शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा पुन्हा बहाल करा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2020 5:15 AM

स्थानबद्धतेनंतर प्रथमच दिली मुलाखत : नॅशनल कॉन्फरन्स नेते फारुख अब्दुल्ला यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : केंद्र सरकारने ‘विश्वासघात’ करून जम्मू-काश्मीरचा राज्याचा दर्जा हिरावून घेतल्याचा अरोप करीत सरकारने हा दर्जा पुन्हा बहाल करून काश्मिरी जनतेचा गमावलेला विश्वास पुन्हा जिंकावा, अशी आवाहनवजा आग्रही मागणी काश्मीरचे ज्येष्ठ नेते व ‘नॅशनल कॉन्फरन्स’चे अध्यक्ष डॉ. फारुख अब्दुल्ला यांनी केली आहे.राज्यघटनेच्या अनुच्छेद ३७० अन्वये असलेला जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा संपुष्टात आणून या राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेश करण्याचे पाऊल केंद्र सरकारने उचलल्याला येत्या ५ आॅगस्ट रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्त ‘पीटीआय’ वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत डॉ. अब्दुल्ला यांनी हे आवाहन केले. काश्मीरच्या या दर्जा बदलानंतर १० महिने स्थानबद्ध केल्या गेलेल्या या ८२ वर्षांच्या नेत्याने सुटकेनंतर माध्यमांना दिलेली ही पहिलीच मुलाखत होती.अब्दुल्ला म्हणाले की, ज्या विश्वासाने काश्मीर भारतात विलीन झाले त्याचा तो विश्वास केंद्र सरकारच्या या निर्णयाने पार धुळीला मिळाला आहे. केंद्र सरकारला काश्मिरी जनतेचा विश्वास पुन्हा जिंकावाच लागेल व तो जिंकण्यासाठी अन्याय्य पद्धतीने हिरावून घेतलेला राज्याचा दर्जा जम्मू-काश्मीरला पुन्हा बहाल करणे हाच एकमेव उपाय आहे.अब्दुल्ला म्हणाले की, अनुच्छेद ३७० रद्द केले की जम्मू-काश्मीरची भरभराट होईल, तेथील दहशतवाद संपुष्टात येईल, असे स्वप्न केंद्र सरकारने दाखविले; पण लोकांना विचाराल तर ते सांगतील की, दहशतवाद कमी होण्याऐवजी उलट आणखी वाढला आहे. खरे तर नवे काही मिळण्याऐवजी आम्ही होते तेही गमावून बसलो आहोत. नॅशनल कॉन्फरन्सने इतर अनेकांप्रमाणे केंद्र सरकारच्या या निर्णयास सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे व न्यायालय आम्हाला न्याय देईल याची आम्हाला खात्री आहे, असे ते म्हणाले.गौरवही हिरावून घेतल्याने काश्मीर हताशआधी दोन दशकांच्या दहशतवादाने काश्मीर पोळले आहे. आता कोरोना महामारीने लोक हैराण झाले आहेत. त्यातच आमचा गौरवही हिरावून घेतल्याने काश्मीर पार हताश झाले आहे. आम्ही हातात कधीही बंदूक घेतलेली नाही व यापुढेही घेणार नाही. एक राजकीय पक्ष म्हणून या अन्यायाविरुद्ध आम्ही सर्व सनदशीर मार्गांनी शेवटपर्यंत लढत राहू, असेही ते म्हणाले की,

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर