय करावेत.
  • मध्यमवयीन व वृद्ध कामगार यांना विशेष संरक्षण द्यावे.
  • आजारांबाबत जागरूकता.
  •  तापमानाचा गरीब वर्गाला सर्वाधिक फटका बसतो.  त्यांच्याकडे तोंड देण्यासाठी साधनंही कमी असतात. त्यामुळे त्यांच्यासाठी उपाययोजना.

कामगारांवर होणारा उष्णतेचा परिणाम हे एक गंभीर व्यावसायिक संकट बनले आहे. सांस्कृतिक शहाणपण आणि आर्थिक न्याय दुर्लक्षित केले गेले, तर हवामान बदलाशी जुळवून घेण्याच्या योजना अपयशी ठरतील. गर्भवती महिला जास्त उष्णतेत काम करत असतील, तर त्यांना गर्भपात होण्याचा धोका दुप्पट असतो.- विद्या वेणुगोपाल, अहवालाच्या लेखिका

महाराष्ट्रात सर्वाधिक बळी

उष्माघातामुळे महाराष्ट्रात सर्वाधिक १७ जणांचा मृत्यू झाला. तर, उत्तर प्रदेश व तेलंगणा (१५-१५) या राज्यांत सर्वाधिक मृत्यू झाले. गुजरातमध्ये १० जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला. जास्तीत जास्त बाधित हे वृद्ध, उन्हात काम करणारे कामगार, शेतकरी यांचा समावेश आहे. ८४ जणांचा हीटस्ट्रोकमुळे फेब्रुवारी ते जुलै २०२५ या काळात मृत्यू झाला. ८,१७१ जणांचा उष्माघाताने २०१५-२०२२ या कालावधीत मृत्यू झाल्याचा दावा एनसीआरबीने केला.

टॅग्स :Heat Strokeउष्माघातpregnant womanगर्भवती महिला