शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

देशातील साखर उद्योगामधील संशोधन अत्यंत कमकुवत : शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2020 20:48 IST

संशोधनामधे अधिक गुंतवणुक करण्याची गरज

ठळक मुद्देतीन दिवसीय आंतरराष्ट्रीय साखर परिषद रासायनिक खतांच्या अतिरिक्त वापरामुळे जमिनीची उत्पादकता संपुष्टात येण्याचा धोकाउत्पादकता वाढविणे, इथेनॉल आणि उर्जा क्षेत्रावर भर हवा

पुणे : देशाची भविष्यातील उर्जेची आणि साखरेची मागणी वाढविण्यासाठी जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली आणता येणार नाही. त्यासाठी साखरेची उत्पादकता आणि साखर उतारा वाढविण्याकडे लक्ष दिले पाहिजे. मात्र, सध्या साखर उद्योगातील संशोधन अत्यंत कमकुवत आहे. त्यामुळे संशोधनामधे अधिक गुंतवणुक करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषी मंत्री तथा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे (व्हीएसआय) अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी येथे केले. मांजरी येथे व्हीएसआयच्या वतीने दुसरी तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय साखर परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. आंतरराष्ट्रीय साखर संघटनेचे कार्यकारी संचालक डॉ. जोस आॅरिव्ह, पंजाबचे सहकार मंत्री सुखजिंदर सिंग रंधवा, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, मृद् व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, साखर आयुक्त सौरभ राव, कृषी आयुक्त सुहास दिवसे, जयप्रकाश दांडेगावकर, कल्लपा आवाडे या वेळी उपस्थित होते. ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, ब्राझिल, चीन, इजिप्त, फ्रान्स, इंडोनेशिया, आयर्लंड, जपान, फिलिपिन्स, स्पेन, श्रीलंका, थायलंड, दक्षिण अफ्रिका, इस्त्राईल, युनायटेड किंगडम, सुदान अशा विविध २० देशातील ३४हून अधिक वक्ते सहभागी झाले आहेत. रासायनिक खतांच्या अतिरिक्त वापरामुळे जमिनीची उत्पादकता संपुष्टात येण्याचा धोका आहे. त्यासाठी रासायनिक, सेंद्रीय आणि जैव खतांचा एकात्मिक वापरावर भर द्यायला हवा. या शिवाय दरवर्षी ३० टक्के बियाणे बदलत राहिले पाहिजे. जैव तंत्रज्ञान, नॅनॉ तंत्रज्ञान, मॉलेक्युलर तंत्रज्ञानाचा वापर करुन दुष्काळ, जमिनीतील क्षारता, रोगराईशी सामना करणाºया पिकांच्या जाती शोधाव्यात, असा सल्ला पवार यांनी दिला.  

‘‘देशातील साखरेची मागणी २०२५ पर्यंत तीनशे ते ३३० लाख लाख टन असेल. ही मागणी पूर्ण करण्यासाठी साखरेची उत्पादकता वाढवायला हवी. सध्या दरहेक्टरी ७० टन असलेले उत्पादन अडीचशे टनांवर जायला हवे. सरासरी साखर उतारा साडेदहा टक्क्यांवरुन साडेअकरा ते बारा टक्क्यांदरम्यान असायला हवा. साखर संस्था, कारखाने आणि उत्पादकांनीही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करायला हवा. संशोधनातील गुंतवणूक वाढवायला हवी. तरच साखर उद्योग भविष्यातील साखर, इथेनॉल आणि उर्जेची मागणी देखील पुरवू शकेल.’’ -शरद पवार.............‘‘साखर उत्पादनामधे ब्राझिलपाठोपाठ भारताचा क्रमांक लागतो. आता निर्यातीतही भारत आपले स्थान निर्माण करीत आहे. थायलंड नंतर भारताचा निर्यातीत तिसरा क्रमांक येतो. मात्र, या पुढील काळात फुटबॉलमधेच नव्हे तर, साखरेतही भारत-ब्राझिल लढत पहायला मिळेल.’’ -डॉ. जोस आॅरिव्ह  

टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवारSugar factoryसाखर कारखानेResearchसंशोधनFarmerशेतकरी