शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
5
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
6
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
7
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
8
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
9
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
10
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
11
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
12
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
13
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
14
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
15
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
16
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
17
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
18
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
19
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
20
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...

आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 18:34 IST

Reservation News: आरक्षणावरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश आणि भावी सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी या विषयावर एक परखड टिप्पणी केली आहे.

आरक्षणावरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश आणि भावी सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी या विषयावर एक परखड टिप्पणी केली आहे. या देशामध्ये आरक्षणाचा विषय हा एका रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालेला आहे. ज्यांनी या डब्यात प्रवेश केलेला आहे, ते आणखी कुणाला प्रवेश देऊ इच्छित नाहीत, असे ते म्हणाले. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयामध्ये झालेल्या महत्त्वपूर्ण सुनावणीवेळी सूर्यकांत यांनी ही टिप्पणी केली. 

या सुनावणीवेळी वरिष्ठ वकील गोपाल शंकरनारायणन याचिकाकर्त्यांच्यावतीने युक्तिवाद करताना सांगितले की, राज्यामध्ये राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या मागास असलेल्या वर्गांची ओळख पटवली गेली पाहिजे. महाराष्ट्रातील बांठिया आयोगाने ओबीसी हे राजकीयदृष्ट्या मागास आहेत की नाही याची खातरजमा न करता ओबीसींना आरक्षण दिलं होतं. 

त्यावर न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सांगितले की, या देशामध्ये आरक्षणाचा विषय हा रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालेला आहे. ज्यांनी या डब्यात प्रवेश मिळवला आहे, ते आणखी कुणाला आत प्रवेश करू देऊ इच्छित नाहीत. हाच संपूर्ण खेळ आहे. तसेच हाच याचिकाकर्त्यांचाही खेळ आहे. आरक्षणाच्या लाभापासून कुणी वंचित राहू नये यासाठी राज्यांनी अधिक समाज घटकांची ओळख पटवली पाहिजे. तसेच हे वर्गिकण कुठलंही एक कुटुंब किंवा एका समुहापर्यंत मर्यादित राहू नये, असेही त्यांनी सांगितले.

न्यायमूर्ती सूर्यकांत हे २४ डिसेंबक २०२५ ते ९ फेब्रुवारी २०२७ या काळात भारताचे सरन्यायधीश म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. तत्पूर्वी बी.आर. गवई हे देशाचे सरन्यायाधीश होती. ते १४ मे रोजी सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतील.   

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयreservationआरक्षण