शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
3
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
4
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
5
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
6
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
7
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
8
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
9
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
10
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
11
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
12
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
13
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
14
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
15
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
16
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
17
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
18
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
19
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
20
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

''काश्मीरमधील इंटरनेटबंदीचा सात दिवसांत फेरविचार करा''

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2020 06:06 IST

राज्यघटनेच्या १९व्या कलमातील तरतुदींनुसार इंटरनेटचा वापर मूलभूत हक्कांत समाविष्ट होतो.

नवी दिल्ली : राज्यघटनेच्या १९व्या कलमातील तरतुदींनुसार इंटरनेटचा वापर मूलभूत हक्कांत समाविष्ट होतो. त्यामुळे काश्मीरमध्ये इंटरनेटवर घातलेल्या बंदीचा केंद्र सरकारने सात दिवसांच्या आत फेरविचार करावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिला. त्यामुळे इंटरनेटसेवेवर घालण्यात आलेली बंदी उठविण्याचा केंद्र सरकार व काश्मीर प्रशासन लवकरच निर्णय घेईल, अशी चर्चा सुरू आहे.काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम ५ आॅगस्ट रोजी रद्द केल्यापासून तिथे इंटरनेटबंदीसह अनेक निर्बंध आहेत. त्यावेळी अनेक राजकीय नेत्यांनाही स्थानबद्ध करून ठेवण्यात आले होते. त्यापैकी माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला व मेहबुबा मुफ्ती हे तीन मुख्यमंत्री आजही स्थानबद्धतेत आहेत. त्यापैकी काश्मिरी जनतेवर घालण्यात आलेल्या निर्बंधांविषयी आणि प्रामुख्याने इंटरनेटसेवेवरील बंदीबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा पहिला अत्यंत महत्त्वाचा आदेश आहे.इंटरनेटच्या वापरावर पूर्णपणे बंदी आणणे अत्यंत जाचक आहे, असे ताशेरेही न्या. एन. व्ही. रामन यांच्या नेतृत्वाखालील सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने केंद्र सरकारवर ओढले. सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला की, जम्मू-काश्मीरमधील रुग्णालये, शिक्षणसंस्थांमध्ये इंटरनेटसेवा सुरू करण्यात यावी. जमावबंदीच्या १४४व्या कलमाचा वापर कोणाचेही विचार दाबण्यासाठी करता येणार नाही. सर्वच प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्यही महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक आदेश देताना न्यायाधीशांनीही सारासारबुद्धीने निर्णय घ्यायला हवा, असेही खंडपीठाने नमूद केले.जम्मू-काश्मीर व लडाखचे विभाजन केल्यानंतर तेथील इंटरनेटसेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आणि एसएमएस व दूरध्वनीसेवेवरही बंधने लादण्यात आली. त्यापैकी दूरध्वनी, मोबाइल व एसएमएससेवा नंतर टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आली. मात्र, इंटरनेटसेवा अद्यापही बंदच आहे. या निर्बंधांना आव्हान देणाऱ्या याचिकांवर न्यायालयाने हा आदेश दिला.या प्रकरणी २१ जानेवारीला पुढील सुनावणी होणार आहे. काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम रद्द केल्याच्या निर्णयाला आव्हान देणाºया याचिकांवरही न्यायालयात स्वतंत्रपणे सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या वरील आदेशानंतर काही तासांनी काश्मीर प्रशासनाने सार्वजनिक सुरक्षा कायद्यान्वये स्थानबद्ध केलेल्या २६ जणांच्या सुटकेचा निर्णय घेतला. मात्र, त्यांची नावे जाहीर केली नाहीत.>न्यायालयाने मांडलेले महत्त्वाचे मुद्देविचार व भाषणस्वातंत्र्यासाठी इंटरनेटचा वापर हा राज्यघटनेतील १९व्या कलमातील तरतुदींनुसार मूलभूत हक्क. सत्तेचा गैरवापर करून मूलभूत हक्कांवर गदा आणू शकत नाही.विशिष्ट मुदत न देता इंटरनेटसेवेवर बंदी घालणे हा दूरसंचार कायद्याचा भंग आहे.इंटरनेटसेवेवरील बंदी मर्यादित काळापुरती लागू करता येईल. तिचा आढावा घेण्याचा न्यायालयांना अधिकार आहे.ई-बँकिंग फॅसिलिटी, रुग्णालये, शिक्षणसंस्था, सरकारी वेबसाइट आदींच्या वापरासाठी इंटरनेटसेवा सुरू करण्याचा विचार करा.१४४व्या कलमान्वये जारी करण्यात येणारे आदेशहा सत्तेचा गैरवापर आहे.ते लागू करताना त्यामागची कारणे द्यावीत.सरकारलाचपराक - काँग्रेसकाश्मीरबाबत सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिलेला आदेश म्हणजे मोदी सरकारला त्याच्या बेकायदेशीर कृत्यांबद्दल लगावलेली सणसणीत चपराक आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे. मोदी सरकारला २०२०मध्ये मिळालेला हा मोठा धक्का आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय