शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
2
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
3
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
4
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
5
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
6
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
7
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
8
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
10
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
11
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
12
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
13
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
14
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
15
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
16
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
17
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
18
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
19
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
20
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी

हरवलेल्या व्यक्तींबद्दलच्या तक्रारी एसएमएस, व्हॉटस्अ‍ॅपवरून नोंदवा!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2019 3:30 AM

दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश : कालबद्ध कार्यक्रम आखण्याची केली सूचना

खुशालचंद बाहेती नवी दिल्ली : हरवलेल्या व्यक्तींना शोधण्याचा महत्त्वाचा कालावधी तक्रारी नोंदविण्यात होणाऱ्या विलंबातच जातो. तो टाळण्यासाठी व ताबडतोब शोधकार्य सुरू व्हावे म्हणून अशा तक्रारी एसएमएस, व्हॉटस्अ‍ॅप, ई-मेलद्वारे नोंदविण्याचे आदेश दिल्लीउच्च न्यायालयाने दिले आहेत. यासाठी कालबद्ध कार्यक्रम ४ आठवड्यांत सादर करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

घरकाम करणारी महिला गेल्या १४ एप्रिलपासून हरविल्याचे पत्र तिच्या आईने उच्च न्यायालयाला लिहिले. न्यायालयाने पोलिसांना अहवाल मागितला, स्मरणपत्रे दिली. यानंतर २१ मे रोजी पोलिसांनी तक्रार नोंदविली. तक्रार नोंदविण्यात झालेला महिनाभराचा विलंब पाहून न्यायालयाने शोधकार्याचा महत्त्वाचा कालावधी वाया गेल्याचे मत व्यक्त केले. उच्च न्यायालयात हरवलेल्या व्यक्तीबद्दल अनेक याचिका दाखल झाल्या आहेत. यात तक्रार नोंदविण्यात आली नाही किंवा ती उशिरा नोंदविण्यात आली होती, असा अनुभव असल्याने अशा तक्रारी एसएमएस, व्हॉटस्अ‍ॅप, ई-मेलने नोंदविण्याची सूचना उच्च न्यायालयाने दिली होती. दिल्ली पोलिसांनी यास सकारात्मक प्रतिसाद दिला. दिल्ली पोलिसांनी यासाठी एक अ‍ॅप तयार करण्याचेही मान्य केले. याशिवाय दिल्ली पोलिसांच्या वेबसाईटवर अशा तक्रारी नोंदविण्यासाठी लिंक देण्याचेही मान्य केले.

दिल्ली पोलिसांनी अशा तक्रारी प्राप्त झाल्यानंतर तत्काळ चौकशी सुरू करण्याची आणि आवश्यक प्रकरणांत तत्काळ गुन्हे नोंदविण्याचीही तयारी दर्शविली आहे. दिल्ली पोलिसांच्या प्रस्तावास मान्यता देतानाच तो कालबद्ध पद्धतीने अमलात आणण्याचे न्यायालयाने निर्देश दिले आहेत. २०१३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने १८ वर्षांखालील व्यक्ती हरवल्यास थेट अपहरणाचे गुन्हे नोंदविण्याचे आदेश दिले. यानंतरही तक्रारी नोंदविण्यात टाळाटाळ करण्यात येत असल्याचा अनुभव लोकांना येत आहे. त्यामुळे हा निर्णय देशभरात लागू झाला तर शोध घेण्याचा महत्त्वाचा काळ वाया जाणार नाही.

दररोज १७४ मुले हरवतात

  • २०१६ पर्यंत १ लक्ष ११ हजार ५६९ मुले हरवली. त्यापेक्षा ५५६२५ मिळालीच नाहीत.
  • संदर्भ : लोकसभा प्रश्न क्रमांक ३९२८ दिनांक २०-३-२०१८.
टॅग्स :delhiदिल्लीHigh Courtउच्च न्यायालय