शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

"भाजपा सरकारच्या काळात हिंदू असुरक्षित; रिंकू शर्माच्या हत्येला अमित शहा जबाबदार, त्यांनी राजीनामा द्यावा"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2021 11:09 IST

Rinku Sharma Murder Case And Amit Shah : दिल्लीत सत्ताधारी पार्टी असलेल्या आम आदमी पार्टी (AAP) ने  गंभीर आरोप केला आहे. पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत काही दिवसांपूर्वी मंगोलपुरी परिसरात रिंकू शर्मा (Rinku Sharma) या तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. रिंकू भाजपा युवा मोर्चा आणि विश्व हिंदू परिषदेचा कार्यकर्ता होता. त्यामुळे त्याच्या हत्येने परिसरात खळबळ उडाली असून राजकारण तापलं आहे. याच दरम्यान दिल्लीत सत्ताधारी पार्टी असलेल्या आम आदमी पार्टी (AAP) ने  गंभीर आरोप केला आहे. पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. आपने रिंकू शर्माच्या हत्येसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जबाबदार असल्याचं म्टटलं आहे.

आपचे प्रवक्ते सौरभ भारद्वाज यांनी अमित शहांवर गंभीर आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दिल्लीत हत्या होणं ही आता सर्वसामान्य गोष्ट झाली आहे. रिंकू शर्माच्या हत्येला केंद्रीय गृहमंत्री अमित शहाच जबाबदार आपने या प्रकरणात असून शहा यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे. तसेच भाजपा सरकारच्या काळातच हिंदू सुरक्षित नाहीत असं देखील सौरभ भारद्वाज यांनी म्हटलं आहे. तसेच "दिल्लीत हत्येच्या घटना होणं ही आता सर्वसामान्य बाब झाली आहे. या हत्यांसाठी केंद्रीय गृहमंत्री जबाबदार आहेत. भाजपा सरकारच्या काळातच हिंदू सुरक्षित नाहीत" असं आपने म्हटलं आहे. 

"दिल्लीतील कायदा सुव्यवस्था खराब झाली, हत्येच्या घटना होणं ही आता सर्वसामान्य बाब"

"दिल्लीतील कायदा सुव्यवस्था खराब झाली आहे. दिल्लीतील कायदा व सुव्यवस्था राखण्यात केंद्रीय गृहमंत्रालय सपशेल अपयशी ठरल्याचं अनेक घटनांतून समोर येत आहे. आम्ही हत्येचा तीव्र निषेध करतो" असं देखील सौरभ भारद्वाज यांनी म्हटलं आहे. विश्व हिंदू परिषदेने एका निवेदनात म्हटले आहे की, राम मंदिरासाठी निधी जमा करण्यासाठी रिंकू शर्माची हत्या करण्यात आली आहे. दोषींना कठोर शिक्षा व्हायला हवी, असं मत विहिंपचे सह सरचिटणीस सुरेंद्र जैन यांनी व्यक्त केलं. विहिंपचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल यांनी सांगितलं की, रिंकूचा भाऊ विहिंप युवा संघटनेचा सदस्य असून अयोध्यामध्ये राम मंदिर बांधण्यासाठी निधी जमा करण्याचा कामात रिंकू सक्रियपणे भाग घेत होता.

सोशल मीडियावर न्याय मिळावा अशी मागणी

ट्विटरवर रिंकू शर्माला न्याय मिळावा अशी मागणी होत आहे.  #JusticeForRinkuSharma टॉप ट्रेंड करीत आहे. #HindusLivesMatter हॅशटॅग देखील खूप वापरला जात आहे. अनेक सेलिब्रेटींनीही याबाबत आपले मत व्यक्त करून न्यायाची मागणी केली आहे. रिंकू शर्माच्या हत्येबाबत न्यायाची मागणी करणार्‍यांमध्ये कंगना राणौत, प्रणिता सुभाष, आंध्र प्रदेश भाजपाचे महासचिव एस. के. विष्णुवर्धन रेड्डी, यू ट्यूबर एल्विश यादव इत्यादींचा समावेश आहे.

टॅग्स :Amit Shahअमित शहाdelhiदिल्लीRinku Rajguruरिंकू राजगुरूMurderखूनAAPआप