शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 18:34 IST

Reservation News: आरक्षणावरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश आणि भावी सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी या विषयावर एक परखड टिप्पणी केली आहे.

आरक्षणावरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश आणि भावी सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी या विषयावर एक परखड टिप्पणी केली आहे. या देशामध्ये आरक्षणाचा विषय हा एका रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालेला आहे. ज्यांनी या डब्यात प्रवेश केलेला आहे, ते आणखी कुणाला प्रवेश देऊ इच्छित नाहीत, असे ते म्हणाले. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयामध्ये झालेल्या महत्त्वपूर्ण सुनावणीवेळी सूर्यकांत यांनी ही टिप्पणी केली. 

या सुनावणीवेळी वरिष्ठ वकील गोपाल शंकरनारायणन याचिकाकर्त्यांच्यावतीने युक्तिवाद करताना सांगितले की, राज्यामध्ये राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या मागास असलेल्या वर्गांची ओळख पटवली गेली पाहिजे. महाराष्ट्रातील बांठिया आयोगाने ओबीसी हे राजकीयदृष्ट्या मागास आहेत की नाही याची खातरजमा न करता ओबीसींना आरक्षण दिलं होतं. 

त्यावर न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सांगितले की, या देशामध्ये आरक्षणाचा विषय हा रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालेला आहे. ज्यांनी या डब्यात प्रवेश मिळवला आहे, ते आणखी कुणाला आत प्रवेश करू देऊ इच्छित नाहीत. हाच संपूर्ण खेळ आहे. तसेच हाच याचिकाकर्त्यांचाही खेळ आहे. आरक्षणाच्या लाभापासून कुणी वंचित राहू नये यासाठी राज्यांनी अधिक समाज घटकांची ओळख पटवली पाहिजे. तसेच हे वर्गिकण कुठलंही एक कुटुंब किंवा एका समुहापर्यंत मर्यादित राहू नये, असेही त्यांनी सांगितले.

न्यायमूर्ती सूर्यकांत हे २४ डिसेंबक २०२५ ते ९ फेब्रुवारी २०२७ या काळात भारताचे सरन्यायधीश म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. तत्पूर्वी बी.आर. गवई हे देशाचे सरन्यायाधीश होती. ते १४ मे रोजी सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतील.   

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयreservationआरक्षण